शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“संजय राऊतांनी विधानसभा, लोकसभा लढली का, तळागाळात जाऊन काम केले का”; शिंदेसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:57 IST

NCP SP Group MP Amol Kolhe Replied Sanjay Raut: उद्या शरद पवार आणि आशा भोसले यांनाही गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत. गेल्या ३ महिन्यांत मातोश्रीवर कोणी गेले का, हेच सिल्व्हर ओकवर जातात, अशी टीका शिंदे गटाच्या नेत्यांनी केली.

NCP SP Group MP Amol Kolhe Replied Sanjay Raut: सरहदच्या वतीने  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. अलीकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेण्याचे काम केले नाही, तर राजकारणाला योग्य दिशा देण्याचेही काम केले, अशा शब्दांत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शरद पवार यांच्यावर टीका केली. याला आता शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी उत्तर दिले.

उद्या शरद पवार आणि आशा भोसले यांनाही गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत. यांच्या विरहित कार्यक्रम केला तर ते गद्दार. गद्दार शब्द चिटकवण्याची त्यांच्याकडे स्पर्धा लागली आहे. चांगल्या माणसाने चांगले काम केलेले त्यांना आवडत नाही. मराठी महिला म्हणून प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. यांना हे कळत नाही. कोण आहे संजय राऊत. काय अस्तित्व आहे. कधी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा लढलीय का, त्यांना काय माहीत आहे. भाषण करणे वेगळे आणि तळागाळात जाऊन काम करणे वेगळे. ते फक्त पोपटपंची करतात, या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.

संजय राऊतांवर उद्धव ठाकरे नाराज आहेत

संजय राऊतांवर उद्धव ठाकरे नाराज आहेत. उद्धव ठाकरे का बोलत नाहीत, हे आश्चर्य आहे. शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला. तो महाराष्ट्राच्या प्रतिनिधींचा सत्कार आहे. त्याचा बहुमान एकनाथ शिंदे यांना मिळाला याचा अभिमान आहे. शिवसेना प्रमुख स्मारक ट्रस्टचे अध्यक्षपद काढू नका, हे सांगण्यासाठी हे लोक मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. विनवण्या करण्यासाठी फिरत असतात, अशी खोचक टीकाही संजय शिरसाट यांनी केली. 

तीन महिन्यात मातोश्रीला कोणी गेले का, हेच सिल्व्हर ओकवर जातात

एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुखांचे विचार पेलणारा नेता आहे. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांचा गौरव केला. तुम्ही फक्त दलाली करत आहात. टीका करून दिवसाची सुरुवात कशी करायची, इतरांना कसे वाईट बोलायचे हेच काम आता त्यांचे राहिले आहे. महाविकास आघाडी राहिली कुठे. यांना काँग्रेस विचारते कुठे, राष्ट्रवादी यांना विचारते कुठे. तीन महिन्यात मातोश्रीला कोणी गेलंय का. हेच सिल्व्हर ओकवर जातात. हे आता एकटेच पडणार आहेत, असे सांगत शिरसाट यांनी हल्लाबोल केला. 

अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांना डांबून ठेवण्याचे काम केले

अनेक मुख्यमंत्र्यांच्या भेटी शरद पवार यांनी घेतल्या. महाराष्ट्राच्या हिताची चर्चा त्यांनी केली. संजय राऊत यांना चर्चा नको. यांना फक्त राजकारण पाहिजे. अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांना डांबून ठेवण्याचे काम केले. संजय राऊत हे राजकारणातील खलनायक आहेत. शकुनी आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही फुटण्यास ते कारणीभूत झालो, असे शिरसाट म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतSanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवार