शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“शिंदे-फडणवीस सरकारमुळे राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट, महिलांचा सुरक्षिततेसाठी आक्रोश”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 08:27 IST

Maharashtra Politics: महिलांना टार्गेट करण्याची विकृती महाराष्ट्रात आताच का वाढीस लागली आहे, अशी विचारणा ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या बोकांडी शिंदे-फडणवीस सरकार बसल्यापासून महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रांत पीछेहाट होत आहे. त्यातही कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षा तर या सरकारने पार वाऱ्यावरच सोडली आहे. असा एकही दिवस जात नाही की महिलेवर अत्याचार होत नाही, खुनी हल्ला किंवा खून होत नाही, विनयभंग होत नाही. मुंबईतील उपनगरी रेल्वेदेखील आता महिलांसाठी सुरक्षित राहिलेली नाही, या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

महिला सुरक्षेबाबत महाराष्ट्राचा एक लौकिक होता, दरारा होता. मात्र वर्षभरात हे चित्र पालटले आहे. हल्ले आणि अत्याचाराच्या सावटाखाली जगण्याची वेळ राज्यातील महिलांवर आली आहे. त्यांच्यासाठी ना मुंबईतील लोकल सुरक्षित राहिली आहे ना राज्यातील रस्ते. नराधमांच्या दहशतीचे ओझे मनावर ठेवून महिलांना घराबाहेर पाऊल टाकावे लागत आहे आणि सुखरूप घरी पोहोचल्यावर त्या आणि त्यांचे कुटुंबीय सुटकेचा निःश्वास टाकत आहेत. कायदा बेभरवशाचा आणि सुव्यवस्थेचे ‘घोडे’ वरातीमागून नाचल्यावर दुसरे काय होणार? सरकार वर्षपूर्तीचे ढोल पिटत आहे आणि राज्यातील महिला सुरक्षेसाठी आक्रोश करीत आहेत, असा घणाघात ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे. 

महिलांना ‘टार्गेट’ करण्याची विकृती महाराष्ट्रात आताच का वाढीस लागली आहे?

लोकल प्रवास महिलांसाठी दहशतीचाच ठरत असेल तर या कारवायांचा उपयोग काय? तुम्ही जे कारवाईचे दंडुके आपटले त्याने साधे टेंगुळदेखील गुंड आणि नराधमांच्या डोक्यावर येत नसेल तर सुशासन वगैरेच्या गप्पा या सरकारने न मारलेल्याच बऱ्या. प्रश्न एवढाच आहे की ही विकृती आताच एवढी बेलगाम का होत चालली आहे? महिलांना ‘टार्गेट’ करण्याची विकृती महाराष्ट्रात आताच का वाढीस लागली आहे? महिला सुरक्षेबाबत राज्याची एवढी गंभीर अवस्था असताना उठताबसता विरोधकांना डोस पाजणारे राज्याचे गृहमंत्री काय किंवा सत्ता पक्षातील महिला आघाडी काय, तोंड उघडत नाहीत, अशी टीका करण्यात आली आहे. 

महिलांवरील अत्याचार, हल्ले ‘गतिमान’ झाले आहेत असे लोकांनी समजायचे का? 

महाराष्ट्रात ‘वेगवान’ आणि ‘गतिमान’ सरकार सत्तेत असल्याने महिलांवरील अत्याचार, हल्ले ‘गतिमान’ झाले आहेत असे लोकांनी समजायचे का? महिलांच्या सुरक्षेसंबंधी अनेक घोषणा आणि निर्णयांचे ढोल हे सरकार पिटत असते. सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त घालणे, निर्जन ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे, एकाकी महिलांना घरी नेण्याची व्यवस्था करणे, निर्भया पथक अशा सुरक्षा उपायांची आणि घोषणांची यादी मोठी आहे, पण महिलांवरील अन्याय, हल्ले, लैंगिक अत्याचार त्यापेक्षा जास्त वेगात आणि पटींत वाढत आहेत, त्याचे काय? निर्भया पथकासाठी घेतलेल्या पेट्रोलिंग गाड्या राजरोसपणे सरकारच्या मंत्र्यांच्या दिमतीला ठेवल्यावर दुसरे काय घडणार? महिला सुरक्षेबाबत हीच या सरकारची संवेदनशीलता समजायची काय? अशी विचारणा ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे