शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील फॉर्म्युल्याने शिवसेनेला बळ, भाजपात मात्र अस्वस्थता; लोकसभेत निम्म्या जागा मागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 05:24 IST

बिहारमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करताना भाजपाने स्वत:कडे केवळ १७ जागा ठेवत १३ जागा मित्र पक्षांना तडजोडीत सोडल्याने महाराष्ट्रात जागा वाटपाची चर्चा करताना शिवसेनेला अधिकच बळ येणार असल्याचे दिसते.

मुंबई - बिहारमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करताना भाजपाने स्वत:कडे केवळ १७ जागा ठेवत १३ जागा मित्र पक्षांना तडजोडीत सोडल्याने महाराष्ट्रात जागा वाटपाची चर्चा करताना शिवसेनेला अधिकच बळ येणार असल्याचे दिसते.बिहारमध्ये गेल्यावेळी ३० जागा लढविणाऱ्या भाजपाने यंदा १३ जागांवर पाणी सोडले. त्यातील पाच जागा तर गेल्यावेळी जिंकलेल्या होत्या. २०१९ मध्ये स्वबळावर केंद्रात सत्ता येणे कठीण असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपाने मित्र पक्षांना गोंजारणे सुरू केले असल्याचे यावरून दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेला तर अन्य राज्यांमधील भाजपाच्या मित्र पक्षांनादेखील भाजपाकडून अधिक आणि मनासारख्या जागा मिळविता येऊ शकतात, असा विश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये सोमवारी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केल्यानंतर भाजपा-शिवसेनेतील दरी अधिकच वाढली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकसभेसाठीची बोलणी अंतिम टप्प्यात असताना युतीची बोलणी या ताणलेल्या संबंधांमुळे अद्याप सुरू होऊ शकलेली नाही.२०१४ मध्ये युतीत भाजपाने २४ जागा लढविल्या आणि २३ जिंकल्या होत्या. शिवसेनेने २० जागा लढून १८ जिंकल्या होत्या. शिवसेनेकडील तीन-चार जागा आता भाजपाला हव्या आहेत पण तीन राज्यांमधील पराभव, घटक पक्षांना सांभाळून ठेवण्यावर पक्षनेतृत्वाने दिलेला भर यामुळे आता भाजपा जास्तीच्या जागा शिवसेनेकडून घेण्यासाठी आग्रही राहण्याबाबत साशंकता आहे. निम्म्या जागा (२४) आम्हाला द्या, असा आग्रह शिवसेनेकडून होऊ शकतो. आपल्या वाट्याला आलेल्या जागांमध्ये मित्र पक्षांचे समाधानही भाजपाला करावे लागणार आहे.मित्रांची संख्या होतेय कमी२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार हे जवळपास निश्चित आहे. विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनेही आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. ठाकूर यांना सोबत ठेवण्यात भाजपाला अपयश आले. आता रासपा, रिपाइं आणि लोकसंग्राम हे तीन पक्ष भाजपासोबत आहेत. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा