शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

Aaditya Thackeray : "कधी माईक खेचला तर कधी चिठ्ठी, राज्यात 2 लोकांचं जम्बो सरकार"; आदित्य ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:48 IST

Shivsena Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर कांदिवली आणि बोरिवलीमधील कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला यावेळी बोलताना आदित्य यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधला आहे. 

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचीही ताकद वाढताना दिसत आहे. दुसरीकडे पडलेल्या भगदाडातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. याच दरम्यान आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील नव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांनी "कधी माईक खेचला तर कधी चिठ्ठी, राज्यात 2 लोकांचं जम्बो सरकार" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. तसेच "राज्याचा विकास थांबला आहे, घाणेरडे राजकारण सुरू आहे... खांद्याला खांदा लावून आपल्याला लढायचे आहे" असंही म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर कांदिवली आणि बोरिवलीमधील कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला यावेळी बोलताना आदित्य यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधला आहे. 

"राज्यात पूरपरिस्थिती आहे पण कोणाचे लक्ष नाही"

"मला ताप आला आहे त्यामुळे मी अधिक बोलत नाही. राज्यात लोकांनी निवडलेले सरकार राहिले नाही. आता राज्यात 2 लोकांचे जम्बो सरकार आहे. कधी माईक खेचला जात आहे, कधी चिठ्ठी दिली जाते. राज्यात पूरपरिस्थिती आहे पण कोणाचे लक्ष नाही. हे सरकार तात्पुरती आहे. हे सरकार पडणार आहे. राज्याचा विकास थांबला आहे, घाणेरडे राजकारण सुरू आहे. खांद्याला खांदा लावून आपल्याला लढायचे आहे. आपण जिंकणार हे निश्चित. न्यायालयाच्या निकलानंतर इतर देशात स्थिरता की अस्थिरता हे समजेल" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस