शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

“आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? भ्रष्टाचार केला असेल मुक्काम तुरुंगातच असणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 13:36 IST

Sanjay Shirsat Vs Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे पाळण्यात असल्यापासून उद्धव ठाकरेंच्या हातात मुंबई महानगरपालिका होती. त्याने बाबांना जाऊन विचारावे, काय दिवे लावलेत ते, अशी टीका करण्यात आली आहे.

Sanjay Shirsat Vs Aaditya Thackeray: ठाकरे गट ०१ जुलै रोजी विराट मोर्चा काढत आहे. याचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत. यावर शिवसेना शिंदे गटाकडून घणाघाती टीका करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी मोर्चा काढणे म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मोर्चा कुठून काढणार आणि कुठे जाणार माहिती नाही. पण आदित्य ठाकरे फिरून मातोश्रीवर येणार. गेली २५ वर्ष यांनीच भ्रष्टाचार केला आहे, या शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या मोर्चावर हल्लाबोल केला.

स्थायी समितीचे सभापती असतील किंवा महापौर असतील ती यांची प्यादी होती. टक्केवारी ठरलेली होती. आता महानगरपालिका हातात नाही, म्हटल्यावर भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचा आव आणला जात आहे. असे धाडस ते कसे करू शकतात. चोर मचायें शोर, हे त्यांना लागू होते, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. आदित्य ठाकरे पाळण्यात असल्यापासून उद्धव ठाकरेंच्या हातात मुंबई महानगरपालिका होती. आदित्य ठाकरेंनी बाबांना जाऊन विचारावे. आपल्याकडे किती वर्ष सत्ता होती. आपण काय दिवे लावलेत. मुंबईत इतके खड्डे कसे, मुंबई इतकी बकाल का झाली, रस्त्यात पाणी का साचते, बाबा आपल्याला पाइव्ह स्टार हॉटेलमध्ये का राहावे लागले, असे सगळे प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारायला हवेत, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. 

आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठा आहे का? 

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, आम्हाला त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढायची आहेत. एकेक मासे आता गळाला लागत आहेत. म्हणून त्यांची फडफड सुरू झाली आहे. त्यांना माहिती आहे की, उद्याचा मुक्काम जेलमध्ये असणार आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला. आदित्य ठाकरे असो किंवा कुणीही असो, जो भ्रष्टाचाराशी संबंधित आहे, तो जेलमध्येच राहील. आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठा आहे का, अशी विचारणा करत शिरसाट पुढे म्हणाले की, कोणताही पुढारी कायद्यापेक्षा मोठा नाही. जो करेल, तो भरेल. हे निश्चित आहे, असे संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, केंद्रात फेरबदल होणार आहेत. काही संकेत आम्हालाही मिळाले आहेत. शिवसेनेचे दोन मंत्री तिथे जातील, ही महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीला ते हातभार लावू शकतात, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटAaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे