शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

Aaditya Thackeray : "कसाबच्या वेळीही इतका बंदोबस्त नव्हता, एवढी भीती कशाला? कोणी पळणार आहे का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 11:41 IST

Shivsena Aaditya Thackeray : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई - विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. भाजपाकडूनराहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या राजन साळवी हे दोन उमेदवार अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक देखील विधान  परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याच दरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "कसाबच्या वेळीही इतका बंदोबस्त नव्हता, एवढी भीती कशाला? कोणी पळणार आहे का?" असा खोचक सवाल विचारला आहे. 

आदित्य ठाकरे यांनी "इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कसाबच्या वेळीदेखील इतका बंदोबस्त लावण्यात आला नव्हता. बसमधून आणलेल्या आमदारांचं मला वाईट वाटतं, कसाबलाही असं आणलं नसेल. कोणी पळणार आहे का? एवढा बंदोबस्त कशासाठी?" अशी विचारणा केली आहे. तसेच एवढा बंदोबस्त हा पहिल्यांदा आहे. आमदारांमध्ये आणि मीडियामध्ये कधी दोरी लावण्यात आली नव्हती. एवढी भीती कशाला? कार्यालय आम्हीच सील केलं आहे. त्याची चावी आमच्याकडेच आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. 

"शिवसेनेचंच व्हीप अधिकृत आहे" असंही आदित्य यांनी सांगितलं. "आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका. आम्हाला धोका दिला ठीक आहे, पण मुंबईकरांना धोका देऊ नका. आरेचं जंगल मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आरेला देखील दोन पर्याय आहेत, एक कांजूरमार्ग आणि दुसरा पहाडी गोरेगाव. मुंबईकरांचा, आमच्या सर्वांचा विचार करणं गरजेचं आहे" असं देखील आरे कारशेडचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. तसेच ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदार यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबई