शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Maharashtra Politics: “संजय राऊतजी, आम्ही ५० जण एकदिलाचे आहोत, तुम्ही तुमचे उरलेले १५ सांभाळा” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 14:57 IST

Maharashtra News: संजय राऊतांकडे आता फक्त १५ जण राहिलेत. किती सांभाळता येतील ते सांभाळा, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे म्हणजेच ठाकरे गट यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला आता शिंदे गटातील नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतजी, आम्ही ५० जण एकदिलाचे आहोत, तुम्ही तुमचे उरलेले १५ सांभाळा, असा टोला लगावला आहे. 

गद्दारांना परत विधानसभेत पाठवायच नाही, ज्या अर्थी दीपक केसरकरांना वाटत परत एकत्र यावे, अस त्यांना वाटत म्हणजे त्यांच्या गटात आणखी गट सुरू झाले आहेत, शिंदे गटाला आत्मपरिक्षणाची गरज नाही. शिंदे गटातील अर्धे आमदार भाजपमध्ये जातील.  त्यांना राज्याच नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, त्यांनी व्यवस्थित काम करावे. भाजपने ही तात्पुर्ती तडजोड केली आहे. यांना भारतीय जनतेच्या पायरीवरही बसवले जात नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. याला शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

संजय राऊतजी, आम्ही ५० जण एकदिलाचे आहोत

आमच्यात टोळी युद्ध नाही. थोडे-फार समज-गैरसमज सगळीकडेच असतात. संजय राऊतांकडे आता फक्त १५ जण राहिलेत. किती सांभाळता येतील ते सांभाळा. आम्ही ५० एका जीवाचे एका दिलाचे आहोत. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. २०२४ ला आणखी किती येतात, तेही पाहा. हे सगळे अपात्र होणार, मनसे, प्रहारशिवाय पर्याय नाही, असे म्हणत होते. पण आम्ही सत्तेत आलो, आता न्यायालयात जे प्रकरण सुरु आहे, त्यात आम्हीच जिंकू, असा विश्वास संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणात तुमच्यासारखा पांचटपणा नसतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने जनतेला भुरळ घातली आहे. जे कामाचे आहे, तेच बोलतात, असेही संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSanjay Gaikwadसंजय गायकवाड