शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Aditya Thackeray: "आम्हाला हिंदूत्व शिकविण्याची गरज नाही, संपलेल्या पक्षावर…", आदित्य ठाकरेंची मनसेवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 12:33 IST

Aditya Thackeray: "महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. महागाईचा वाढता दर पाहता लोकांची सहनशीलता संपू लागली आहे."

परभणी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रामधून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. "आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही," असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर आता राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मनसेला खरमरीत टोला लगावला आहे. ते परभणीत माध्यमांशी बोलत होते.

'संपलेल्या पक्षावर बोलत नाही'आदित्य ठाकरे यांना राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्राबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, "मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही. महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. महागाईचा वाढता दर पाहता लोकांची सहनशीलता संपू लागली आहे. त्याच्यावर कोणीही बोलत नाही. जीएसटीचा परतावा मिळणं बाकी आहे, त्यासाठी पत्र लिहिलं तर बरं होईल. त्यांनी(राज ठाकरे) राजकारण नाही तर विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं," असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

'आम्हाला हिंदूत्व शिकविण्याची गरज नाही' दरम्यान, आदित्य ठाकरे काल नांदेड दौऱ्यावर होते. त्यावेळीही त्यांनी राज ठाकरे आणि मनसेवर जोरदार हल्लाबोल केला. "आजकाल आम्हाला धर्म-हिंदूत्व शिकविले जाते. परंतु कुणीही आम्हाला ते शिकविण्याची गरज नाही. आमचा धर्म सेवा हा आहे. तर प्राण जाये पर वचन ना जाये, हे आमचे हिंदूत्व आहे. धर्माचे पालन करुन जी वचने आम्ही जनतेला दिली आहेत. ते पूर्ण करुन दाखविणार आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणालेह होते.

'महाविकास आघाडीमध्ये बेस्ट ऑफ ऑल'नांदेडमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी महाविकास आघाडीचे कौतुक केले. "देशाची क्रिकेटची टीम तयार करताना जसे सर्वात्तम बॅटसमन, बॉलर, फिल्डरची निवड करण्यात येते. तशाच प्रकारे महाविकास आघाडीतील सहभागी सर्व जण हे बेस्ट ऑफ ऑल आहेत. सर्वोत्तम लोकांमुळेच राज्यात आता विकासाचा वेग वाढला आहे. विकास काय असतो हे महाविकास आघाडीने दाखवून दिले आहे. तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, नवा महाराष्ट्र घडल्या शिवाय राहणार नाही,'' असे ते म्हणाले होते. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेNandedनांदेडparabhaniपरभणी