शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

“चारवेळा CM असताना शरद पवारांना आरक्षणाचा मुद्दा का आठवला नाही”; शिंदे गटातील नेत्याचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 16:46 IST

Reservation Issue In State: शरद पवारांनी राजकारण केले, सर्वांना झुलवत ठेवले. आधीच केले असते तर हा प्रश्न मार्गी लागला असता, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे.

Reservation Issue In State: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे पथक दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात १३ ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल असे बोलले जात आहे. यातच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही समाजातील नेते आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शरद पवार यांनी मांडलेल्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, शरद पवार जेष्ठ नेते आहेत, आता तुम्हाला जो मुद्दा आठवत आहे, चार वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा का हे आठवले नाही? त्यावेळी राजकारण केले ,सर्वांना झुलवत ठेवले. आधीच केले असते तर हा प्रश्न मार्गी लागला असता. शरद पवारांना जे वाटत आहे तेही करण्याचा सरकार प्रयत्न सुरू आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.

झिरवळ यांनी असे करणे शोभनीय नाही

आरक्षणाच्या मुद्द्यावरून नरहरी झिरवळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारल्या. यावर बोलताना, झिरवळ हे विधानसभा उपाध्यक्ष आहेत, अत्यंत जबाबदार पदाधिकारी आहेत, महायुतीमध्ये सरकारमध्ये आहे. मुख्यमंत्री यांना भेटून गाऱ्हाणे मांडू शकतात, चर्चेतून मार्ग निघतात. लोकशाहीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना आंदोलन करण्याचे अधिकार आहे. यापूर्वी मागण्यांना बगल देण्यात आले, त्यामुळे हा स्फोट होत आहे. ज्याचा जो अधिकार आहे त्यांना मिळाले पाहिजे, धनगर समाजाबाबत समिती नेमली आहे. सर्वांना समानतेची वागणूक देण्याचा आणि न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. एखादे आंदोलन करण्यापूर्वी चर्चा केली पाहिजे. झिरवळ यांनी असे करणे शोभनीय नाही, त्यांच्या मागण्यांचे सरकार विचार करत आहे. झालेला प्रकार योग्य म्हणावे आणि अयोग्य म्हणावे याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. 

आरक्षणावर शरद पवार नेमके काय म्हणाले होते?

प्रश्न असा आहे की, आता ५० टक्क्यांच्या वर जाता येत नाही. ५० टक्क्यांच्या वर आरक्षण हवे असेल, तर संसदेत कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आता ५० टक्क्यांपर्यंत आरक्षण आहे, जाऊद्या ७५ टक्क्यांपर्यंत. एक काळ असा होता की, तामिळनाडू राज्यात आरक्षण जवळपास ७८ टक्क्यांपर्यंत होते. तामिळनाडूत ७८ टक्के होऊ शकते, तर महाराष्ट्रात ७५ टक्के का होऊ शकत नाही? ५० आता आहे. ७५ टक्के करायचे असेल, तर २५ टक्के वाढवावे लागेल. २५ वाढवले, तर ज्यांना मिळाले नाही, त्यांचाही विचार करता येईल. जिथे कमी आहे, त्यांचाही विचार करता येईल. यात कुठलाही वाद राहणार नाही. माझे स्पष्ट मत आहे की, यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. संसदेमध्ये दुरुस्ती आणावी, आम्ही सगळे लोक जे आमचे सदस्य (खासदार) असतील, आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करू, त्यांना साथ देऊ, असे शरद पवार यांनी सांगितले. 

 

टॅग्स :reservationआरक्षणSanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटSharad Pawarशरद पवार