शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “पुढील ६ महिन्यांत १०० टक्के मध्यावधी निवडणुका लागणार”; ठाकरे गट ठाम, आधारही सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 15:02 IST

Maharashtra Politics: शिंदे सरकार कोसळल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल, असा दावाही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: एकीकडे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढताना दिसत असून, दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्यासंदर्भात नवनवीत तारखा महाविकास आघाडीकडून देण्यात येत आहेत. तसेच राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्यासंदर्भात महाविकास आघाडीतच मतभेद असल्याचे दिसून येत आहे. कारण संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मध्यावधी निवडणुका लागण्याचा केलेला दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी फेटाळून लावला आहे. यातच आता ठाकरे गट मध्यावधी निवडणुका लागण्याबाबत ठाम असून, याचा आधारही देण्यात आला आहे. 

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी पुढील ६ महिन्यांत १०० टक्के मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. शिंदे-भाजप सरकार कोसळणार आहे, असे ठामपणे सांगितले आहे. शिंदे सरकार वैध आहे की अवैध यासंबंधीची केस सुप्रीम कोर्टात सुरु आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, कितीही विलंब केला तरी पुढील सहा महिन्यात हा निकाल लागणार आहे. त्यानंतर हे सरकार कोसळेल. तसेच कदाचित राष्ट्रपती राजवट लागेल आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील, असा दावा राऊत यांनी केला. 

दोन दिवसांपूर्वीची गद्दारी अपेक्षित होती

महाविकास आघाडीतील १३ ते १४ आमदार शिंदे गट आणि भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. यावर बोलताना, स्वप्न पहातच बसावी त्यांनी. शेवटची गद्दारी दोन दिवसांपूर्वी झाली. ती आम्हाला अपेक्षित होती. त्यामुळे त्या गद्दारीचे फार मोठे वैषम्य वाटले नाही. बेईमानी करून त्यांनी ते थांबले नाहीत. शिवसेनेच्या अस्तित्वाला हात घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे शिवसैनिक पेटून उठले आहेत. ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा विनायक राऊतांनी दिला. 

दरम्यान, शिंदे गटातील काही नेते पुन्हा ठाकरे गटात येण्याच्या विचारात आहेत, या चर्चांवर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, शिंदे गटातल्या लोकांना पुन्हा प्रामाणिक आणि सच्च्या कार्यकर्त्यांच्या घरात घ्यावं कुणालाच वाटत नाही. आमच्या संपर्कात नसले तरी एकमेकांच्या मानेवर बसत आहेत. तात्पुरते गळ्यात गळे घातलेत पण आता गळे ओरबाडण्याचा प्रयत्न सुरु झाला, अशी टीका राऊतांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी