शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Aaditya Thackeray : "युवासैनिकांनो, जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची हीच ती वेळ"; आदित्य ठाकरेचं नवं ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 14:09 IST

Shivsena Aaditya Thackeray : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता युवासैनिकांनी पूरग्रस्त भागात मदत करावी, असं आवाहन केलं आहे.

मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी तर पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. याच दरम्यान आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट केलं आहे. 

राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता युवासैनिकांनी पूरग्रस्त भागात मदत करावी, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करण्यात आले आहे. ""युवासैनिकांनो! आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा... सर्वसामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे... जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची "हीच ती वेळ"" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी तो जास्तच झाल्यामुळे तेथील पिकांची हानी झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात एकूण एक लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला. राज्याच्या १४ जिल्ह्यांत ५१ तालुक्यांमधील काही क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे. यात धुळे, जळगाव, लातूर, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मका, उडीद, तूर, काही ठिकाणी हळदी पिकाचेही नुकसान झाले. नागपूरमधील संत्र्यांच्या बागा, अन्य काही तालुक्यांमधील फळबागाही जास्तीच्या पावसाने बाधित झाल्या आहेत. महसूल विभागाच्या साह्याने पंचनामे करण्यात येत आहेत. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण