शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“उद्धव ठाकरे एकवचनी, भाजपासोबत जाणे शक्य नाही”; ठाकरे गटातील नेते स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 17:52 IST

Shiv Sena Thackeray Group News: संपूर्ण देशात भाजपाकडून दबावतंत्राचा वापर सुरू असून, याचा फटका निवडणुकीत बसेल, असा दावा करण्यात आला आहे.

Shiv Sena Thackeray Group News:शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी केंद्र सरकार, भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने जहरी टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच आगामी काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारतील आणि पंतप्रधाान मोदी यांना पाठिंबा देतील, असा दावा करण्यात आला होता. यावर ठाकरे गटातील नेत्यांनी भाष्य केले आहे. 

अहंकारी उद्धव ठाकरे बेचैन झाले आहेत. मोदींना कधी भेटतो, त्यांची माफी कधी मागतो आणि कधी त्यांना पाठिंबा देतो असे उद्धव ठाकरेंचे झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर त्यांना पडला होता. आता मातोश्रीवर त्याचे चिंतन सुरु झाले आहे. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांच्या माध्यमांतून भाजपाशी संपर्क करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. उद्धव ठाकरे विधानसभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील आणि महाविकास आघाडीलाही जय महाराष्ट्र करतील, असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला होता. यावर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे एकवचनी, भाजपासोबत जाणे शक्य नाही

आमदार रवी राणा यांना कुठून स्वप्न पडले? उद्धव ठाकरे हे एकवचनी आहेत. आधीच तुम्ही लोक उद्धव ठाकरेंना त्रास देत आहात. उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणे कदापि शक्य नाही, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपाकडून दबाव तंत्राचा वापर सुरू आहे. संपूर्ण देशात असेच सुरू आहे. भाजपामुळे कामगार, उद्योगपती, शेतकरी त्रस्त झाले आहेत. याचा फटका भाजपाला बसणार आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, अशोक चव्हाण यांचे भाजपामध्ये जाणे हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा अपमान आहे. अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेश करायला हवा होता. प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रवेश करून हलकेपणा करून घेतला. भाजपा प्रवेश योग्य नव्हे तर चुकीचे केले, असे स्पष्ट मत खैरे यांनी मांडले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या अनेक वेळा वावड्या उठवल्या जात आहेत. हे काम भाजपा करत आहे. जयंत पाटील हे शरद पवारांना पुतण्यापेक्षा जवळचे आहेत. पुतण्याने धोका दिला. पण, जयंत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला. ते भाजपमध्ये जाणार नाहीत, असे खैरे म्हणाले.

 

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेना