शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘मराठी’वरून शिवसेनेचा थोरातांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 06:26 IST

सेनेसोबत भाजपचा ‘एक सूर’ :‘सीबीएसई’ शाळांत मराठी अनिवार्य करण्याची मागणी

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर शिवसेना व भाजपमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. परंतु बुधवारी विधान परिषदेत सर्व शाळांत मराठी अनिवार्य करण्याच्या मुद्यावरून दोन्ही पक्षांच्या सदस्यांचा समान सूर दिसून आला. तर दुसरीकडे शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर शिवसेनेतर्फे निशाणा साधण्यात आला. मराठीची राज्यातच गळचेपी का, असा प्रश्न उपस्थित करीत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या गोंधळात थोरात हे काहीसे एकटे पडल्याचे दिसून आले.

विलास पोतनीस यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरून सभागृहात शाळांमधील मराठीचा मुद्दा समोर आला. इतर राज्यांत तेथील मातृभाषा दहावीपर्यंत शिकविणे अनिवार्य असते. महाराष्ट्रातील ‘सीबीएसई’, ‘आयसीएसई’ शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी सक्तीची करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तर या शाळा शासनाला अजिबात भाव देत नसल्याचे विधान केले. या शाळा मनमानी पद्धतीने शुल्क घेतात व त्यांना शासनाच्या कारवाईची काहीच भीती नाही, असे ते म्हणाले. या शाळांमध्ये नववी व दहावीत मराठी सक्तीची करता येणार नाही, असे उत्तर बाळासाहेब थोरात यांनी दिले. यानंतर विरोधी बाकांवरील सदस्य आणखी आक्रमक झाले व सरकारला मराठी भाषेची चिंता नसल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे शिवसेनेचे सदस्य रामदास कदम यांनीदेखील यात उडी घेतली. मंत्रालयाबाहेर फाटक्या वस्त्रांत सोनेरी मुकुट घातलेल्याप्रमाणे मराठीची अवस्था झाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आपले मराठी भाषिक राज्य आहे. येथे मराठीची गळचेपी का होत आहे, असा संतप्त सवाल करीत त्यांनीदेखील दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीत हवे, ही मागणी लावून धरली. तत्पूर्वी अ‍ॅड. अनिल परब यांनीदेखील ‘आयसीएसई’ शाळांत मराठी शिकविले जात नसल्याने स्वत:च्या मुलांना राज्य मंडळाच्या शाळांत टाकल्याचे सांगितले व सर्वच शाळांत मराठी शिकविले जावे यासाठी सरकारने पावले उचलावी, अशी भूमिका घेतली. कपिल पाटील यांनी तर ‘सीबीएसई’ शाळांसाठी शुल्क नियंत्रण कायदा कडक करण्याची मागणी केली. कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती निंबाळकर यांनी हा मुद्दा महत्त्वाचा असून, यासंदर्भात बैठक घ्यावी व अंमलबजावणीसाठी सूचना म्हणून चर्चेतील बाबी जाहीर कराव्यात, असे निर्देश दिले.

रावतेंचे चिमटेमराठीच्या मुद्यावरून गोंधळ सुरू असताना शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी सभागृहातील सदस्यांना चिमटे काढले. सर्व जण मराठी मराठी करीत आहेत. परंतु परिषदेत बोलताना कुणी थेट मंत्री म्हणण्याऐवजी ‘कॅबिनेट’ मंत्री असे म्हणतो. तर नेमके उत्तर बोलण्याऐवजी ‘स्पेसिफिक’ उत्तर द्यावे, असे उच्चार करतो. सदस्यांनी इंग्रजाळलेपणा थांबविला पाहिजे व मराठी बोलण्यास शिकले पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातShiv Senaशिवसेना