शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

बिहारमधील फॉर्म्युल्याने शिवसेनेला बळ, भाजपात मात्र अस्वस्थता; लोकसभेत निम्म्या जागा मागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 05:24 IST

बिहारमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करताना भाजपाने स्वत:कडे केवळ १७ जागा ठेवत १३ जागा मित्र पक्षांना तडजोडीत सोडल्याने महाराष्ट्रात जागा वाटपाची चर्चा करताना शिवसेनेला अधिकच बळ येणार असल्याचे दिसते.

मुंबई - बिहारमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करताना भाजपाने स्वत:कडे केवळ १७ जागा ठेवत १३ जागा मित्र पक्षांना तडजोडीत सोडल्याने महाराष्ट्रात जागा वाटपाची चर्चा करताना शिवसेनेला अधिकच बळ येणार असल्याचे दिसते.बिहारमध्ये गेल्यावेळी ३० जागा लढविणाऱ्या भाजपाने यंदा १३ जागांवर पाणी सोडले. त्यातील पाच जागा तर गेल्यावेळी जिंकलेल्या होत्या. २०१९ मध्ये स्वबळावर केंद्रात सत्ता येणे कठीण असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपाने मित्र पक्षांना गोंजारणे सुरू केले असल्याचे यावरून दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेला तर अन्य राज्यांमधील भाजपाच्या मित्र पक्षांनादेखील भाजपाकडून अधिक आणि मनासारख्या जागा मिळविता येऊ शकतात, असा विश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये सोमवारी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केल्यानंतर भाजपा-शिवसेनेतील दरी अधिकच वाढली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकसभेसाठीची बोलणी अंतिम टप्प्यात असताना युतीची बोलणी या ताणलेल्या संबंधांमुळे अद्याप सुरू होऊ शकलेली नाही.२०१४ मध्ये युतीत भाजपाने २४ जागा लढविल्या आणि २३ जिंकल्या होत्या. शिवसेनेने २० जागा लढून १८ जिंकल्या होत्या. शिवसेनेकडील तीन-चार जागा आता भाजपाला हव्या आहेत पण तीन राज्यांमधील पराभव, घटक पक्षांना सांभाळून ठेवण्यावर पक्षनेतृत्वाने दिलेला भर यामुळे आता भाजपा जास्तीच्या जागा शिवसेनेकडून घेण्यासाठी आग्रही राहण्याबाबत साशंकता आहे. निम्म्या जागा (२४) आम्हाला द्या, असा आग्रह शिवसेनेकडून होऊ शकतो. आपल्या वाट्याला आलेल्या जागांमध्ये मित्र पक्षांचे समाधानही भाजपाला करावे लागणार आहे.मित्रांची संख्या होतेय कमी२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार हे जवळपास निश्चित आहे. विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनेही आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. ठाकूर यांना सोबत ठेवण्यात भाजपाला अपयश आले. आता रासपा, रिपाइं आणि लोकसंग्राम हे तीन पक्ष भाजपासोबत आहेत. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा