शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

आर्थिक मंदीवरून शिवसेना सावध; बिनधास्त भाजपला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 16:25 IST

शिवसेनेने भाजपला उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आर्थिक मंदीवरून शिवसेना वेळीच सावध झाली असून भाजप अद्याप बिनधास्त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मुंबई - राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या तयारीत भाजप सर्वात पुढे आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. परंतु, देशातील अर्थव्यवस्थेची बिघडली स्थिती आणि त्यामुळे बेरोजगारीची वाढती समस्या याकडे भाजप फारसे गांभीर्याने पाहात नसल्याचे चित्र आहे. तर विरोधकही यावर फारसे आक्रमक दिसत नाहीत. परंतु, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आर्थिक मंदीकडे डोळसपणे पाहण्यास सुरुवात केली असून भाजपला उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक जाहीर केलेली नोटबंदी आणि अपुऱ्या तयारीने लागू करण्यात आलेली जीएसटी यामुळे देशावर आर्थिक मंदीचे सावट आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अनेक अर्थतज्ज्ञांनी देखील विरोधकांच्या आरोपांवर सहमती दर्शविली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक उद्योग बंद पडत आहेत. एकट्या महाराष्ट्रात लाखाहून अधिक उद्योग बंद पडल्याची कबुली खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच दिली होती. त्यामुळे बेरोजगारीची समस्या भीषण होणार असंच दिसत आहे.

देशात आलेली मंदी आणि वाढत्या बेरोजगारीमुळे शिवसेनेने वेळीच मित्रपक्षाला इशारा दिला आहे. शिवसेनेने भाजपवर सामनातून टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली होती. तसेच सुडाचं राजकारण सोडून अर्थव्यवस्था सुधारण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, भाजपकडून त्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखविण्यात आली असून उलट मनमोहन सिंग यांच्यावरच टीका करण्यात आली आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. दररोज कामगार कमी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यातच राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. यावर उपयायोजना केल्या नाही, तर सत्ताधाऱ्यांनाच याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आर्थिक मंदीवरून शिवसेना वेळीच सावध झाली असून भाजप अद्याप बिनधास्त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.