शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? भ्रष्टाचार केला असेल मुक्काम तुरुंगातच असणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 13:36 IST

Sanjay Shirsat Vs Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे पाळण्यात असल्यापासून उद्धव ठाकरेंच्या हातात मुंबई महानगरपालिका होती. त्याने बाबांना जाऊन विचारावे, काय दिवे लावलेत ते, अशी टीका करण्यात आली आहे.

Sanjay Shirsat Vs Aaditya Thackeray: ठाकरे गट ०१ जुलै रोजी विराट मोर्चा काढत आहे. याचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत. यावर शिवसेना शिंदे गटाकडून घणाघाती टीका करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी मोर्चा काढणे म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मोर्चा कुठून काढणार आणि कुठे जाणार माहिती नाही. पण आदित्य ठाकरे फिरून मातोश्रीवर येणार. गेली २५ वर्ष यांनीच भ्रष्टाचार केला आहे, या शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या मोर्चावर हल्लाबोल केला.

स्थायी समितीचे सभापती असतील किंवा महापौर असतील ती यांची प्यादी होती. टक्केवारी ठरलेली होती. आता महानगरपालिका हातात नाही, म्हटल्यावर भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचा आव आणला जात आहे. असे धाडस ते कसे करू शकतात. चोर मचायें शोर, हे त्यांना लागू होते, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. आदित्य ठाकरे पाळण्यात असल्यापासून उद्धव ठाकरेंच्या हातात मुंबई महानगरपालिका होती. आदित्य ठाकरेंनी बाबांना जाऊन विचारावे. आपल्याकडे किती वर्ष सत्ता होती. आपण काय दिवे लावलेत. मुंबईत इतके खड्डे कसे, मुंबई इतकी बकाल का झाली, रस्त्यात पाणी का साचते, बाबा आपल्याला पाइव्ह स्टार हॉटेलमध्ये का राहावे लागले, असे सगळे प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारायला हवेत, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. 

आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठा आहे का? 

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, आम्हाला त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढायची आहेत. एकेक मासे आता गळाला लागत आहेत. म्हणून त्यांची फडफड सुरू झाली आहे. त्यांना माहिती आहे की, उद्याचा मुक्काम जेलमध्ये असणार आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला. आदित्य ठाकरे असो किंवा कुणीही असो, जो भ्रष्टाचाराशी संबंधित आहे, तो जेलमध्येच राहील. आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठा आहे का, अशी विचारणा करत शिरसाट पुढे म्हणाले की, कोणताही पुढारी कायद्यापेक्षा मोठा नाही. जो करेल, तो भरेल. हे निश्चित आहे, असे संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, केंद्रात फेरबदल होणार आहेत. काही संकेत आम्हालाही मिळाले आहेत. शिवसेनेचे दोन मंत्री तिथे जातील, ही महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीला ते हातभार लावू शकतात, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटAaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे