शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

कोल्हापुरात शिवसेनेच्या मंत्रिपदाची जोरदार चर्चा

By admin | Updated: April 5, 2017 00:51 IST

आपापल्या पद्धतीने ‘फिल्डिंग’ : नरके, मिणचेकर, क्षीरसागर, सत्यजित पाटील यांच्यापैकी कोण?

कोल्हापूर : मुंबईपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील केवळ कोल्हापूर जिल्ह्याने १० पैकी ६ शिवसेनेचे आमदार निवडून दिले असतानाही हुलकावणी दिलेले मंत्रिपद आता मिळेल असे वातावरण तयार झाले आहे. या मंत्रिपदाची चर्चा जोरदारपणे सुरू झाली असून आता ज्याने त्याने आपापल्यापरीने ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे. ज्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या झेंड्याखाली सर्वपक्षीयांना एकत्र आणत सत्तास्थाने काबीज करायला सुरुवात केली आहे ते पाहता कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेकडून मंत्रिपद नक्कीच दिले जाईल, असे मानले जाते. आमदार राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर आणि उल्हास पाटील हे सहा शिवसेनेचे आमदार कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात त्यांच्यातीलच असंतुष्टांना हाताशी धरून शिवसेनेने जी अभूतपूर्व कामगिरी केली त्याचा हेवा अन्य पक्षांनाही वाटल्याशिवाय राहत नाही हे वास्तव आहे. मात्र, तरीही अडीच वर्षे झाली तरी जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेले नाही. एकापेक्षा एक सरस आमदार असल्याने पक्षप्रमुख निवडीसाठी कोणता निकष लावणार हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर शहरातून नेतृत्व करतात. सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा विश्वास संपादन करीत संघटनेसाठी कोणतीही टोकाची भूमिका घेणारा बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा पाईक अशी प्रतिमा निर्माण करण्यात क्षीरसागर यांना यश आले आहे. चंद्रदीप नरके हे एका साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. चांगले शिक्षण, संयमी वर्तणूक, अभ्यासू प्रतिमा आणि सहकारातील जाण या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. शिवसेनेमध्ये सहकारी संस्थांचे जाळे असणारे कमी नेते आहेत, परंतु एक कारखाना, बँक गेली अनेक वर्षे समर्थपणे सांभाळणारे नेतृत्व म्हणून नरके यांच्याकडे पाहिले जाते. सत्यजित पाटील यांनी आपल्या भागात शिवसेनेचे बस्तान बसवताना विनय कोरे यांच्याशी सातत्याने लढत दिली आहे. ‘गोकुळ’च्या माध्यमातून त्यांचा गावागावांत चांगला संपर्क आहे. सुजित मिणचेकर यांचे नाव पहिल्यापासून मंत्रिपदासाठी चर्चेत होते. ‘शिवसेनेतील मागासवर्गीयांचा चेहरा’ असल्याने मिणचेकर यांना संधी मिळेल असे वातावरण तयार झाले होते. मात्र, ते वास्तवात येऊ शकत नाही. आमदार प्रकाश आबिटकर आणि आमदार उल्हास पाटील हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद निवडीचे पडसादनुक त्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीमध्ये शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर कोल्हापुरात ठिय्या मारून बसले. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावे यासाठी जोरदार नियोजन करण्यात आले; परंतु आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर आणि शेवटच्या टप्प्यात सत्यजित पाटील हे भाजपसोबत गेले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाल्याचे समजते. याबाबतचा अहवालही जिल्हा प्रमुखांनी पाठविला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपद देणार का आणि दिले तर नेमके कुणाला याची उत्सुकता मात्र शिवसैनिकांना लागून राहिली आहे.