शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

शिवसेनेच्या आमदारांत तीव्र खदखद, स्वतंत्रपणे लढण्यास विरोध

By अतुल कुलकर्णी | Updated: June 22, 2018 06:18 IST

मंत्रिपदे व महामंडळावरील नियुक्ती मिळणार नसेल तर नागपूर अधिवेशनाला जायचे तरी कशाला? असा संतप्त सवालही या आमदारांनी केला.

मुंबई : लोकांमधून निवडून आलेल्या शिवसेना आमदारांमध्ये टोकाचा असंतोष धुमसत आहे. मंत्रिपद आम्हाला न देता विधान परिषदेच्या सदस्यांना दिली आहेत, ते आमची कामे करत नाहीत, नाराज आमदारांना नेतृत्वही विश्वासात घेतले जात नाही, अशा त्यांच्या तक्रारी असून, त्यांचा एक गट बैठक घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार आहे.मंत्रिपदे व महामंडळावरील नियुक्ती मिळणार नसेल तर नागपूर अधिवेशनाला जायचे तरी कशाला? असा संतप्त सवालही या आमदारांनी केला. पक्षनेतृत्व स्बळाची भाषा करत असताना त्या भूमिकेलाच काही आमदारांनी सुरुंग लावला आहे. न्याय मिळणार नसेल तर आम्ही पक्षबांधणी कशी करायची व मतदारसंघ सांभाळायचे कसे? अशी उद्विग्नता त्यांनी बोलून दाखवली आहे.शिवसेनेच्या काही आमदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही खदखद व्यक्त केली. स्वतंत्रपणे लढण्याची भाषा परवडणारी नाही. तसे केल्यास आम्हाला मतदारसंघातून निवडून येणे अवघड आहे. मात्र, निवडून न येणारे काही नेते मातोश्रीवर जाऊन चुकीची माहिती देतात, असेही काही आमदार म्हणाले.डॉ. दीपक सावंत यांना विधान परिषेदेची उमेदवारी दिली नसली तरी त्यांचे मंत्रिपद कायम आहे. त्यांना आणखी ६ महिने मंत्रीपदी कायम ठेवण्याचे घाटत आहे. तसे झाल्यास आमच्या निवडून येण्याला अर्थ नाही, असे सांगून पश्चिम महाराष्टÑातील एक आमदार म्हणाला की, त्या जागी विधानसभा सदस्याला संधी दिली पाहिजे.विधान परिषद सदस्यांना मंत्रीपदे देताना आम्हाला सांगितले की, निवडणुकीच्या एक वर्ष आधी त्यांचे राजीनामे घेऊन आम्हालामंत्री पदे दिली जातील. पण ते होताना दिसत नाही. सेनेचे मंत्री मातोश्रीपेक्षा ‘वर्षा’वर जास्त निष्ठा दाखवतात. मातोश्रीवरील बैठकांची माहितीही ‘वर्षा’वर कळवण्यात धन्यता मानतात. आम्ही निष्ठेने मतदारसंघात शिवसेना बांधत आहोत, पण आम्हाला कोणी विचारत नाही. महामंडळाच्या नेमणुकाही चार वर्षे झाली तरी केल्या जात नाहीत.येत्या आठवड्यात आम्हा काही आमदारांची बैठक होणार आहे. मंत्रिमंडळात व महामंडळांत विधानसभा सदस्यांना सामावून न घेतल्यास आम्ही नागपूरला जाणार नाही आणि ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांना आमचा मानस बोलून दाखवू. पण घुसमट सहन करणार नाही, असे या आमदारांनी बोलून दाखवले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे