शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

Aaditya Thackeray : "कधी माईक खेचला तर कधी चिठ्ठी, राज्यात 2 लोकांचं जम्बो सरकार"; आदित्य ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:48 IST

Shivsena Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर कांदिवली आणि बोरिवलीमधील कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला यावेळी बोलताना आदित्य यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधला आहे. 

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचीही ताकद वाढताना दिसत आहे. दुसरीकडे पडलेल्या भगदाडातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. याच दरम्यान आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील नव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांनी "कधी माईक खेचला तर कधी चिठ्ठी, राज्यात 2 लोकांचं जम्बो सरकार" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. तसेच "राज्याचा विकास थांबला आहे, घाणेरडे राजकारण सुरू आहे... खांद्याला खांदा लावून आपल्याला लढायचे आहे" असंही म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर कांदिवली आणि बोरिवलीमधील कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला यावेळी बोलताना आदित्य यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधला आहे. 

"राज्यात पूरपरिस्थिती आहे पण कोणाचे लक्ष नाही"

"मला ताप आला आहे त्यामुळे मी अधिक बोलत नाही. राज्यात लोकांनी निवडलेले सरकार राहिले नाही. आता राज्यात 2 लोकांचे जम्बो सरकार आहे. कधी माईक खेचला जात आहे, कधी चिठ्ठी दिली जाते. राज्यात पूरपरिस्थिती आहे पण कोणाचे लक्ष नाही. हे सरकार तात्पुरती आहे. हे सरकार पडणार आहे. राज्याचा विकास थांबला आहे, घाणेरडे राजकारण सुरू आहे. खांद्याला खांदा लावून आपल्याला लढायचे आहे. आपण जिंकणार हे निश्चित. न्यायालयाच्या निकलानंतर इतर देशात स्थिरता की अस्थिरता हे समजेल" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस