शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Aditya Thackeray: "आम्हाला हिंदूत्व शिकविण्याची गरज नाही, संपलेल्या पक्षावर…", आदित्य ठाकरेंची मनसेवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 12:33 IST

Aditya Thackeray: "महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. महागाईचा वाढता दर पाहता लोकांची सहनशीलता संपू लागली आहे."

परभणी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रामधून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. "आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही," असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर आता राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मनसेला खरमरीत टोला लगावला आहे. ते परभणीत माध्यमांशी बोलत होते.

'संपलेल्या पक्षावर बोलत नाही'आदित्य ठाकरे यांना राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्राबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, "मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही. महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. महागाईचा वाढता दर पाहता लोकांची सहनशीलता संपू लागली आहे. त्याच्यावर कोणीही बोलत नाही. जीएसटीचा परतावा मिळणं बाकी आहे, त्यासाठी पत्र लिहिलं तर बरं होईल. त्यांनी(राज ठाकरे) राजकारण नाही तर विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं," असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

'आम्हाला हिंदूत्व शिकविण्याची गरज नाही' दरम्यान, आदित्य ठाकरे काल नांदेड दौऱ्यावर होते. त्यावेळीही त्यांनी राज ठाकरे आणि मनसेवर जोरदार हल्लाबोल केला. "आजकाल आम्हाला धर्म-हिंदूत्व शिकविले जाते. परंतु कुणीही आम्हाला ते शिकविण्याची गरज नाही. आमचा धर्म सेवा हा आहे. तर प्राण जाये पर वचन ना जाये, हे आमचे हिंदूत्व आहे. धर्माचे पालन करुन जी वचने आम्ही जनतेला दिली आहेत. ते पूर्ण करुन दाखविणार आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणालेह होते.

'महाविकास आघाडीमध्ये बेस्ट ऑफ ऑल'नांदेडमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी महाविकास आघाडीचे कौतुक केले. "देशाची क्रिकेटची टीम तयार करताना जसे सर्वात्तम बॅटसमन, बॉलर, फिल्डरची निवड करण्यात येते. तशाच प्रकारे महाविकास आघाडीतील सहभागी सर्व जण हे बेस्ट ऑफ ऑल आहेत. सर्वोत्तम लोकांमुळेच राज्यात आता विकासाचा वेग वाढला आहे. विकास काय असतो हे महाविकास आघाडीने दाखवून दिले आहे. तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, नवा महाराष्ट्र घडल्या शिवाय राहणार नाही,'' असे ते म्हणाले होते. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेNandedनांदेडparabhaniपरभणी