शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मंदिरप्रश्न हाती घेण्याची शिवसेनेची क्षमता नाही, विहिंपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 05:52 IST

विहिंपची टीका : आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा

मुंबई : अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या मुद्दयावरून आक्रमक पवित्रा घेणाऱ्या, त्यासाठी ‘श्रीराम’ लिहिलेल्या विटा घेत अयोध्येचा दौरा आखणाºया शिवसेनेला विश्व हिंदू परिषदेने फटकारले आहे. हा प्रश्न हायजॅक करण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालवला असला, तरी तेवढी शिवसेनेची क्षमता नाही, अशी टीका रविवारी त्यांच्या नेत्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी आधी बाळासाहेबांचे स्मारक उभारावे आणि त्यानंतरच राम मंदिराच्या मुद्दयाला हात घालावा, असे टोला लगावतानाच शिवसेना मंदिराच्या मुद्दयावर राजकारण करत असल्याचाही आरोप विहिंपने केला आहे. या आंदोलनात उतरून ते ताब्यात घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचा आरोपही विहिंपच्या नेत्यांनी केल्याने हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर संघ परिवारातील संघटना शिवसेनेसोबत जाण्यास तयार नसल्याचे दिसून आले.राम मंदिराच्या प्रश्नावर शिवसेनेने सुरूवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असल्याची घोषणा करत हा मुद्दा तापवला. त्यासाठी शिवसेनेच्या शाखा-शाखांत तयारी सुरू आहे. सुरूवातीला या मुद्द्यावर शिवसेनेला फटकारणाºया रा. स्व. संघानेही नंतर हिंदुत्त्व आणि मंदिराच्या प्रश्नावर शिवसेनेला पाठिंबा दिला होता.

या पार्श्वभूमीवर विहिंपचे आंतराष्ट्रीय अध्यक्ष, माजी न्यायमुर्ती विष्णू कोकजे यांनी रविवारी शिवसेनेला चिमटा काढला. ‘शिवसेना राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, हा विषय हायजॅक करण्याइतकी शिवसेनेची शक्ती-क्षमता नाही. शिवसेनेने आधी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधून दाखवावे. त्यानंतरच अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या प्रश्नाला हात घालावा,’ अशी तिरकस प्रतिक्रिया कोकजे यांनी दिली.अयोध्येत शिवसेना रॅली काढणार आहे. पण शिवसेनेला इतक्या वर्षानंतर अचानक राम मंदिराचा मुद्दा कसा काय आठवला, असा प्रश्न करून कोकजे म्हणाले, अयोध्येत शिवसेनेची अशी किती ताकद आहे? मुंबईत उत्तर भारतीयांना मारझोड करायची आणि अयोध्येत राम मंदिरावर आंदोलन छेडायचे, हा शिवसेनेचा राजकीय सोयीचा खेळ आहे. न्यायालयीन निकालांची आणि प्रक्रियांची किती दिवस वाट पाहणार? राम मंदिरासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणीही कोकजे यांनी केली.‘हा तर विहिंपचा मूर्खपणा’शिवसेनेने मात्र विहिंपच्या या भूमिकेची ‘शुद्ध मूर्खपणा’ अशी संभावना केली आहे. विहिंपची ही वक्तव्ये, भूमिका म्हणजे मूर्खपणा आहे. त्यावर कसलीही प्रतिक्रिया द्यावी, अशी स्थिती नाही. त्यामुळे आमचे यावर ‘नो कमेंट’च असेल, असे पक्षाचे प्रवक्ता आणि खासदार अरविंद सावंत म्हणाले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरShiv SenaशिवसेनाAyodhyaअयोध्या