शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

पुढचा CM काँग्रेसचा; विश्वजित कदमांच्या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते स्पष्ट बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 18:15 IST

Shiv Sena Thackeray Group News: नाना पटोले किंवा विश्वजित कदम काय बोलतात, त्याला काँग्रेसमध्ये महत्त्व आहे, असे वाटत नाही, असा टोला ठाकरे गटाने लगावला.

Shiv Sena Thackeray Group News: एकीकडे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्रीपदावरून आता दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारली असली तरी अपक्ष म्हणून उभे राहून जिंकलेल्या खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, ठाकरे गटातील नेत्यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना सर्वाधिक मत्ताधिक्य मिरजेने दिले, ही निवडणुक सोपी नव्हती. ज्या पक्षात आम्ही काम करत होते, त्याचे पक्षाचे तिकिट मिळत नव्हते. अन्याय होत असल्याचे पाहून जनतेनेच या निवडणुकीत साथ दिली. जनतेने काँग्रेस पक्षाला आणि पक्षाच्या विचाराला साथ दिली. काँग्रेसचे विचार वाचविण्यासाठी जनतेने ही निवडणुक हातात घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल, असे विश्वजित कदम यांनी म्हटले. यावर  ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.

येणाऱ्या काळात काहीही होऊ शकते

अजूनपर्यंत विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली नाही. जागावाटपाची चर्चाही सुरू झालेली नाही. खरे तर मुख्यमंत्री कोण होईल, हा निवडणुकीनंतरचा विषय आहे. मागच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल, असे कुणालाही वाटले नव्हते, पण ते मुख्यमंत्री झाले. आधी किमान जागावाटप तरी होऊ द्या, येणाऱ्या काळात काहीही होऊ शकते, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, येणाऱ्या काळात महायुतीचे सरकार बदलणे जास्त महत्त्वाचे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची फक्त एक जागा आली होती. तो शिवसेनेचा माजी आमदार होता. मुळात काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व परिपक्व आहे. नाना पटोले किंवा विश्वजित कदम काय बोलतात, त्याला काँग्रेसमध्ये महत्त्व आहे, असे वाटत नाही. केंद्रीय नेतृत्वाला या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे, असे दानवे म्हणाले.

 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेVishwajeet Kadamविश्वजीत कदमMahavikas Aghadiमहाविकास आघाडी