शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

मंदिरप्रश्न हाती घेण्याची शिवसेनेची क्षमता नाही, विहिंपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 05:52 IST

विहिंपची टीका : आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा

मुंबई : अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या मुद्दयावरून आक्रमक पवित्रा घेणाऱ्या, त्यासाठी ‘श्रीराम’ लिहिलेल्या विटा घेत अयोध्येचा दौरा आखणाºया शिवसेनेला विश्व हिंदू परिषदेने फटकारले आहे. हा प्रश्न हायजॅक करण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालवला असला, तरी तेवढी शिवसेनेची क्षमता नाही, अशी टीका रविवारी त्यांच्या नेत्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी आधी बाळासाहेबांचे स्मारक उभारावे आणि त्यानंतरच राम मंदिराच्या मुद्दयाला हात घालावा, असे टोला लगावतानाच शिवसेना मंदिराच्या मुद्दयावर राजकारण करत असल्याचाही आरोप विहिंपने केला आहे. या आंदोलनात उतरून ते ताब्यात घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचा आरोपही विहिंपच्या नेत्यांनी केल्याने हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर संघ परिवारातील संघटना शिवसेनेसोबत जाण्यास तयार नसल्याचे दिसून आले.राम मंदिराच्या प्रश्नावर शिवसेनेने सुरूवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असल्याची घोषणा करत हा मुद्दा तापवला. त्यासाठी शिवसेनेच्या शाखा-शाखांत तयारी सुरू आहे. सुरूवातीला या मुद्द्यावर शिवसेनेला फटकारणाºया रा. स्व. संघानेही नंतर हिंदुत्त्व आणि मंदिराच्या प्रश्नावर शिवसेनेला पाठिंबा दिला होता.

या पार्श्वभूमीवर विहिंपचे आंतराष्ट्रीय अध्यक्ष, माजी न्यायमुर्ती विष्णू कोकजे यांनी रविवारी शिवसेनेला चिमटा काढला. ‘शिवसेना राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, हा विषय हायजॅक करण्याइतकी शिवसेनेची शक्ती-क्षमता नाही. शिवसेनेने आधी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधून दाखवावे. त्यानंतरच अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या प्रश्नाला हात घालावा,’ अशी तिरकस प्रतिक्रिया कोकजे यांनी दिली.अयोध्येत शिवसेना रॅली काढणार आहे. पण शिवसेनेला इतक्या वर्षानंतर अचानक राम मंदिराचा मुद्दा कसा काय आठवला, असा प्रश्न करून कोकजे म्हणाले, अयोध्येत शिवसेनेची अशी किती ताकद आहे? मुंबईत उत्तर भारतीयांना मारझोड करायची आणि अयोध्येत राम मंदिरावर आंदोलन छेडायचे, हा शिवसेनेचा राजकीय सोयीचा खेळ आहे. न्यायालयीन निकालांची आणि प्रक्रियांची किती दिवस वाट पाहणार? राम मंदिरासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणीही कोकजे यांनी केली.‘हा तर विहिंपचा मूर्खपणा’शिवसेनेने मात्र विहिंपच्या या भूमिकेची ‘शुद्ध मूर्खपणा’ अशी संभावना केली आहे. विहिंपची ही वक्तव्ये, भूमिका म्हणजे मूर्खपणा आहे. त्यावर कसलीही प्रतिक्रिया द्यावी, अशी स्थिती नाही. त्यामुळे आमचे यावर ‘नो कमेंट’च असेल, असे पक्षाचे प्रवक्ता आणि खासदार अरविंद सावंत म्हणाले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरShiv SenaशिवसेनाAyodhyaअयोध्या