शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

Maharashtra Politics: “सुषमा अंधारेंमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली, शहाजी बापूंचे राजकीय वजन २०२४ला संपवू”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 19:13 IST

Maharashtra News: शिंदे गटातील नेत्यांनी केलेल्या टीकेचा ठाकरे गटाच्या युवासेनेच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला.

Maharashtra Politics: राज्यातील राजकीय वातावरण अनेकविध मुद्द्यांवरून तापलेले पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, दुसरीकडे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष तीव्र होत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. यातच आता सुषमा अंधारे यांच्या सभांमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तसेच शहाजी बापू यांचे उरलेले राजकीय वजन २०२४ च्या निवडणुकीत संपवू, असा इशारा देण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात सामील होत असल्याचे चित्र आहे. अलीकडेच नाशिकमधील ठाकरे गटातील सुमारे ५० पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच सुषमा अंधारे यांच्या सभांना शे-पाचशे लोकांची गर्दी असते, असा टोला शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी लगावला होता. याला ठाकरे गटाचे युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळींनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सुषमा अंधारेंमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या राज्यभरातील सभांमुळे शिंदे-मिंधे गट असेल किंवा भाजप असेल, यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचा थयथयाट सुरू आहे. मात्र, सुषमा अंधारे यांची सभा शंभर-पाचशे लोकांची नसून, १५ ते २० हजार लोक सभेला येतात. सुषमा अंधारे यांच्या सभेचे व्हिडिओ पाहा, शहाजी बापू तुमची झोप उडेल. शहाजी बापू पाटील आमचे मित्र आहेत, यानिमित्ताने सांगू इच्छितो की, तुम्ही शारिरीक वजन कमी केले ही चांगली गोष्ट आहे. आरोग्य चांगले ठेवायला हवे. पण तुमचे उरले-सुरलेले राजकीय वजन आम्ही २०२४ च्या निवडणुकीत संपवू, असा इशारा शरद कोळी यांनी दिला. 

सुषमा अंधारे यांच्या सभेचा शहाजी बापूंनी धसका घेतला

सुषमा अंधारे यांची सभा झाली. तेव्हा शहाजी बापू पळून गेले. सुषमा अंधारे यांच्या सभांचा शहाजी बापू पाटील यांनी धसका घेतला. त्यामुळे यापुढे मी सांगोल्याचा आमदार नाही. मी सांगोल्याचा आमदार होऊ शकणार नाही, असे शहाजी बापूंनी सांगून टाकले. हे सुषमा अंधारे यांच्या सभेमुळे झाले. शहाजी बापू पाटील जाणून-बुजून अशी विधाने करत आहेत, अशी टीका शरद कोळी यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण