शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Aaditya Thackeray : "कधी माईक खेचला तर कधी चिठ्ठी, राज्यात 2 लोकांचं जम्बो सरकार"; आदित्य ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:48 IST

Shivsena Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर कांदिवली आणि बोरिवलीमधील कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला यावेळी बोलताना आदित्य यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधला आहे. 

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचीही ताकद वाढताना दिसत आहे. दुसरीकडे पडलेल्या भगदाडातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. याच दरम्यान आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील नव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांनी "कधी माईक खेचला तर कधी चिठ्ठी, राज्यात 2 लोकांचं जम्बो सरकार" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. तसेच "राज्याचा विकास थांबला आहे, घाणेरडे राजकारण सुरू आहे... खांद्याला खांदा लावून आपल्याला लढायचे आहे" असंही म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर कांदिवली आणि बोरिवलीमधील कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला यावेळी बोलताना आदित्य यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधला आहे. 

"राज्यात पूरपरिस्थिती आहे पण कोणाचे लक्ष नाही"

"मला ताप आला आहे त्यामुळे मी अधिक बोलत नाही. राज्यात लोकांनी निवडलेले सरकार राहिले नाही. आता राज्यात 2 लोकांचे जम्बो सरकार आहे. कधी माईक खेचला जात आहे, कधी चिठ्ठी दिली जाते. राज्यात पूरपरिस्थिती आहे पण कोणाचे लक्ष नाही. हे सरकार तात्पुरती आहे. हे सरकार पडणार आहे. राज्याचा विकास थांबला आहे, घाणेरडे राजकारण सुरू आहे. खांद्याला खांदा लावून आपल्याला लढायचे आहे. आपण जिंकणार हे निश्चित. न्यायालयाच्या निकलानंतर इतर देशात स्थिरता की अस्थिरता हे समजेल" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस