शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मोदी दर सहा दिवसाला इकडे, पण हा महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 21:01 IST

महाराष्ट्र ओरबाडत आहात, ते तुम्हाला ओरबाडू देणार नाही, त्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray Speech : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाशिक येथील मेळाव्यातून पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "आता पंतप्रधांनांच्या वाऱ्या महाराष्ट्रात वाढल्या आहेत. हा महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार आहे. मोदी दर सहा दिवसाआड महाराष्ट्रात येत आहे.  महाराष्ट्र जेव्हा संकटात होता, अवकाळीचा फटका बसला होता, तेव्हा आले नाहीत. विशेष म्हणजे मणिपूरला गेले नाहीत. निवडणूक आल्या म्हणून मोदींना महाराष्ट्र आठवत आहे. देश के लिए मन की बात, गुजरात के लिए धन की बात. रामाच्या, हनुमानाच्या नावावर मत मागणार का? राम भरोसे नाही आता काम भरोसे मतं मिळणार. मोदींच्या नावावर मत मिळणार नाही हे भाजपला समजलं आहे. शेतकरी उपाशी असताना पंतप्रधान उपसा करत आहेत," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "माझ्यासमोर प्रत्यक्ष काळाराम बसला आहे. राममंदिराला विरोध नाही. राम मंदिरात शिवसेनेचे योगदान काय हे सांगायची गरज नाही. कोणी जबाबदारी  घ्यायला तयार नव्हते. शिवसेनाप्रमुख यांनी पुढाकार घेतला. राम मंदिर बनविण्यासाठी भाजपला आम्ही पाठिंबा दिला होता. जेव्हा कठीण काळ होता, तेव्हा आम्हीच तुम्हाला साथ दिली, आता शिवसेना संपवायला निघाला. स्वत: संरक्षण कवचात राहतात, आमचे संरक्षण काढू घेता. १९९२-९२ मध्ये शिवसैनिकांनी सर्वधर्मियांना वाचविले"

"घराणेशाहीचा आरोप चुकीचा"

घराणेशाहीच्या आरोपाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "माझ्यावर घराणेशाहीचा आरोप चुकीचा. आपण समोर बसलेले तुम्हीच माझे घराणे. पंतप्रधान हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. देशात व गुजरातमध्ये फरक करत आहात. महाराष्ट्र ओरबाडत आहात, ते तुम्हाला ओरबाडू देणार नाही, त्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत. मिंधे खुर्चीसाठी दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत, हे हिंदुत्व बाळासाहेबांनी शिकवलेलं नाही. क्रिकेटची फायनलची मॅचही गुजरातकडे गेली.  फिल्मफेअरचा सोहळाही गुजरातमध्ये घेऊन जात आहे. महाराष्ट्राच्या मुळावर घाव का घालता?" असा खरपूस सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

दरम्यान, "२०१४ मध्ये भाजपने युती तोडली, १५ दिवसात ६३ आमदार निवडून दिले. २०१४ साली दिल्लीत उद्धव ठाकरे एकटे काही करणार नाही असा विचार सुरू होता. त्यामुळे आम्हाला संपवण्याचा डाव होता. अमित शहा यांनी वचन मोडलं. फडणवीस पूर्ण मुख्यमंत्री झाले असते. पाव मुख्यमंत्री झाले नसते. महाराष्ट्रात वारंवार यायची गरज नसती पडली. पक्ष चोरता तुम्ही. अजूनही काश्मीरमध्ये हत्या सुरूच आहे. पंतप्रधानांबरोबर चांगले संबध होते, निवडणूक होत असते, जनतेचा निर्णय मान्य करावा लागतो. आम्हाला संपवायची भाषा करता, मी आणि मीच ही भाषा सोडा," असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.

  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी