शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून तुम्हाला तुमचं मन खातंय; सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 16:10 IST

राज्य सरकारला जर कुणाला आत टाकायचं असेल तर फार काही अवघड नव्हते. शिवसेना तुम्हाला आत टाकू शकली असती असं अंधारे म्हणाल्या.

पुणे - मी बदला घेतला हे देवेंद्र फडणवीसांनीच म्हटलं. सूडाचं राजकारण करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा USP आहे. शिवसेना सूडाचं राजकारण करत नाही. तुम्ही कोणता गुन्हा केलाय जो तुम्हाला सतावतोय, कुणाला अडकवलंय, काय नेमकं केलेय ज्यामुळे तुमचं मन तुम्हाला खातंय. त्यामुळे तुम्हाला आत टाकण्याची भीती आहे हे आम्हाला कळू द्या. आमच्याकडे किरीट सोमय्यांसारखी दिव्यदृष्टी नाही अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, सोमय्या यांनी केलेले आरोप आता ही प्रकरणे थंड पडली. तुम्हाला हवं तेव्हा एखाद्या मंत्र्याला अडचणीत आणू शकता. गरज पडली तर त्याला तुमच्यासोबत घेऊ शकता. इतके रंग कसे काय बदलू शकता त्याबद्दल तुमच्या गुणवत्तेचे कौतुक आहे. देवेंद्र फडणवीसांना आत टाकण्याचा डाव होता असं म्हणतात. तुम्ही असं कोणतं पाप केलंय का? तुम्हाला भीती काय वाटतेय? मुख्यमंत्रिपदाला किती अधिकार असतात हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. राज्य सरकारला जर कुणाला आत टाकायचं असेल तर फार काही अवघड नव्हते. शिवसेना तुम्हाला आत टाकू शकली असती. पण ही कपटी कारस्थाने करण्याची शिवसेनेला गरज पडली नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत आत टाकण्याचे डाव कुणाचे होते? या सगळ्या प्रकरणात सत्ता असताना केंद्रीय यंत्रणा हाती असताना अनिल देशमुखांना आत टाकण्याचा डाव कुणी आखला? सीबीआयला न्यायालयाने फटकारलं. संजय राऊत यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली ती कुणी केली? त्यातही न्यायालयाने राऊत यांच्यावरून ईडीला फटकारलं. प्रताप सरनाईकांना चौकशीचा ससेमिरा लावून हैराण करणारं कोण होतं? जर ते आरोप खरे होते मग तपास का थांबले? असा प्रश्न करत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर प्रश्नांचा भडीमार केला. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांना आत टाकण्यासाठी किती कुंभाड रचलं. वेगवेगळ्या प्रकरणात त्यांचे नाव खेचण्याचा प्रयत्न केला. यावर देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे काय आहे? आत टाकायची भाषा करता तेव्हा तुम्ही जी जी माणसं तुम्हाला घ्यायची होती त्यांच्यामागे ससेमिरा लावला. मानसिक तणावाखाली असताना अनेकांवर धाडी टाकल्या. या देशात न्यायालय सर्वोच्च मानायचं की किरीट सोमय्या यंत्रणा सर्वोच्च मानायची? सोमय्यांना एवढे बळ कुठून येते असंही त्यांनी विचारलं. 

शेलारांवरही निशाणाउद्धव ठाकरे अपयशी नेते म्हणतात मग अमित शाह वारंवार मातोश्रीवर उंबरठे का झिजवत होते. भाजपासोबत युती असताना आमचे आमदार ५३ आणि युती तोडून स्वबळावर लढलो तेव्हा आमदार ६३ होते. तुमच्यासोबत आल्यावर आमचे १० आमदार कमी झाले. म्हणजे शिवसेनेसाठी भाजपा अपयशी आहेत. भाजपाचे नेते आणि मिंदे गटाचे लोक अभ्यास न करता फार व्यक्त होतात. त्यांनी अभ्यास करायला हवा असा टोला सुषमा अंधारे यांनी आशिष शेलारांना लगावला आहे.  

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना