शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पुढचा CM काँग्रेसचा; विश्वजित कदमांच्या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते स्पष्ट बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 18:15 IST

Shiv Sena Thackeray Group News: नाना पटोले किंवा विश्वजित कदम काय बोलतात, त्याला काँग्रेसमध्ये महत्त्व आहे, असे वाटत नाही, असा टोला ठाकरे गटाने लगावला.

Shiv Sena Thackeray Group News: एकीकडे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्रीपदावरून आता दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारली असली तरी अपक्ष म्हणून उभे राहून जिंकलेल्या खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, ठाकरे गटातील नेत्यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना सर्वाधिक मत्ताधिक्य मिरजेने दिले, ही निवडणुक सोपी नव्हती. ज्या पक्षात आम्ही काम करत होते, त्याचे पक्षाचे तिकिट मिळत नव्हते. अन्याय होत असल्याचे पाहून जनतेनेच या निवडणुकीत साथ दिली. जनतेने काँग्रेस पक्षाला आणि पक्षाच्या विचाराला साथ दिली. काँग्रेसचे विचार वाचविण्यासाठी जनतेने ही निवडणुक हातात घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल, असे विश्वजित कदम यांनी म्हटले. यावर  ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.

येणाऱ्या काळात काहीही होऊ शकते

अजूनपर्यंत विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली नाही. जागावाटपाची चर्चाही सुरू झालेली नाही. खरे तर मुख्यमंत्री कोण होईल, हा निवडणुकीनंतरचा विषय आहे. मागच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल, असे कुणालाही वाटले नव्हते, पण ते मुख्यमंत्री झाले. आधी किमान जागावाटप तरी होऊ द्या, येणाऱ्या काळात काहीही होऊ शकते, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, येणाऱ्या काळात महायुतीचे सरकार बदलणे जास्त महत्त्वाचे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची फक्त एक जागा आली होती. तो शिवसेनेचा माजी आमदार होता. मुळात काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व परिपक्व आहे. नाना पटोले किंवा विश्वजित कदम काय बोलतात, त्याला काँग्रेसमध्ये महत्त्व आहे, असे वाटत नाही. केंद्रीय नेतृत्वाला या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे, असे दानवे म्हणाले.

 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेVishwajeet Kadamविश्वजीत कदमMahavikas Aghadiमहाविकास आघाडी