शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

...म्हणून तुम्हाला तुमचं मन खातंय; सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 16:10 IST

राज्य सरकारला जर कुणाला आत टाकायचं असेल तर फार काही अवघड नव्हते. शिवसेना तुम्हाला आत टाकू शकली असती असं अंधारे म्हणाल्या.

पुणे - मी बदला घेतला हे देवेंद्र फडणवीसांनीच म्हटलं. सूडाचं राजकारण करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा USP आहे. शिवसेना सूडाचं राजकारण करत नाही. तुम्ही कोणता गुन्हा केलाय जो तुम्हाला सतावतोय, कुणाला अडकवलंय, काय नेमकं केलेय ज्यामुळे तुमचं मन तुम्हाला खातंय. त्यामुळे तुम्हाला आत टाकण्याची भीती आहे हे आम्हाला कळू द्या. आमच्याकडे किरीट सोमय्यांसारखी दिव्यदृष्टी नाही अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, सोमय्या यांनी केलेले आरोप आता ही प्रकरणे थंड पडली. तुम्हाला हवं तेव्हा एखाद्या मंत्र्याला अडचणीत आणू शकता. गरज पडली तर त्याला तुमच्यासोबत घेऊ शकता. इतके रंग कसे काय बदलू शकता त्याबद्दल तुमच्या गुणवत्तेचे कौतुक आहे. देवेंद्र फडणवीसांना आत टाकण्याचा डाव होता असं म्हणतात. तुम्ही असं कोणतं पाप केलंय का? तुम्हाला भीती काय वाटतेय? मुख्यमंत्रिपदाला किती अधिकार असतात हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. राज्य सरकारला जर कुणाला आत टाकायचं असेल तर फार काही अवघड नव्हते. शिवसेना तुम्हाला आत टाकू शकली असती. पण ही कपटी कारस्थाने करण्याची शिवसेनेला गरज पडली नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत आत टाकण्याचे डाव कुणाचे होते? या सगळ्या प्रकरणात सत्ता असताना केंद्रीय यंत्रणा हाती असताना अनिल देशमुखांना आत टाकण्याचा डाव कुणी आखला? सीबीआयला न्यायालयाने फटकारलं. संजय राऊत यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली ती कुणी केली? त्यातही न्यायालयाने राऊत यांच्यावरून ईडीला फटकारलं. प्रताप सरनाईकांना चौकशीचा ससेमिरा लावून हैराण करणारं कोण होतं? जर ते आरोप खरे होते मग तपास का थांबले? असा प्रश्न करत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर प्रश्नांचा भडीमार केला. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांना आत टाकण्यासाठी किती कुंभाड रचलं. वेगवेगळ्या प्रकरणात त्यांचे नाव खेचण्याचा प्रयत्न केला. यावर देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे काय आहे? आत टाकायची भाषा करता तेव्हा तुम्ही जी जी माणसं तुम्हाला घ्यायची होती त्यांच्यामागे ससेमिरा लावला. मानसिक तणावाखाली असताना अनेकांवर धाडी टाकल्या. या देशात न्यायालय सर्वोच्च मानायचं की किरीट सोमय्या यंत्रणा सर्वोच्च मानायची? सोमय्यांना एवढे बळ कुठून येते असंही त्यांनी विचारलं. 

शेलारांवरही निशाणाउद्धव ठाकरे अपयशी नेते म्हणतात मग अमित शाह वारंवार मातोश्रीवर उंबरठे का झिजवत होते. भाजपासोबत युती असताना आमचे आमदार ५३ आणि युती तोडून स्वबळावर लढलो तेव्हा आमदार ६३ होते. तुमच्यासोबत आल्यावर आमचे १० आमदार कमी झाले. म्हणजे शिवसेनेसाठी भाजपा अपयशी आहेत. भाजपाचे नेते आणि मिंदे गटाचे लोक अभ्यास न करता फार व्यक्त होतात. त्यांनी अभ्यास करायला हवा असा टोला सुषमा अंधारे यांनी आशिष शेलारांना लगावला आहे.  

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना