शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Maharashtra Politics: “सुषमा अंधारेंमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली, शहाजी बापूंचे राजकीय वजन २०२४ला संपवू”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 19:13 IST

Maharashtra News: शिंदे गटातील नेत्यांनी केलेल्या टीकेचा ठाकरे गटाच्या युवासेनेच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला.

Maharashtra Politics: राज्यातील राजकीय वातावरण अनेकविध मुद्द्यांवरून तापलेले पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, दुसरीकडे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष तीव्र होत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. यातच आता सुषमा अंधारे यांच्या सभांमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तसेच शहाजी बापू यांचे उरलेले राजकीय वजन २०२४ च्या निवडणुकीत संपवू, असा इशारा देण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात सामील होत असल्याचे चित्र आहे. अलीकडेच नाशिकमधील ठाकरे गटातील सुमारे ५० पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच सुषमा अंधारे यांच्या सभांना शे-पाचशे लोकांची गर्दी असते, असा टोला शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी लगावला होता. याला ठाकरे गटाचे युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळींनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सुषमा अंधारेंमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या राज्यभरातील सभांमुळे शिंदे-मिंधे गट असेल किंवा भाजप असेल, यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचा थयथयाट सुरू आहे. मात्र, सुषमा अंधारे यांची सभा शंभर-पाचशे लोकांची नसून, १५ ते २० हजार लोक सभेला येतात. सुषमा अंधारे यांच्या सभेचे व्हिडिओ पाहा, शहाजी बापू तुमची झोप उडेल. शहाजी बापू पाटील आमचे मित्र आहेत, यानिमित्ताने सांगू इच्छितो की, तुम्ही शारिरीक वजन कमी केले ही चांगली गोष्ट आहे. आरोग्य चांगले ठेवायला हवे. पण तुमचे उरले-सुरलेले राजकीय वजन आम्ही २०२४ च्या निवडणुकीत संपवू, असा इशारा शरद कोळी यांनी दिला. 

सुषमा अंधारे यांच्या सभेचा शहाजी बापूंनी धसका घेतला

सुषमा अंधारे यांची सभा झाली. तेव्हा शहाजी बापू पळून गेले. सुषमा अंधारे यांच्या सभांचा शहाजी बापू पाटील यांनी धसका घेतला. त्यामुळे यापुढे मी सांगोल्याचा आमदार नाही. मी सांगोल्याचा आमदार होऊ शकणार नाही, असे शहाजी बापूंनी सांगून टाकले. हे सुषमा अंधारे यांच्या सभेमुळे झाले. शहाजी बापू पाटील जाणून-बुजून अशी विधाने करत आहेत, अशी टीका शरद कोळी यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण