शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Maharashtra Politics: शीतल म्हात्रे प्रकरणात नवा ट्विस्ट! राज प्रकाश सुर्वेंना अटक का नाही? नव्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 12:44 IST

Maharashtra News: मुंबई पोलिसांनी दबावाखाली काम करू नये. अन्यथा मुंबई पोलिसांचा सन्मान मातीत मिळेल, असे सांगत ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका केली.

Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा मॉर्फ केला असल्याचे सरकारतर्फे विधानसभेत सांगण्यात आले. यामागचे सूत्रधार शोधण्यासाठी एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात केली. यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या एका दाव्यावरून खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचे सांगितले जात आहे. 

हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागे ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचे सरकारने स्पष्ट केले. फक्त सुर्वे आणि म्हात्रे यांचे राजकीय आणि वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे. ठाकरे गटाचे मीडिया को-ऑर्डिनेटर विनायक डावरे याने मातोश्री पेजवरून हा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर तो इतरांनी सोशल मीडियावर व्हायरल केला, असे सांगत यामागे ठाकरे गट असल्याचे सूचित करण्यात आले. यानंतर आता प्रियंका चतुर्वेदी यांनी नवा दावा केला आहे. 

राज प्रकाश सुर्वेंना अटक का नाही?

तो व्हिडीओ आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या अकाऊंटवरही लाइव्ह होता. मग त्यांना का अटक केली नाही? असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्या रॅलीचा व्हिडीओ प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांच्या अकाऊंटवर लाइव्ह होता. त्यांची बदनामी ही प्रकाश सुर्वेंच्या घरातूनच सुरू झाली. त्यामुळे अटक करायची होती तर त्यांना करायची होती. मुंबई पोलिसांनी दबावाखाली काम करू नये. अन्यथा मुंबई पोलिसांचा जो सन्मान आहे तो मातीत मिळेल. सायबरचे काम आहे तपासण्याचे ते करतील, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहे. निकाल हा आमच्या बाजूने लागणार, असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या वकिलांनी चांगला युक्तिवाद केला आहे. बंडखोर आमदारांनी १० व्या शेड्युलचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ते अपात्र होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला त्यावरही सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल. पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरेंना मिळेल. शिंदे गटाने काहीही केले तरी त्यांच्या कपाळवरील गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. ते हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम करत आहेत. लोक यांना निवडणुकीत उत्तर देतील, या शब्दांत प्रियंका चतुर्वेदी यांनी टीका केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Prakash surveप्रकाश सुर्वेShiv Senaशिवसेना