शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

Maharashtra Politics: “किरीटभाऊ, मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? यावरही बोलले पाहिजे”: सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 12:29 IST

Maharashtra News: रश्मी उद्धव ठाकरेंवर किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. कोर्लई येथे रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले होते. मात्र, आता हे बंगले गायब आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. 

उद्यापासून नवे वर्ष सुरू होत आहे, मी या नव्या वर्षात विरोधकांचा हिशोब चुकता करणार आहे. ठाकरे परिवाराचे १९ बंगले, अस्लम शेख यांचे ४९ स्टुडिओ, अनिल परब यांचा साई रिसॉर्ट, किशोरी पडेणेकर मुंबई महापालिकेचा हिशोब पूर्ण करणार असल्याचा सूचक इशारा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. रेवदंडा पोलीस ठाण्यात ठाकरे आणि वायकर यांचा कोर्लई अलिबागचा १९ बंगला घोटाळ्याविरोधात तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार ही तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यानंतर सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. 

किरीट सोमय्या आरंभशूर फार आहेत 

किरीट सोमय्या काम करतात, ते प्रशंसेस पात्र असते. फक्त ते आरंभशूर फार आहेत, एवढीच माझी त्यांच्याबद्दल तक्रार आहे. कारण ते चौकशी करतात, पण पुढे त्याचे काहीच होत नाही. राहिला प्रश्न १९ बंगल्याचा, ऐरवी ते उद्योगांबाबत बोलतात, आता जर त्यांना बंगल्याची चौकशी करण्याचा मूड झाला असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? यावरही त्यांनी बोललं पाहिजे. सह्यांद्री, नंदनवन, रामटेक, वर्षा आणि शेजारचे दोन-तीन बंगले सुद्धा त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किती बंगले त्यांच्याकडे ठेवावेत, याची काही नियमावली आहे का? याबद्दल माहिती देऊन किरीटभाऊंनी माझ्या ज्ञानात थोडी भर घालावी, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांना टोला लगावला आहे. 

दरम्यान, नाशिकमधील इगतपुरी येथील जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीसंदर्भात बोलताना सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या घटनेतील पीडितासाठी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली, ते ठीक आहे. मात्र, राज्यात ज्या आगीच्या घटना घडत आहे, त्यासाठी लागणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाबाबत हे सरकार गंभीर दिसत नाही. तसेच महिला व बालकल्याण मंत्रालयासाठी स्वतंत्र मंत्री नसणे, ही दुर्दैवी बाब आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेKirit Somaiyaकिरीट सोमय्या