शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

Maharashtra Politics: “भाजप आणीबाणीपेक्षा वाईट, भयंकर स्थिती निर्माण करून राज्य करतंय”; शिवसेनेची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 08:08 IST

इंदिरा गांधींची राजवट बरी असे वाटावे इतके अधःपतन सुरु असून जयप्रकाश नारायण भाजपला कळणे तसे कठीणच, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

Maharashtra Politics: आगामी महापालिका निवडणुका आणि आताची अंधेरी पूर्वची पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप-शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना भाजपवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहे. यातच आता भाजप शासन तर आणीबाणीपेक्षा वाईट, भयंकर स्थिती निर्माण करून राज्य करीत आहे व या आणीबाणीविरुद्ध आज विरोधी पक्षांतील काँग्रेस व इतर विरोधक लढा देत आहेत, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 

शिवसेनेने आपले मुखपत्र सामना अग्रलेखातून जयप्रकाश नारायण यांचे स्मरण करत भाजपवर टीकेचे आसूड ओढले आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांची विचारधारा व विचारवारसा यावरून देशात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. निमित्त झाले अमित शहा यांच्या एका वक्तव्याचे. ‘जेपीं’च्या १२० व्या जयंतीनिमित्त भव्य प्रतिमेचे अनावरण केले. त्या सोहळ्यात गृहमंत्र्यांनी नितीश कुमार, लालू यादव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ‘जयप्रकाश नारायण यांच्या अनुयायांनी सत्तेसाठी आपल्या विचारांचे बलिदान दिले आणि आता ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.’ अमित शहा यांचा हा हल्ला सरळ सरळ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर होता. नितीश कुमारांनीही मग त्यावर सांगितले की, ‘अमित शहांचे विधान दखलपात्र नाही. ज्यांचे राजकीय आयुष्य वीस वर्षांचेही नाही त्यांना जयप्रकाश काय समजणार?’, असे म्हटले होते. याच अनुषंगाने शिवसेनेनेही भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

देशात लोकशाहीच्या नावावर हुकूमशाहीच दिसत आहे

जयप्रकाश नारायण हे देशांतर्गत हुकूमशाहीविरुद्ध लढले. लोकशाही रक्षणासाठी त्यांनी लढा दिला. आज देशात लोकशाहीच्या नावावर हुकूमशाहीच दिसत आहे. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणी विरोधात जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या लढ्याची आठवण तुम्ही करून देता, पण सध्याचे भाजप शासन तर आणीबाणीपेक्षा वाईट, भयंकर स्थिती निर्माण करून राज्य करीत आहे व या आणीबाणीविरुद्ध आज विरोधी पक्षांतील काँग्रेस व इतर विरोधक लढा देत आहेत. त्यामुळे जयप्रकाश नारायण यांच्या विचारांना कोणी तिलांजली दिली व कोण कोणाच्या मांडीवर बसले हा वाद निरर्थक आहे, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. 

अमित शहा यांना जयप्रकाश नारायण किती कळले?

अमित शहा यांना जयप्रकाश नारायण किती कळले? असा प्रश्न नितीश कुमारांनी विचारला. जयप्रकाश नारायण भाजपला कळणे तसे कठीणच, पण देशातील विरोधकांना तरी जयप्रकाश लवकरात लवकर कळले तर बरे होईल, असा टोला लगावताना, आज इंदिरा गांधींची राजवट बरी असे वाटावे इतके अधःपतन सुरू आहे. जयप्रकाश नारायण आता असते तर त्यांनी आणखी एका स्वातंत्र्याचा लढा निर्माण केला असता. जयप्रकाश नारायण हे मूळचे काँग्रेसीच होते. पण जयप्रकाश यांनी काँग्रेस पक्षातही कधी वैचारिक तडजोड केली नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

दरम्यान, आज क्रांतीची भाषा करणाऱ्या राजकीय विरोधकांना देशद्रोही ठरवून तुरुंगात ढकलले जात आहे. त्याच हुकूमशाही हातांनी जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमेचे अनावरण करावे ही लोकशाही व स्वातंत्र्याची शोकांतिकाच म्हणायला हवी. शालेय पुस्तकांत अनेक धडे सध्या घुसवले जातात. ‘जयप्रकाश नारायण यांचा हुकूमशाहीविरुद्ध लढा’ हा धडाही नव्या पिढीसाठी शालेय पुस्तकांत घाला. अमित शहा यांनी त्या कामी पुढाकार घ्यावा ही विनंती!, अशी खोचक मागणी शिवसेनेने केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी