शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Uddhav Thackeray : ... म्हणून बारसूसाठी माझ्याकडून पत्र दिलं गेलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 20:04 IST

प्रकल्प येणार हे तुम्हाला माहित होते. आता हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसलेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.

“आज मी बारसूत गेलेलो, तिकडे माझं पत्र दाखवत होते. हो मी दिलं होतं. मला खोटं बोलता येत नाही. खोटं बोलण्याची गरज नाही, मी पाप केलं नाही. ही गद्दार उपऱ्यांच्या सुपाऱ्या घेऊन नाचतायत. यादीत उपऱ्यांची नावं आहेत. तिथल्या लोकांना मधाचं बोट लावून सोन्यासारख्या जमिनी घेतल्या. प्रकल्प येणार हे तुम्हाला माहित होते. आता हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसलेत,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. नाणारमध्ये आम्ही रिफायनरी होऊ दिली नाही. नंतर मला दिल्लीतून फोन आले. तिकडे गेलेले गद्दार माझ्याकडे यायचे, मोठा प्रकल्प आहे. जर विनाशकारी प्रकल्प असेल तर गुजरातला जाऊ द्या असं सांगितलं. तिकडे कोणाचा विरोध नाही, वस्त्या गावं नाही, ओसाड जमिन आहे. म्हणून माझ्याकडून पत्र देण्यात आलं. आता एकंदरीत पाहिलं तर तिकडून संमती आली आणि आपलं सरकार पाडलं गेलं, असंही त्यांनी नमूद केलं.

“अंतिम मंजुरी मी तिकडे जाईन, लोकांशी बोलेन, कंपनीला सांगेन प्रेझेंटेशन द्या, लोकांनी हो म्हटलं तर प्रकल्प येईल, नाही म्हटलं तर बाहेरचा रस्ता, हे का नाही सांगितलं जात. संपूर्ण पोलीस दल बारसूत उतरवलं आहे,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. महाडमध्ये आयोजित शिवगर्जना सभेत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

“आज मी सकाळी बारसूला जाऊन आलो. विशेष म्हणजे हा महाड मतदारसंघ आपला आहे. केवळ निवडणुकीपुरता नाही. भगव्याला कलंक लावण्याची कोणाची हिंमत नाही. इकडे जशी मतं आहेत तशी पवित्र मातीही आहेत. यात राजकारणात गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला.

“आता आपल्याला मैदानं अपुरी पडतायत. अनेकांना वाटलं शिवसेना संपली, संपवली पाहिजे. काहींचा गैरसमज आहे तेच म्हणजे शिवसेना. त्यांना मोठी केलेली लोकं आज माझ्यासोबत आहेत. माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना भाकर मिळत नाही असं वाटतंय,” असं उद्धव ठाकरे आपल्या सभेदरम्यान म्हणाले.

“जगताप कुटुंबीय काँग्रेसमधून आलं. काहींच्या भूवया उंचावल्या. काहींच्या पोटात गोळाही आला की पुढच्या निवडणुकीत आपलं डिपॉझिट जप्त. काँग्रेसमधून शिवसेनेत आले शिवसैनिकांचं काय होणार? आमच्यातला गद्दार घेऊन भाजपनं डोक्यावर नाही का चढवला,” असं ते म्हणाले. येत्या काही महिन्यांत आणखी काही जण येणार आहेत. मविआ म्हणून आपण पुढे जातोय म्हणजे आम्ही काँग्रेस फोडतोय का असं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश

स्नेहल जगताप यांनी अनेक समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. “मी वडिलांचा हात धरून राजकारणात आले, त्यांची उणीव आज भासते. कोरोनानं त्यांना आमच्यापासून हिरावून घेतलं,” अशी आपल्या वडिलांची आठवण त्यांनी सांगितली. दरम्यान, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचे आभारही मानले. तसंच यावेळी निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्प