शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? भ्रष्टाचार केला असेल मुक्काम तुरुंगातच असणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 13:36 IST

Sanjay Shirsat Vs Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे पाळण्यात असल्यापासून उद्धव ठाकरेंच्या हातात मुंबई महानगरपालिका होती. त्याने बाबांना जाऊन विचारावे, काय दिवे लावलेत ते, अशी टीका करण्यात आली आहे.

Sanjay Shirsat Vs Aaditya Thackeray: ठाकरे गट ०१ जुलै रोजी विराट मोर्चा काढत आहे. याचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत. यावर शिवसेना शिंदे गटाकडून घणाघाती टीका करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी मोर्चा काढणे म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मोर्चा कुठून काढणार आणि कुठे जाणार माहिती नाही. पण आदित्य ठाकरे फिरून मातोश्रीवर येणार. गेली २५ वर्ष यांनीच भ्रष्टाचार केला आहे, या शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या मोर्चावर हल्लाबोल केला.

स्थायी समितीचे सभापती असतील किंवा महापौर असतील ती यांची प्यादी होती. टक्केवारी ठरलेली होती. आता महानगरपालिका हातात नाही, म्हटल्यावर भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचा आव आणला जात आहे. असे धाडस ते कसे करू शकतात. चोर मचायें शोर, हे त्यांना लागू होते, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. आदित्य ठाकरे पाळण्यात असल्यापासून उद्धव ठाकरेंच्या हातात मुंबई महानगरपालिका होती. आदित्य ठाकरेंनी बाबांना जाऊन विचारावे. आपल्याकडे किती वर्ष सत्ता होती. आपण काय दिवे लावलेत. मुंबईत इतके खड्डे कसे, मुंबई इतकी बकाल का झाली, रस्त्यात पाणी का साचते, बाबा आपल्याला पाइव्ह स्टार हॉटेलमध्ये का राहावे लागले, असे सगळे प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारायला हवेत, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. 

आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठा आहे का? 

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, आम्हाला त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढायची आहेत. एकेक मासे आता गळाला लागत आहेत. म्हणून त्यांची फडफड सुरू झाली आहे. त्यांना माहिती आहे की, उद्याचा मुक्काम जेलमध्ये असणार आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला. आदित्य ठाकरे असो किंवा कुणीही असो, जो भ्रष्टाचाराशी संबंधित आहे, तो जेलमध्येच राहील. आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठा आहे का, अशी विचारणा करत शिरसाट पुढे म्हणाले की, कोणताही पुढारी कायद्यापेक्षा मोठा नाही. जो करेल, तो भरेल. हे निश्चित आहे, असे संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, केंद्रात फेरबदल होणार आहेत. काही संकेत आम्हालाही मिळाले आहेत. शिवसेनेचे दोन मंत्री तिथे जातील, ही महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीला ते हातभार लावू शकतात, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटAaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे