शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

Maharashtra Politics: “मुख्यमंत्र्यांसह ५० खोके आमदारांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 11:57 IST

Maharashtra News: शिंदे गट आणि राणा दाम्पत्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे बाहुले आहेत, अशी टीका युवासेना नेते शरद कोळींनी केली आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेकडून सातत्याने शिंदे गटावर टीका होताना दिसत आहे. बंडखोर आमदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला पाठिंबा दिलेले आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेने शिंदे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांसह ५० खोके आमदारांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या राणा दाम्पत्यावर शरद कोळी यांनी शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. राज्यात राणा कंपनीने तमाशाचा फड मांडलाय, हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे बाहुले आहेत. ते जसे हलवीतील हे तसे नाचतात, ती तामशागिर करणारी हे टोळी आहे, असा घणाघात शरद कोळी यांनी केला आहे. 

५० खोके आमदारांचा कार्यक्रम केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही

५० खोके घेतलेले आहेत हे एकमेकांना माहिती आहे. हे प्रकरण बाहेर आले तर अनेक मासे गळाला लागतील. या आमदारांचा दिल्लीतूनच गेम झाला आहे. मुख्यमंत्री आणि हे ५० खोके आमदारांना लवकरच भाजपची खेळी कळेल. या ५० च्या ५० आमदारांचा बिमोड लवकरच होणार आहे. ही सगळी भाजपची खेळी होती, तेही त्यांना कळून चुकणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसह ५० खोके आमदारांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, अशी टीका शरद कोळी यांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीड