शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

शिवसेनेला एकहाती सत्ता हवी - उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा

By admin | Updated: July 24, 2015 20:08 IST

रितसर पाठिंबा मागितल्याने शिवसेनेने भाजपाला साथ दिली पण आता राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता यायला हवी असा आशावाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २४ - राज्यात स्थिर सरकारसाठी व भाजपाने रितसर पाठिंबा मागितल्याने शिवसेनेने भाजपाला साथ दिली पण आता राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता यायला हवी असा आशावाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. जे प्रश्न काँग्रेसवाले सत्तेत असताना सोडवू शकले नाहीत दुर्दैवाने तेच प्रश्न घेऊन काँग्रेस नेते गोंधळ घालतात असा चिमटाही त्यांनी विरोधी पक्षांना काढला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला मुलाखत दिली असून यामध्ये त्यांनी भाजपासोबत युती तुटल्याची खंत वाटते असे सांगितले. युती अनाकलनीय पद्धतीने तुटली, मला पुन्हा कोळसा उगाळायचा नाही, पण शिवसेना एकाकी लढली व एकट्याच्या जोरावर शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले असे त्यांनी नमूद केले.सत्तास्थापनेत भाजपाला शिवेसेनेचीच मदत घ्यावी लागली, त्यांनी रितसर पाठिंबा मागितल्याने आम्ही भाजपासोबत गेलो असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या भ्रष्टमंत्र्यांची चौकशी करावी, यामुळे जनतेसमोर सत्य समोर येईल व विरोधकांच्या आरोपांमधील हवाही निघून जाईल असे मतही त्यांनी मांडले आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या ना-याने युतीतूल धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.