शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

Maharashtra Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये गोंधळ; ठाकरे गटाच्या नेत्याचे ‘त्या’ तीन पक्षांकडे बोट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 14:05 IST

Maharashtra News: छत्रपती संभाजीनगरधील घटनेवरून ठाकरे गटातील नेत्याने मोठा आरोप केला आहे.

Maharashtra Politics: छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा परिसरात असलेल्या राम मंदिराच्या परिसरात मध्यरात्री काही समाजकंटकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या गोंधळाचे पर्यावसान दगडफेकीत झाले. यावेळी पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. 

शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण परिसरात आपण शांतता ठेवली पाहिजे. पण हे का घडले? हा प्रकार घडवणारे लोक कोण आहेत? याकडे लक्ष दिले पाहिजे. गेल्या महिनाभरापासून आम्ही सातत्याने म्हणत आहोत की, या शहरातील वातावरण खराब करून लोकांच्या मनात विष कालवले जात आहे. एमआयएमसारखी संघटना १० ते १५ दिवस आंदोलन करते. रात्री १२ ते १ वाजेपर्यंत आंदोलने सुरू असतात. पोलीस काहीच दखल घेत नाहीत. कोणावरही कारवाई करत नाहीत. पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत होते, ते हात तोडले पाहिजेत. संरक्षण करणाऱ्यांवर हात उचलले जातात, ते हात पोलिसांनी तोडून टाकले पाहिजेत. या गोंधळामागे एआयएमआयएम आणि राज्य सरकारमधले दोन पक्ष आहेत, असा मोठा आरोप अंबादास दानवे यांनी केला. 

जनाधार मिळवण्यासाठी हे सगळे सुरू आहे

मी महिनाभरापासून सांगतोय की, संभाजीनगरात अशांतता पसरवली जात आहे. स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. जनाधार मिळवण्यासाठी हे सगळे सुरू आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही सरकारवर आरोप केले.

दरम्यान, संभाजीनगरमध्ये घडलेली घटना ही दुर्देवी आहे, आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही नेत्यांकडून भडकवणारे स्टेटमेंट देण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजले पाहिजे, सर्वांनी शांतता पाळावी, ही सर्व नेत्यांची जबाबदारी आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv Senaशिवसेना