शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: “सुषमा अंधारेंमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली, शहाजी बापूंचे राजकीय वजन २०२४ला संपवू”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 19:13 IST

Maharashtra News: शिंदे गटातील नेत्यांनी केलेल्या टीकेचा ठाकरे गटाच्या युवासेनेच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला.

Maharashtra Politics: राज्यातील राजकीय वातावरण अनेकविध मुद्द्यांवरून तापलेले पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, दुसरीकडे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष तीव्र होत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. यातच आता सुषमा अंधारे यांच्या सभांमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तसेच शहाजी बापू यांचे उरलेले राजकीय वजन २०२४ च्या निवडणुकीत संपवू, असा इशारा देण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात सामील होत असल्याचे चित्र आहे. अलीकडेच नाशिकमधील ठाकरे गटातील सुमारे ५० पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच सुषमा अंधारे यांच्या सभांना शे-पाचशे लोकांची गर्दी असते, असा टोला शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी लगावला होता. याला ठाकरे गटाचे युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळींनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सुषमा अंधारेंमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या राज्यभरातील सभांमुळे शिंदे-मिंधे गट असेल किंवा भाजप असेल, यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचा थयथयाट सुरू आहे. मात्र, सुषमा अंधारे यांची सभा शंभर-पाचशे लोकांची नसून, १५ ते २० हजार लोक सभेला येतात. सुषमा अंधारे यांच्या सभेचे व्हिडिओ पाहा, शहाजी बापू तुमची झोप उडेल. शहाजी बापू पाटील आमचे मित्र आहेत, यानिमित्ताने सांगू इच्छितो की, तुम्ही शारिरीक वजन कमी केले ही चांगली गोष्ट आहे. आरोग्य चांगले ठेवायला हवे. पण तुमचे उरले-सुरलेले राजकीय वजन आम्ही २०२४ च्या निवडणुकीत संपवू, असा इशारा शरद कोळी यांनी दिला. 

सुषमा अंधारे यांच्या सभेचा शहाजी बापूंनी धसका घेतला

सुषमा अंधारे यांची सभा झाली. तेव्हा शहाजी बापू पळून गेले. सुषमा अंधारे यांच्या सभांचा शहाजी बापू पाटील यांनी धसका घेतला. त्यामुळे यापुढे मी सांगोल्याचा आमदार नाही. मी सांगोल्याचा आमदार होऊ शकणार नाही, असे शहाजी बापूंनी सांगून टाकले. हे सुषमा अंधारे यांच्या सभेमुळे झाले. शहाजी बापू पाटील जाणून-बुजून अशी विधाने करत आहेत, अशी टीका शरद कोळी यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण