शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Maharashtra Politics: “शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात, आम्ही परतीचे दोर कापलेले नाहीत”: सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 14:44 IST

Maharashtra News: शिंदे गटातील एका आमदाराला आता पश्चाताप होत असून, ते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. बंडखोरांना अद्दल घडवण्यासाठी काही मंडळींना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेश देत शिवबंधन बांधले. यातील एक नाव म्हणजे शिवसेनेत प्रवेश करताच उपनेतेपद मिळालेल्या सुषमा अंधारे. शिवसेनेतील फायर ब्रँड नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून, बंडखोरांवर सातत्याने अंधारे तोफ डागत आहे. यातच शिंदे गटातील एक आमदार आमच्या संपर्कात असून, आम्ही परतीचे दोर कापलेले नाहीत, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. 

सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणल्या की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही संयमित भाषेचा वापर करत आहोत. आम्ही टीका करताना कधीही पातळी सोडणार नाही. परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नाहीत, असे सूचक विधान सुषमा अंधारे यांनी केले. तसेच हिंदुत्वावर भूमिका स्पष्ट करताना, मला सर्व धर्माबाबत आदर आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमधील परिषदेत हिंदुत्व सांगितले ते महत्त्वाचे आहे, असे सुषमा अंधारे यांनी नमूद केले. 

आमदार संजय शिरसाट हे शिंदे गटात अस्वस्थ

शिंदे गटात काही आमदार नाराज असून काहीजण संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिंदे गटात असलेले आमदार संजय शिरसाट आमच्या संपर्कात आहेत. आमदार संजय शिरसाट हे शिंदे गटात अस्वस्थ आहेत. संजय शिरसाट यांना पश्चाताप होतोय, असा मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केला. तसेच बच्चू कडू हे लढाऊ आणि स्वाभिमानी आहेत. त्यांच्यावर आरोप होणे हे चुकीचे आहे. मात्र, रवी राणा हे उथळ व्यक्तिमत्त्वाचे असून, चर्चेत राहण्यासाठी ते सतत काहीतरी बोलत असतात, अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. 

दरम्यान, ईडी, सीबीआयचा भाजपकडून दुरुपयोग सुरू आहे. भाजपमध्ये असलेल्या कोणत्याही भ्रष्टाचारी नेत्याविरोधात कारवाई केली जात नाही. कोरोना काळात जिल्ह्यात झालेल्या अपहाराबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही. मागील काही दिवसात कुरघोडीचे राजकारण सुरू असून लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही, या शब्दांत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत, महापौर शिवसेनेच्या आहेत म्हणून महापालिकेचा निधी पालकमंत्री रोखत आहेत. त्यांना त्रास दिला जात आहे हे योग्य आहे का, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे