शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, सत्तेत राहून मात्र विरोध करणार- विनायक राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 21:27 IST

महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व कुठे दिसत नाही. त्यामुळेच शिवसेनेला सत्तेमध्ये राहूनही आंदोलने करावी लागत आहेत. याचा अर्थ सत्तेतून बाहेर पडणार असा होत नाही, असा खुलासा खासदार विनायक राऊत यांनी केला. दसरा मेळाव्यात शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत ही राऊत यांनी दिले ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सावंतवाडी, दि. 25 - महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व कुठे दिसत नाही. त्यामुळेच शिवसेनेला सत्तेमध्ये राहूनही आंदोलने करावी लागत आहेत. याचा अर्थ सत्तेतून बाहेर पडणार असा होत नाही, असा खुलासा खासदार विनायक राऊत यांनी केला. दसरा मेळाव्यात शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत ही राऊत यांनी दिले ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.खासदार राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी गाव पॅनेल आहे, तेथे शिवसेनेचे सहकार्य राहणार आहे. मात्र जेथे स्वबळावर लढण्याचे ठरवण्यात आले आहे तेथे शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढवेल, असे स्पष्ट केले. आमची लढाई अद्याप कोणाशी ठरली नाही. गावात राणेंच्या समर्थ विकास पॅनेलला कोणीही साथ देणार नाही. तर काँग्रेस पूर्णपणे खिळखिळी झाली आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.नारायण राणे हे आमच्यावर टक्केवारीचे आरोप करतात. त्यांची सवय आम्हाला चांगली माहीत आहे. मी एक महिन्याचा कालावधी देतो. त्यांनी एक तरी ठेकेदार दाखवून द्यावा ज्याच्याकडून आम्ही टक्केवारी घेतो. ठेकेदार कंपनी राणेंचीच आहे. कोणाचे ते त्यांनी प्रतिज्ञापत्र घ्यावे, असे आव्हान यावेळी राऊत यांनी दिले. शिवसेना दसरा मेळाव्यात सत्तेतून बाहेर पडणार का, असे विचारले असता त्यांनी याबाबतचा निर्णय सर्वस्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याचे स्पष्ट केले.मात्र, शिवसेना सत्तेमध्ये राहून करत असलेल्या आंदोलनाबाबत विचारले असता सध्या विरोधी पक्ष कुठेच दिसत नाही. त्यामुळे आम्हाला सत्तेमध्ये राहून आंदोलने करावी लागतात. याचा अर्थ सत्तेमधून बाहेर पडणार असा होत नाही. सत्तेमध्ये राहूनही लोकांची कामे होऊ शकतात, मग सत्तेतून बाहेर का पडावे, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. राणे यांच्या भाजपा प्रवेशामुळे शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. राणे आले म्हणून शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, उलट सहा महिन्यात मित्रपक्ष भाजपलाच राणेंना घेतल्याचा पश्चाताप होईल. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणताही त्रास नाही. ते निवांतपणे काम करतात. पण राणे आल्यानंतर त्यांना त्रास देण्यास सुरू करतील. जिल्ह्यातील भाजपचे नेते सध्या चांगले काम करीत आहेत. पण त्यांनाही राणे  भाजपात आल्यावर काय ते कळेल त्याची आम्हाला काळजी वाटते, असा उपरोधिक टोलाही राऊत यांनी भाजप नेत्यांना हाणला.