शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Uddhav Thackeray : ... म्हणून बारसूसाठी माझ्याकडून पत्र दिलं गेलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 20:04 IST

प्रकल्प येणार हे तुम्हाला माहित होते. आता हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसलेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.

“आज मी बारसूत गेलेलो, तिकडे माझं पत्र दाखवत होते. हो मी दिलं होतं. मला खोटं बोलता येत नाही. खोटं बोलण्याची गरज नाही, मी पाप केलं नाही. ही गद्दार उपऱ्यांच्या सुपाऱ्या घेऊन नाचतायत. यादीत उपऱ्यांची नावं आहेत. तिथल्या लोकांना मधाचं बोट लावून सोन्यासारख्या जमिनी घेतल्या. प्रकल्प येणार हे तुम्हाला माहित होते. आता हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसलेत,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. नाणारमध्ये आम्ही रिफायनरी होऊ दिली नाही. नंतर मला दिल्लीतून फोन आले. तिकडे गेलेले गद्दार माझ्याकडे यायचे, मोठा प्रकल्प आहे. जर विनाशकारी प्रकल्प असेल तर गुजरातला जाऊ द्या असं सांगितलं. तिकडे कोणाचा विरोध नाही, वस्त्या गावं नाही, ओसाड जमिन आहे. म्हणून माझ्याकडून पत्र देण्यात आलं. आता एकंदरीत पाहिलं तर तिकडून संमती आली आणि आपलं सरकार पाडलं गेलं, असंही त्यांनी नमूद केलं.

“अंतिम मंजुरी मी तिकडे जाईन, लोकांशी बोलेन, कंपनीला सांगेन प्रेझेंटेशन द्या, लोकांनी हो म्हटलं तर प्रकल्प येईल, नाही म्हटलं तर बाहेरचा रस्ता, हे का नाही सांगितलं जात. संपूर्ण पोलीस दल बारसूत उतरवलं आहे,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. महाडमध्ये आयोजित शिवगर्जना सभेत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

“आज मी सकाळी बारसूला जाऊन आलो. विशेष म्हणजे हा महाड मतदारसंघ आपला आहे. केवळ निवडणुकीपुरता नाही. भगव्याला कलंक लावण्याची कोणाची हिंमत नाही. इकडे जशी मतं आहेत तशी पवित्र मातीही आहेत. यात राजकारणात गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला.

“आता आपल्याला मैदानं अपुरी पडतायत. अनेकांना वाटलं शिवसेना संपली, संपवली पाहिजे. काहींचा गैरसमज आहे तेच म्हणजे शिवसेना. त्यांना मोठी केलेली लोकं आज माझ्यासोबत आहेत. माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना भाकर मिळत नाही असं वाटतंय,” असं उद्धव ठाकरे आपल्या सभेदरम्यान म्हणाले.

“जगताप कुटुंबीय काँग्रेसमधून आलं. काहींच्या भूवया उंचावल्या. काहींच्या पोटात गोळाही आला की पुढच्या निवडणुकीत आपलं डिपॉझिट जप्त. काँग्रेसमधून शिवसेनेत आले शिवसैनिकांचं काय होणार? आमच्यातला गद्दार घेऊन भाजपनं डोक्यावर नाही का चढवला,” असं ते म्हणाले. येत्या काही महिन्यांत आणखी काही जण येणार आहेत. मविआ म्हणून आपण पुढे जातोय म्हणजे आम्ही काँग्रेस फोडतोय का असं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश

स्नेहल जगताप यांनी अनेक समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. “मी वडिलांचा हात धरून राजकारणात आले, त्यांची उणीव आज भासते. कोरोनानं त्यांना आमच्यापासून हिरावून घेतलं,” अशी आपल्या वडिलांची आठवण त्यांनी सांगितली. दरम्यान, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचे आभारही मानले. तसंच यावेळी निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्प