शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

आर्थिक मंदीवरून शिवसेना सावध; बिनधास्त भाजपला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 16:25 IST

शिवसेनेने भाजपला उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आर्थिक मंदीवरून शिवसेना वेळीच सावध झाली असून भाजप अद्याप बिनधास्त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मुंबई - राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या तयारीत भाजप सर्वात पुढे आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. परंतु, देशातील अर्थव्यवस्थेची बिघडली स्थिती आणि त्यामुळे बेरोजगारीची वाढती समस्या याकडे भाजप फारसे गांभीर्याने पाहात नसल्याचे चित्र आहे. तर विरोधकही यावर फारसे आक्रमक दिसत नाहीत. परंतु, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आर्थिक मंदीकडे डोळसपणे पाहण्यास सुरुवात केली असून भाजपला उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक जाहीर केलेली नोटबंदी आणि अपुऱ्या तयारीने लागू करण्यात आलेली जीएसटी यामुळे देशावर आर्थिक मंदीचे सावट आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अनेक अर्थतज्ज्ञांनी देखील विरोधकांच्या आरोपांवर सहमती दर्शविली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक उद्योग बंद पडत आहेत. एकट्या महाराष्ट्रात लाखाहून अधिक उद्योग बंद पडल्याची कबुली खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच दिली होती. त्यामुळे बेरोजगारीची समस्या भीषण होणार असंच दिसत आहे.

देशात आलेली मंदी आणि वाढत्या बेरोजगारीमुळे शिवसेनेने वेळीच मित्रपक्षाला इशारा दिला आहे. शिवसेनेने भाजपवर सामनातून टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली होती. तसेच सुडाचं राजकारण सोडून अर्थव्यवस्था सुधारण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, भाजपकडून त्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखविण्यात आली असून उलट मनमोहन सिंग यांच्यावरच टीका करण्यात आली आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. दररोज कामगार कमी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यातच राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. यावर उपयायोजना केल्या नाही, तर सत्ताधाऱ्यांनाच याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आर्थिक मंदीवरून शिवसेना वेळीच सावध झाली असून भाजप अद्याप बिनधास्त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.