शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

“महागाई-बेरोजगारी-विद्वेषाचा वणवा पेटला, जनता होरपळते अन् राज्यकर्ते थंड आहेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 07:34 IST

हे चित्र भयंकर आहे. आधीच भडकलेली महागाई आणखी भडकू शकते, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

Shiv Sena Thackeray Group News: मान्सून रखडला आणि सूर्य कोपला अशा विचित्र कोंडीत सध्या देश सापडला आहे. पुन्हा ज्यांनी यातून जनतेची सुटका करायची ते राज्यकर्ते वेदनांवर फुंकर मारण्याऐवजी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग करीत आहेत. उत्तर प्रदेशात लोक उष्माघाताने प्राण सोडत आहेत. देशात एकीकडे महागाई, बेरोजगारी, विद्वेषाचा वणवा पेटला आहे. दुसरीकडे सूर्य कोपला आहे. जनता त्यात होरपळून निघत आहे आणि राज्यकर्ते थंड आहेत. हे चित्र भयंकर आहे!, या शब्दांत ठाकरे गटाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

पावसाने तर ओढ दिलीच आहे, पण उष्माघाताची भयंकर लाट उत्तरेकडील राज्यांसाठी गंभीर बनली आहे. तीव्र उष्णतेच्या ज्वाळा आणि झळा या राज्यांना सोसाव्या लागत आहेत. प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये या झळांनी गंभीर रूप धारण केले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील उष्माघाताची ही स्थिती निश्चितच गंभीर आहे. कारण रुग्णांची संख्या या दोन्ही राज्यांत वाढत आहे. पुन्हा जखमी आणि मृत्यूचा हा आकडा रुग्णालयांमधील आहे. त्यामुळे दाखल न झालेल्या, परंतु मरण पावलेल्या रुग्णांचा विचार केला तर मृत्यूचा आकडा प्रत्यक्षात आणखी जास्त असू शकतो, असा दावा ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे. 

आधीच भडकलेली महागाई आणखी भडकू शकते

देशातील उष्म्याची स्थिती कायमच आहे. त्यात आधी ‘एल निनो’चा इशारा आणि नंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा तडाखा यामुळे मान्सूनचा प्रवास रखडला आहे. मान्सून महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय होईल, असे सांगण्यात येत आहे. म्हणजे यंदा जवळजवळ पूर्ण जून महिना ‘पावसाचा अभाव आणि उष्णतेचा प्रभाव’ असा जाणार आहे. त्याचा दुष्परिणाम पीकपेरणी आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ावर तर होणार आहेच, परंतु मान्सूनचे संपूर्ण वेळापत्रकच बिघडण्याची भीती आहे. त्यामुळे देशाचा खरीप हंगामदेखील विस्कळीत होऊ शकतो. धान्य उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आधीच भडकलेली महागाई आणखी भडकू शकते, अशी शक्यता ठाकरे गटाकडून वर्तवण्यात आली आहे. 

दरम्यान, हवामान विभागाने बिहारसाठी ‘अत्यंत उष्ण हवामान’ असा अॅलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत तेथील परिस्थिती आणखी गंभीर होणार हे निश्चित आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही तीव्र उष्म्याचा तडाखा जूनमध्येही जाणवत आहे. किंबहुना मुंबईच्या विक्रमी तापमानाची नोंद जूनमध्ये झाली. रखडलेला मान्सून आणि वाढलेला उष्मा यासाठी ज्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाकडे बोट दाखविले गेले ते आता पाकिस्तानात सरकले आहे. मात्र तरीही त्याचे ‘आफ्टर इफेक्ट्स’ देशाला जाणवत आहेत. महाबळेश्वर, माथेरान आणि इतर थंड हवेच्या ठिकाणी यंदा सूर्य आग ओकताना दिसला, असे म्हटले आहे. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना