शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

पोलीस अधिकाऱ्याने लाठ्या घ्या रे म्हणताच; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 16:33 IST

स्थानिक शिवसैनिकांनी पुराच्या ठिकाणी दिलेल्या भेटीदरम्यान पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला.

मुंबई - नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसाने गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे महापुराची परिस्थिती निर्माण होऊन औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील १७ गावांचा संपर्क तुटू शकतो. प्रशासनातर्फे सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे. सोमवारी स्थानिक शिवसैनिकांनी पुराच्या ठिकाणी दिलेल्या भेटीदरम्यान पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी अरेरावा भाषा करत असल्याने, एका अधिकाऱ्यांने लाठ्या घ्या रे हातात म्हणताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.

आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदी ओसंडून वाहत होती. त्यामुळे सर्व धरणांतील पाणी हे गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरीच्या काठावरील गावे खाली करण्यात आली आहे. मात्र स्थानिकांच्या गर्दीने मदतकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास वैजापूर येथील शिवसेनच्या काही पदाधिकाऱ्यांनी पूर आलेल्या वांजरगाव येथे भेट दिली. यावेळी प्रशासन काहीच करत नसल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. सेनेच्या नेत्यांची अरेरावी वाढतच चालल्याने वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी, लाठ्या घ्या रे हातात असे आदेश कर्मचाऱ्याना देताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.

एवढच नाही तर पोलिसांनी या नेत्यांना अक्षरशा हाकलून लावले. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मिडीयावर वायरल झाला आहे. ज्यात शिवसेनेचे नेते संजय पाटिल पोलिसांशी वाद घालत आहे. मात्र पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनच्या या नेत्यांनी मात्र काढता पाय घेतला. परिसरात या घटनेची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे.