शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

Shivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने

By बाळकृष्ण परब | Updated: October 19, 2018 18:29 IST

सालाबादप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडला. पण गेल्या काही दसरा मेळाव्यांप्रमाणेच यावेळीही शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण नुसती टीका, इशारे आणि आव्हाने देणारेच ठरले.

सालाबादप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडला. काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख पक्षाचे शक्तिकेंद्र मानल्या जाणाऱ्या शिवतीर्थावरून निवडणुकांसंदर्भात काहीतरी मोठी घोषणा करतील, अशी अटकळ वर्तवली जात होती. अशी घोषणा ऐकण्यासाठी हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवर जमले होते, तर लाखो शिवसैनिक मीडिया आणि सोशल मीडियावरून शिवाजी पार्कवरील घडामोडींकडे लक्ष ठेवून होते. पण गेल्या काही दसरा मेळाव्यांप्रमाणेच यावेळीही शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण नुसती टीका, इशारे आणि आव्हाने देणारेच ठरले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करत असत, तेव्हा त्यांचे विचार शिवसेनेची पुढील वर्षभराची दिशा ठरवणारे असत. पण या दसरा मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुखांनी ना शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली, ना शिवसैनिकांना तशी काही दिशा दर्शवली.   मेळाव्याच्या सुरुवातीच सुभाष देसाई, संजय राऊत, रामदास कदम आदी नेत्यांनी नरेंद्र मोदी, केंद्र सरकार, राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीका करून वातावरण तापवले. मग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, पाकिस्तान, दहशतवादी आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरले. पण सत्ता सोडण्याच्या आपल्या घोषणेचे काय झाले. तसेच भाजपाला विरोध असूनही आपण सत्तेत का आहोत याचे उत्तर शिवसेना पक्षप्रमुखांनी दिले नाही.   2014 विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने केलेला विश्वासघात शिवसेना आणि शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला होता. त्याची सल त्यांना अद्यापही बोचत आहेत. त्यातच शिवसेनेचे बोट धरून आलेला भाजपा राज्यात बघता बघता मोठा पक्ष झाला, ही बाबही शिवसेनेला पचवता आलेली नाही. पण भाजपाला रोखण्यासाठी ठोस रणनीती आखणे सेनेला शक्य झालेले नाही. त्यामुळेच भाजपाचा ''सामना'' करण्यासाठी सकाळ संध्याकाळ धनुष्यातून टीकेचे बाण सोडण्याचा एककलमी कार्यक्रम सेना नेतृत्वाकडून सुरू आहे. दसरा मेळाव्यातही त्याचा पुढील अध्याय लिहिला गेला. भाजपाला अयोध्येत राम मंदिर बांधता येत नसेल तर ते बांधण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे आव्हानही शिवसेना पक्षप्रमुखांनी यावेळी दिले. तसेच त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी पुढील महिन्यात अयोध्येकडे कूच करण्याची घोषणाही केली. कालच्या दसरा मेळाव्यातील हीच काय ती मोठी घोषणा आहे. शिवसेनेच्या या घोषणेमुळे पुढच्या दिवसांमध्ये राजकीय वातावरण तापणार आहे. पण त्याचा शिवसेनेला फार मोठा राजकीय लाभ होण्याची शक्यता नाही.  आधीच न्यायप्रविष्ट असलेल्या राम मंदिराच्या विषयावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपाची गोची झाली आहे. आता आपणही अयोध्येकडे कूच करून  सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठायचे आणि दबाव आणून आधीच अडचणीत असलेल्या भाजपकडून हवे ते मान्य करून घ्यायचे, असा सेनेचा डाव असू शकतो. त्यात आता ते कितपत यशस्वी ठरतात, हे पाहावे लागेल. बाकी पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाऊबंदकीतून विरोधक झालेल्या मनसेचा नामोल्लेखही या दसरा मेळाव्यातून करण्यात आला नाही, हे विशेष. तसेच नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर आसूड ओढले जात असताना शिवसेना पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मात्र कुठेही उल्लेख केला नाही. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्या आठवणींना उजाळा देऊन  भाजपाशी कितीही वाद असला, परिस्थिती हाताबाहेर गेली नसल्याचे छुपे संकेतही दिले. मात्र एकंदरीत विचार केल्यास शिवसेना पक्षप्रमुखांनी दसरा मेळाव्यातील संबोधनामध्ये टीका, इशारे आणि आव्हानेच दिल्याने शिवसेनेच्या पुढील निवडणुकीतील भूमिकेबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे.    

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र