शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“शिंदे-फडणवीस सरकारमुळे राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट, महिलांचा सुरक्षिततेसाठी आक्रोश”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 08:27 IST

Maharashtra Politics: महिलांना टार्गेट करण्याची विकृती महाराष्ट्रात आताच का वाढीस लागली आहे, अशी विचारणा ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या बोकांडी शिंदे-फडणवीस सरकार बसल्यापासून महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रांत पीछेहाट होत आहे. त्यातही कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षा तर या सरकारने पार वाऱ्यावरच सोडली आहे. असा एकही दिवस जात नाही की महिलेवर अत्याचार होत नाही, खुनी हल्ला किंवा खून होत नाही, विनयभंग होत नाही. मुंबईतील उपनगरी रेल्वेदेखील आता महिलांसाठी सुरक्षित राहिलेली नाही, या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

महिला सुरक्षेबाबत महाराष्ट्राचा एक लौकिक होता, दरारा होता. मात्र वर्षभरात हे चित्र पालटले आहे. हल्ले आणि अत्याचाराच्या सावटाखाली जगण्याची वेळ राज्यातील महिलांवर आली आहे. त्यांच्यासाठी ना मुंबईतील लोकल सुरक्षित राहिली आहे ना राज्यातील रस्ते. नराधमांच्या दहशतीचे ओझे मनावर ठेवून महिलांना घराबाहेर पाऊल टाकावे लागत आहे आणि सुखरूप घरी पोहोचल्यावर त्या आणि त्यांचे कुटुंबीय सुटकेचा निःश्वास टाकत आहेत. कायदा बेभरवशाचा आणि सुव्यवस्थेचे ‘घोडे’ वरातीमागून नाचल्यावर दुसरे काय होणार? सरकार वर्षपूर्तीचे ढोल पिटत आहे आणि राज्यातील महिला सुरक्षेसाठी आक्रोश करीत आहेत, असा घणाघात ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे. 

महिलांना ‘टार्गेट’ करण्याची विकृती महाराष्ट्रात आताच का वाढीस लागली आहे?

लोकल प्रवास महिलांसाठी दहशतीचाच ठरत असेल तर या कारवायांचा उपयोग काय? तुम्ही जे कारवाईचे दंडुके आपटले त्याने साधे टेंगुळदेखील गुंड आणि नराधमांच्या डोक्यावर येत नसेल तर सुशासन वगैरेच्या गप्पा या सरकारने न मारलेल्याच बऱ्या. प्रश्न एवढाच आहे की ही विकृती आताच एवढी बेलगाम का होत चालली आहे? महिलांना ‘टार्गेट’ करण्याची विकृती महाराष्ट्रात आताच का वाढीस लागली आहे? महिला सुरक्षेबाबत राज्याची एवढी गंभीर अवस्था असताना उठताबसता विरोधकांना डोस पाजणारे राज्याचे गृहमंत्री काय किंवा सत्ता पक्षातील महिला आघाडी काय, तोंड उघडत नाहीत, अशी टीका करण्यात आली आहे. 

महिलांवरील अत्याचार, हल्ले ‘गतिमान’ झाले आहेत असे लोकांनी समजायचे का? 

महाराष्ट्रात ‘वेगवान’ आणि ‘गतिमान’ सरकार सत्तेत असल्याने महिलांवरील अत्याचार, हल्ले ‘गतिमान’ झाले आहेत असे लोकांनी समजायचे का? महिलांच्या सुरक्षेसंबंधी अनेक घोषणा आणि निर्णयांचे ढोल हे सरकार पिटत असते. सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त घालणे, निर्जन ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे, एकाकी महिलांना घरी नेण्याची व्यवस्था करणे, निर्भया पथक अशा सुरक्षा उपायांची आणि घोषणांची यादी मोठी आहे, पण महिलांवरील अन्याय, हल्ले, लैंगिक अत्याचार त्यापेक्षा जास्त वेगात आणि पटींत वाढत आहेत, त्याचे काय? निर्भया पथकासाठी घेतलेल्या पेट्रोलिंग गाड्या राजरोसपणे सरकारच्या मंत्र्यांच्या दिमतीला ठेवल्यावर दुसरे काय घडणार? महिला सुरक्षेबाबत हीच या सरकारची संवेदनशीलता समजायची काय? अशी विचारणा ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे