शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

शिवघोषांनी रायगड दुमदुमला

By admin | Updated: June 6, 2014 23:09 IST

गड किल्ल्याच्या दुरवस्थेवर केंद्र शासनाचे पूर्णपणो दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी आपण रान पेटवणार असल्याचा इशारा युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी दिला.

युवराज संभाजी महाराजांचा संतप्त सवाल : महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या विकासाकडे केंद्राचे दुर्लक्ष का?
संदीप जाधव - महाड
ज्या राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन मोठय़ा पराक्रमाने गड किल्ले जिंकले आणि साम्राज्य उभारले, या महाराष्ट्रातील त्या गड किल्ल्याच्या दुरवस्थेवर केंद्र शासनाचे पूर्णपणो दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी आपण रान पेटवणार असल्याचा इशारा युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी दिला. 
किल्ले रायगडावर 341 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठय़ा उत्साहात आणि दिमाखदार पध्दतीने साजरा करण्यात आला. त्यावेळी शिवभक्तांना मार्गदर्शन करताना संभाजी महाराज बोलत होते. या सोहळय़ाला राज्यभरातून 5क् हजार पेक्षा अधिक शिवभक्तांनी हजेरी लावली. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवघोषांनी रायगड दुमदुमून गेला होता तर शिवकालीन पेहरावातील मावळे व भगवेमय वातावरणामुळे शिवकाल अवतरल्याचा आभास यावेळी निर्माण झाला होता. संभाजी महाराज म्हणाले की,  शिवराज्याभिषेक या ऐतिहासिक दिनाचे महत्त्व राज्य शासनाला समजले नाही, ही दुर्दैव आहे. आज हजारोंच्या संख्येने आलेल्या शिवभक्तांसाठी साधी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था शासन करु शकले नाही. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.  नुसत्या घोषणा करुन शिवप्रेम दाखवण्यापेक्षा शिवरायांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष कृती करुन दाखवा, असे आवाहनही संभाजी महाराजांनी सत्ताधा:यांना केले.
राजस्थान व अन्य राज्यातील गड किल्ले व पुरातन वास्तूचा विकास व सौंदर्यीकरणासाठी केंद्र शासन कोटय़वधीची उधळण करते. मग महाराष्ट्रातील गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार का कचरते, असा सवालही महाराजांनी केला. सोहळय़ाला जिल्हाधिकारी सुमंत भांगे, अमरावतीचे आ. बच्चू कडू, समितीचे अध्यक्ष इंद्रजित सावंत, शिवचरित्रकार शिवराज शेटय़े, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, सुरेंद्र जाधव, प्रांताधिकारी रवींद्र हजारे, यशवंत गोसावी आदी  उपस्थित होते.
 
पंतप्रधानांवर स्तुतिसुमने
शिवराज्याभिषेक दिन सोहळय़ाप्रसंगी युवराज संभाजी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी हे रायगडावर येवून शिवरायांच्या नतमस्तक झाले होते. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद मोदी यांना लाभला म्हणूनच ते पंतप्रधान झाल्याचे युवराजांनी सांगून गड संवर्धनाच्या कामासाठी आपण मोदी यांची लवकरच भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
मेघडंबरीमधील शिवरायांच्या पुतळय़ाला संभाजी महाराजांच्या हस्ते सुवर्ण मुद्रांचा अभिषेक घातला. यावेळी कोल्हापूरच्या गादीची तलवार उंचावून महाराजांनी शिवभक्तांना अभिवादन केले. त्यावेळी शिवघोषांनी रायगड दुमदुमून गेला होता. पालखी सोहळा, प्रति शिवाजी महाराजांनी यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. 
 
वाहतूक कोंडी : गडाकडे येणा:या वाहनांमुळे सुमारे 5 ते 7 किमी लांब वाहनांची रांग लागली होती. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. वाहतूक पोलिसांचेही यावर नियंत्रण नसल्याने शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या वाहतूक कोंडीचा फटका जिल्हाधिका:यांनाही बसला त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी दोन तास उशिरा पोहचले.