शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

Maharashtra Politics: “संजय राऊतजी, आम्ही ५० जण एकदिलाचे आहोत, तुम्ही तुमचे उरलेले १५ सांभाळा” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 14:57 IST

Maharashtra News: संजय राऊतांकडे आता फक्त १५ जण राहिलेत. किती सांभाळता येतील ते सांभाळा, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे म्हणजेच ठाकरे गट यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला आता शिंदे गटातील नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतजी, आम्ही ५० जण एकदिलाचे आहोत, तुम्ही तुमचे उरलेले १५ सांभाळा, असा टोला लगावला आहे. 

गद्दारांना परत विधानसभेत पाठवायच नाही, ज्या अर्थी दीपक केसरकरांना वाटत परत एकत्र यावे, अस त्यांना वाटत म्हणजे त्यांच्या गटात आणखी गट सुरू झाले आहेत, शिंदे गटाला आत्मपरिक्षणाची गरज नाही. शिंदे गटातील अर्धे आमदार भाजपमध्ये जातील.  त्यांना राज्याच नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, त्यांनी व्यवस्थित काम करावे. भाजपने ही तात्पुर्ती तडजोड केली आहे. यांना भारतीय जनतेच्या पायरीवरही बसवले जात नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. याला शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

संजय राऊतजी, आम्ही ५० जण एकदिलाचे आहोत

आमच्यात टोळी युद्ध नाही. थोडे-फार समज-गैरसमज सगळीकडेच असतात. संजय राऊतांकडे आता फक्त १५ जण राहिलेत. किती सांभाळता येतील ते सांभाळा. आम्ही ५० एका जीवाचे एका दिलाचे आहोत. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. २०२४ ला आणखी किती येतात, तेही पाहा. हे सगळे अपात्र होणार, मनसे, प्रहारशिवाय पर्याय नाही, असे म्हणत होते. पण आम्ही सत्तेत आलो, आता न्यायालयात जे प्रकरण सुरु आहे, त्यात आम्हीच जिंकू, असा विश्वास संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणात तुमच्यासारखा पांचटपणा नसतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने जनतेला भुरळ घातली आहे. जे कामाचे आहे, तेच बोलतात, असेही संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSanjay Gaikwadसंजय गायकवाड