शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

१८ उद्योजकांकडून शिवसेनेने घेतली सुपारी : नारायण राणे

By admin | Updated: July 11, 2015 00:11 IST

सरकारवर टिका : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत घणाघाती आरोप

रत्नागिरी : कोळशावर विद्युत निर्मिती करणाऱ्या १८ उद्योजकांकडून शिवसेनेने जैतापूर प्रकल्पविरोधातील सुपारी घेतली आहे. त्यामुळेच त्यांचा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधात एककलमी कार्यक्रम सुरू आहे, असा घणाघाती आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. गेल्या आठ महिन्यांतील राज्य सरकारच्या सर्व आघाड्यांवरील अपयशाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा कॉँग्रेसतर्फे रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व राणे यांनी केले. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्यासोबत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे येथील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे; मात्र या प्रकल्पाच्या उभारणीमुळे कोळशावर विद्युत निर्मिती करणाऱ्या उद्योजकांची वीज विकली जाणार नाही. त्यामुळेच हा प्रकल्प होऊ नये म्हणून कोळशावरील विद्युत प्रकल्प असणाऱ्या १८ उद्योजकांनी जैतापूर प्रकल्पविरोधात सुपारी देऊन शिवसेनेला उभे केले आहे; मात्र हा प्रकल्प होणारच आहे. राज्य सरकारने अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. सध्या बाजारात पंकजा चिक्की आली आहे; मात्र त्यात खिळे, तारा, दगड मिळतील या भीतीने त्या चिक्कीकडे लोकांनी दुर्लक्ष केले, अशी खिल्ली उडवीत राणे म्हणाले की, चिक्कीची आॅर्डर इ टेंडरिंगद्वारे द्या, असा उच्च न्यायालय, आयुक्त व राज्यपालांचा निर्देश असतानाही चिक्कीची आॅर्डर परस्पर दिली गेली. आपण मुख्यमंत्री असतानाचे काहीजण आज मंत्रिमंडळात आहेत. आज ते जनहितापेक्षा स्वार्थासाठी नको ते प्रकार करीत आहेत. जनतेला पारदर्शक कारभार हवा आहे. मंत्री, मुख्यमंत्रीही खोटे बोलतात. अन्य मंत्र्यांप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे हातही भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. जनतेच्या पैशातून मुख्यमंत्री फडणवीस आपल्या कुटुंबीयांसमवेत अमेरिका वारी करीत आहेत. जहाजावर रोमॅँटिक गाण्यावर थिरकत आहेत. राज्यात आजवरच्या मुख्यमंत्र्यांची देशात व परदेशातही नेहमीच चांगली प्रतिमा राहिली,. मात्र, रोमँटिक गाण्यावर नाच करीत फडणवीस यांनी जे काही केले, त्यामुळे राज्याची मान शरमेने झुकली आहे, असे राणे म्हणाले. (प्रतिनिधी)भ्रष्टाचाराच्या कुंडल्या विधानसभेत मांडणारराज्यातील फडणवीस सरकारने आठ महिन्यांतच भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. विधिमंडळ अधिवेशनात या सरकारला कोंडीत पकडणे हे आमचे विरोधीपक्ष म्हणून कामच आहे. त्यामुळे भाजप व सेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या कुंडल्याच विधिमंडळात मांडल्या जातील. त्यांचा ‘अच्छे दिन आनेवाले है’, या भुलविणाऱ्या घोषणेमागील खरा चेहरा लोकांसमोर आणावयाचा आहे. आपण विधिमंडळाबाहेर असलो, तरी काँग्रेसचे आमदार या भ्रष्टाचाऱ्यांच्या कुंडल्या विधिमंडळात मांडून त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगतील, अशी व्यवस्था केली जाईल, असे राणे यांनी सांगितले. सरकार कधी कोसळेल हे पवार ठरवितातराज्यातील सरकार आठ महिन्यांत भ्रष्टाचारात रुतले आहे. कितीही घोटाळे झाले तरी पाच वर्षे हे सरकार रेटवून नेण्याचा कसाबसा प्रयत्न होईल. सरकार कधी कोसळावयाचे हे शरद पवार ठरवितात, असा चिमटाही राणे यांनी काढला.