शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Maharashtra Winter Session 2022: नागपूरच्या कथित भूखंड घोटाळ्याप्रश्नी ठाकरे गट आक्रमक; CM शिंदेंच्या राजीनाम्याची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 15:52 IST

Maharashtra Winter Session 2022: ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील नेत्यांनीही कथित घोटाळ्याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Maharashtra Winter Session 2022:  योगेश पांडे - नागपूरमधील भूखंड वाटप प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायप्रशासनातील कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवला, त्यामुळे या प्रकरणाचा पूर्ण निकाल लागेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. 

नागपूर सुधार प्रन्यासमधील ८३ कोटी रुपयांचे भूखंड अवघ्या २ कोटी रुपयांना बिल्डरला वाटल्याबद्दल न्यायालयाने न्यायप्रशासनातील कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठेवला. ही गंभीर बाब पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात आक्रमकपणे मांडली. या कथित भ्रष्टाचारप्रकरणी मुख्यमंत्री यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, अशी आग्रही भूमिका दानवे यांनी मांडली. अंबादास दानवे यांनी आक्रमकपणे हा मुद्दा मांडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढल्या म्हटले जात आहे.

हा न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप

नागपूर सुधार प्रन्यासचा हरपूर येथील १७ हजार ९६८ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला व ८३ कोटींचा भूखंड तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला. तो भूखंड अवघ्या दीड कोटींना देण्यात आला. न्यायालयाने नियमितीकरण यथास्थिती ठेवण्याचे निर्देश दिले असतानादेखील त्यांचे नियमितीकरण करण्यात आले. हा न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप दानवे यांनी केला. यानंतर विरोधी बाकांवरील सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत गदारोळ केला. दोन वेळा उपसभापतींना कामकाज १५-१५ मिनीटांसाठी स्थगित करावे लागले. मात्र तरीदेखील गोंधळ कायम असल्याने दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आले.

नासुप्रने योग्य माहिती न दिल्याने गोंधळ

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या गोंधळात या मुद्द्यावर सरकारची बाजू मांडली. मुळात हा विषय लेआऊटबाबतचा नसून गुंठेवारीशी संबंधित आहे. नागपुरात २ हजार अविकसित ले आऊट्स होते. त्यांच्या नियमितीकरणाची मागणी झाल्याने २००७ साली तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी १७ जुलै २००७ ला हे भूखंड नियमित करण्याचा शासन निर्णय जारी केला. ४९ पैकी ३३ ले आऊट्सचे नियमितीकरण झाले. मात्र १६ ले आऊट्सची प्रक्रिया खोळंबली होती. २००९ व २०१० मध्ये नव्याने शासन निर्णय झाला.

या काळात हे भूखंड खरेदी केलेल्या नागरिकांनी व संस्थांनी तत्कालिन नगरविकास मंत्र्यांकडे धाव घेतली होती. आवश्यक शुल्क घेऊन भूखंडांचे लीज करार करण्यात यावे व संबंधितांना भूखंडांचा ताबा देण्यात यावा, असा आदेश नासुप्रला देण्यात आला होता. मात्र न्यायालयाने अगोदर भूंखंडांच्या नियमितीकरण व आरक्षणाबाबत गिलानी समिती गठीत केली होती. जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत या जागांबाबत पावले उचलण्यात येऊ नये, असे समितीने अहवालात मांडले होते. नासुप्रने या समितीच्या अहवालाची माहिती नगरविकास मंत्र्यांना दिलीच नव्हती. त्यातूनच हा गोंधळ झाला. न्यायालयाने विचारणा केल्यानंतर हा प्रकार सरकारच्या लक्षात आला. नासुप्रने गिलानी समितीचा अहवाल समोर ठेवलाच नव्हता. त्यामुळे १६ भूखंडांचे नियमितीकरण रद्द करण्यात येत असल्याचा अहवाल शासनाने न्यायालयाला सादर केला आहे. न्यायालयाने त्यानंतर सरकारवर ताशेरे ओढलेले नाहीत, अशी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी मांडली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदेAmbadas Danweyअंबादास दानवे