शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “गद्दारी न करणारे निष्ठावंत आमच्यासोबत, जाणारे खोके आणि धोकेंमुळे गेले”: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 13:42 IST

Maharashtra Politics: महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी कोणताही गुंतवणूकदार इच्छुक नाही. हे सरकार लवरच पडणार आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा शिंदे गट उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे. नाशिकमधील ठाकरे गटाची होणारी पडझड रोखण्यासाठी संजय राऊत २ दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यातच आता नाशिकचे ठाकरे गटाच्या ५० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गद्दारी न करणारे निष्ठावंत आमच्यासोबत, जाणारे खोके आणि धोकेंमुळे गेले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

जे निष्ठावंत आहेत, जे महाराष्ट्राशी गद्दारी करत नाहीत. महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या आमच्या भूमिकेशी जे गद्दारी करत नाहीत, ते आमच्यासोबत सतत राहिलेले आहेत. ज्यांना जायचे असते, काहींना खोक्यांसाठी असेल, काहींना धोक्यांसाठी असेल, ते जातात, त्यांना पर्याय नसतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोरोनाची परिस्थिती कशा प्रकारे हाताळली गेली, राज्याचा विकास कसा झाला, शाश्वत विकास या राज्याचा झाला, चांगली गुंतवणूक या महाराष्ट्रात आली, या गोष्टी ज्यांना आवडत आहेत, ते आमच्यासोबत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

राज्यात राजकीय पातळी घसरत चालली आहे

राज्यात राजकीय पातळी घसरत चालली आहे. जीडीपी घसरायला केळ्याचे साल सहा महिन्यांपूर्वी टाकले कुणी, हे तुम्ही लक्षात घ्या. तसेच राज्यात नवीन गुंतवणूक येताना दिसत नाही. दावोस येथे गुंतवणूक आणण्यासाठी जाणार आहेत. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे आधीच अनेक करार रोखून ठेवले आहेत, जेणेकरून दावोस येथे जाऊन आम्ही गुंतवणूक आणली हे त्यांना दाखवता येईल, असा मोठा दावा आदित्य ठाकरेंनी केला. 

हे सरकार लवरच पडणार आहे

महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी कोणताही गुंतवणूकदार इच्छुक नाही. याचे कारण एक सीएम आणि दुसरे स्पेशल सीएम आहेत. याशिवाय राज्यातील वातावरण घाणेरडे झालेले आहे. कोणाच्याही मागे कोणतीही एजन्सी लावली जात आहे. राजकीय पातळी घसरत असताना, माझी इच्छा आहे की, सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला पुढे नेण्याचा विचार केला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. लवकरच हे खोके अपात्र ठरणार आहे. हे सरकार लवरच पडणार आहे. यापुढे जे सरकार येईल, ते महाराष्ट्राच्या हिताचे असावे, हीच प्रार्थना आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना