शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

आर्थिक मंदीवरून शिवसेना सावध; बिनधास्त भाजपला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 16:25 IST

शिवसेनेने भाजपला उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आर्थिक मंदीवरून शिवसेना वेळीच सावध झाली असून भाजप अद्याप बिनधास्त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मुंबई - राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या तयारीत भाजप सर्वात पुढे आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. परंतु, देशातील अर्थव्यवस्थेची बिघडली स्थिती आणि त्यामुळे बेरोजगारीची वाढती समस्या याकडे भाजप फारसे गांभीर्याने पाहात नसल्याचे चित्र आहे. तर विरोधकही यावर फारसे आक्रमक दिसत नाहीत. परंतु, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आर्थिक मंदीकडे डोळसपणे पाहण्यास सुरुवात केली असून भाजपला उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक जाहीर केलेली नोटबंदी आणि अपुऱ्या तयारीने लागू करण्यात आलेली जीएसटी यामुळे देशावर आर्थिक मंदीचे सावट आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अनेक अर्थतज्ज्ञांनी देखील विरोधकांच्या आरोपांवर सहमती दर्शविली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक उद्योग बंद पडत आहेत. एकट्या महाराष्ट्रात लाखाहून अधिक उद्योग बंद पडल्याची कबुली खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच दिली होती. त्यामुळे बेरोजगारीची समस्या भीषण होणार असंच दिसत आहे.

देशात आलेली मंदी आणि वाढत्या बेरोजगारीमुळे शिवसेनेने वेळीच मित्रपक्षाला इशारा दिला आहे. शिवसेनेने भाजपवर सामनातून टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली होती. तसेच सुडाचं राजकारण सोडून अर्थव्यवस्था सुधारण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, भाजपकडून त्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखविण्यात आली असून उलट मनमोहन सिंग यांच्यावरच टीका करण्यात आली आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. दररोज कामगार कमी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यातच राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. यावर उपयायोजना केल्या नाही, तर सत्ताधाऱ्यांनाच याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आर्थिक मंदीवरून शिवसेना वेळीच सावध झाली असून भाजप अद्याप बिनधास्त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.