शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

कोल्हापुरात शिवसेनेच्या मंत्रिपदाची जोरदार चर्चा

By admin | Updated: April 5, 2017 00:51 IST

आपापल्या पद्धतीने ‘फिल्डिंग’ : नरके, मिणचेकर, क्षीरसागर, सत्यजित पाटील यांच्यापैकी कोण?

कोल्हापूर : मुंबईपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील केवळ कोल्हापूर जिल्ह्याने १० पैकी ६ शिवसेनेचे आमदार निवडून दिले असतानाही हुलकावणी दिलेले मंत्रिपद आता मिळेल असे वातावरण तयार झाले आहे. या मंत्रिपदाची चर्चा जोरदारपणे सुरू झाली असून आता ज्याने त्याने आपापल्यापरीने ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे. ज्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या झेंड्याखाली सर्वपक्षीयांना एकत्र आणत सत्तास्थाने काबीज करायला सुरुवात केली आहे ते पाहता कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेकडून मंत्रिपद नक्कीच दिले जाईल, असे मानले जाते. आमदार राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर आणि उल्हास पाटील हे सहा शिवसेनेचे आमदार कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात त्यांच्यातीलच असंतुष्टांना हाताशी धरून शिवसेनेने जी अभूतपूर्व कामगिरी केली त्याचा हेवा अन्य पक्षांनाही वाटल्याशिवाय राहत नाही हे वास्तव आहे. मात्र, तरीही अडीच वर्षे झाली तरी जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेले नाही. एकापेक्षा एक सरस आमदार असल्याने पक्षप्रमुख निवडीसाठी कोणता निकष लावणार हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर शहरातून नेतृत्व करतात. सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा विश्वास संपादन करीत संघटनेसाठी कोणतीही टोकाची भूमिका घेणारा बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा पाईक अशी प्रतिमा निर्माण करण्यात क्षीरसागर यांना यश आले आहे. चंद्रदीप नरके हे एका साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. चांगले शिक्षण, संयमी वर्तणूक, अभ्यासू प्रतिमा आणि सहकारातील जाण या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. शिवसेनेमध्ये सहकारी संस्थांचे जाळे असणारे कमी नेते आहेत, परंतु एक कारखाना, बँक गेली अनेक वर्षे समर्थपणे सांभाळणारे नेतृत्व म्हणून नरके यांच्याकडे पाहिले जाते. सत्यजित पाटील यांनी आपल्या भागात शिवसेनेचे बस्तान बसवताना विनय कोरे यांच्याशी सातत्याने लढत दिली आहे. ‘गोकुळ’च्या माध्यमातून त्यांचा गावागावांत चांगला संपर्क आहे. सुजित मिणचेकर यांचे नाव पहिल्यापासून मंत्रिपदासाठी चर्चेत होते. ‘शिवसेनेतील मागासवर्गीयांचा चेहरा’ असल्याने मिणचेकर यांना संधी मिळेल असे वातावरण तयार झाले होते. मात्र, ते वास्तवात येऊ शकत नाही. आमदार प्रकाश आबिटकर आणि आमदार उल्हास पाटील हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद निवडीचे पडसादनुक त्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीमध्ये शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर कोल्हापुरात ठिय्या मारून बसले. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावे यासाठी जोरदार नियोजन करण्यात आले; परंतु आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर आणि शेवटच्या टप्प्यात सत्यजित पाटील हे भाजपसोबत गेले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाल्याचे समजते. याबाबतचा अहवालही जिल्हा प्रमुखांनी पाठविला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपद देणार का आणि दिले तर नेमके कुणाला याची उत्सुकता मात्र शिवसैनिकांना लागून राहिली आहे.