शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

“उद्धव ठाकरे एकवचनी, भाजपासोबत जाणे शक्य नाही”; ठाकरे गटातील नेते स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 17:52 IST

Shiv Sena Thackeray Group News: संपूर्ण देशात भाजपाकडून दबावतंत्राचा वापर सुरू असून, याचा फटका निवडणुकीत बसेल, असा दावा करण्यात आला आहे.

Shiv Sena Thackeray Group News:शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी केंद्र सरकार, भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने जहरी टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच आगामी काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारतील आणि पंतप्रधाान मोदी यांना पाठिंबा देतील, असा दावा करण्यात आला होता. यावर ठाकरे गटातील नेत्यांनी भाष्य केले आहे. 

अहंकारी उद्धव ठाकरे बेचैन झाले आहेत. मोदींना कधी भेटतो, त्यांची माफी कधी मागतो आणि कधी त्यांना पाठिंबा देतो असे उद्धव ठाकरेंचे झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर त्यांना पडला होता. आता मातोश्रीवर त्याचे चिंतन सुरु झाले आहे. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांच्या माध्यमांतून भाजपाशी संपर्क करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. उद्धव ठाकरे विधानसभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील आणि महाविकास आघाडीलाही जय महाराष्ट्र करतील, असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला होता. यावर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे एकवचनी, भाजपासोबत जाणे शक्य नाही

आमदार रवी राणा यांना कुठून स्वप्न पडले? उद्धव ठाकरे हे एकवचनी आहेत. आधीच तुम्ही लोक उद्धव ठाकरेंना त्रास देत आहात. उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणे कदापि शक्य नाही, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपाकडून दबाव तंत्राचा वापर सुरू आहे. संपूर्ण देशात असेच सुरू आहे. भाजपामुळे कामगार, उद्योगपती, शेतकरी त्रस्त झाले आहेत. याचा फटका भाजपाला बसणार आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, अशोक चव्हाण यांचे भाजपामध्ये जाणे हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा अपमान आहे. अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेश करायला हवा होता. प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रवेश करून हलकेपणा करून घेतला. भाजपा प्रवेश योग्य नव्हे तर चुकीचे केले, असे स्पष्ट मत खैरे यांनी मांडले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या अनेक वेळा वावड्या उठवल्या जात आहेत. हे काम भाजपा करत आहे. जयंत पाटील हे शरद पवारांना पुतण्यापेक्षा जवळचे आहेत. पुतण्याने धोका दिला. पण, जयंत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला. ते भाजपमध्ये जाणार नाहीत, असे खैरे म्हणाले.

 

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेना