शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला पाठिंबा, पवारांकडून संकेत!

By admin | Updated: February 27, 2017 06:00 IST

मुंबईचा कारभार सुरळीत चालावा एवढीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.

मुंबई/ नांदेड : मुंबईचा कारभार सुरळीत चालावा एवढीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. भाजपा आणि शिवसेनेत दोन जागांचाच फरक आहे. शिवसेना जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करेल, मात्र वेळ आलीच तर भाजपा वगळता इतर पक्षांना पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील, असे सांगून खा. शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण ९ जागा जिंकल्या आहेत. आपण भाजपाला पाठिंबा देणार नाही हे पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.मुंबई महापालिकेत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या असून, एका अपक्षासह विजयी झालेल्या तीन बंडखोर उमेदवारांनी पाठिंबा दिला आहे. परिणामी, सेनेचे संख्याबळ ८८ झाले आहे. तर भाजपाकडे ८२ जागा आहेत. संख्याबळानुसार शिवसेना किंवा भाजपा दोन्ही पक्ष स्वबळावर महापौर निवडून आणू शकत नाहीत. एकतर दोघांना एकत्र यावे लागेल, अथवा काँग्रेसचा पाठिंबा मिळवावा लागेल. मात्र, शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तरच पाठिंबा देऊ, अशी अट काँग्रेसने घातली आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केलेल्या विधानाला महत्त्व आहे.नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना खा. पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मी मध्यावधी निवडणुकीचे भाकीत केले होते. मात्र, सत्तेपासून भाजपा वा सेना कोणीही दूर राहू शकणार नाहीत, त्यामुळे सरकार पडण्याची शक्यता नाही़ मध्यावधीची वेळ आलीच तर आमची तयारी आहे. पण ती शक्यता दिसत नाही, असे सांगून ते म्हणाले, मुंबई महापालिकेत काय घडेल हे सांगू शकत नाही. मात्र, कारभार सुरळीत चालावा एवढीच आमची अपेक्षा आहे. गरज पडली तर भाजपा वगळून इतरांना पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील, असे सूचक विधान पवार यांनी केले.जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. पुणे महापालिकेत कमी पडलो हेही त्यांनी मान्य केले़ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास राज्यात जवळपास १७ ते १८ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळू शकते. मात्र ती झाली नाही, तर केवळ ४ जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता येईल. त्यामुळे आघाडीचा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून मी स्वत: अनुकूल आहे़, असे पवार यांनी सांगितले. कोणाला कुठे आहे संधी?निवडणूक झालेल्या २५ जिल्हा परिषदांपैकी नांदेड, अहमदनगर, अमरावती आणि सिंधुदुर्ग या चार जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या असून पराभणी, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, आणि सातारा या सहा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम क्रमांकावर आहे. हिंगोलीत काँग्रेस (१२), राष्ट्रवादी (१२) आणि शिवसेना (१५), भाजपा (१०) असे संख्याबळ आहे. तीन जागा अपक्षांकडे आहेत. त्यामुळे अपक्ष ज्यांच्याकडे त्यांची सत्ता, असे चित्र आहे. कोल्हापूरमध्ये दोन्ही काँग्रेसकडे मिळून २५, तर शिवसेना-भाजपाकडे २४ जागा आहेत. एक अपक्ष आणि १७ जागा स्थानिक आघाडीकडे असल्याने कोल्हापुरात काहीही घडू शकते. सांगलीत भाजपाकडे (२३) सर्वाधिक जागा असून शिवसेनेला ३ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ही जिल्हा परिषद युतीकडे संख्याबळ जास्त असले तरी काँग्रेस (१०) आणि राष्ट्रवादीकडे (१४) जागा आहेत. शिवाय, स्थानिक आघाडीकडे १० जागा असल्याने येथेही आघाडी आणि युतीला समान संधी आहे. रायगडमध्ये शेकापकडे सर्वाधिक २३ जागा आहेत. दोन्ही काँग्रेससोबत आघाडी झाली तर ही जिल्हा परिषद शेकापच्या ताब्यात जाऊ शकते. गडचिरोलीत भाजपाकडे सर्वाधिक २० जागा असल्या तरी काँग्रेस (१५), राष्ट्रवादी (५) आणि स्थानिक आघाडीकडे ११ जागा आहेत. त्यामुळे इथेही भाजपा आणि काँग्रेसला समान संधी आहे. शिवसेना-भाजपाची युती झाली औरंगाबाद, लातूर, जालना, चंद्रपूर, वर्धा, जळगाव, बुलडाणा, यवतमाळ, नाशिक, रत्नागिरी या १० ठिकाणी युतीची सत्ता येऊ शकते. (प्रतिनिधी)>काँग्रेसचा पाठिंबा? थोडं थांबा!मुंबई महापौरपदासाठी शिवसेना काँग्रेसशी हातमिळवणी करणार का? याबाबत तर्कवितर्क लढविले जात असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘काँग्रेसचा पाठिंबा? थोडं थांबा!’ असे टिष्ट्वट केल्याने राजकीय पतंगबाजीला ऊत आला आहे.>सर्वपक्षीय नेते भेटले : खा. शरद पवार यांच्या भेटीसाठी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची रीघ लागली होती. त्यात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, शिवसेनेचे आ़ प्रताप पाटील चिखलीकर, आ़ हेमंत पाटील, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचा समावेश होता. पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनीही पवारांची स्वतंत्रपणे भेट घेतली़ >मुंबई महापालिकेत काय घडेल हे सांगू शकत नाही. मात्र, कारभार सुरळीत चालावा एवढीच आमची अपेक्षा आहे. गरज पडली तर भाजपा वगळून इतरांना पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील.