शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:27 IST

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: अमित ठाकरे यांनी भाजपा नेते, मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेल्याची म्हटले जात आहे.

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: तुम्ही जर प्रभाग रचनेचा सगळ्यांनी मिळून अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की, प्रभाग रचनेचे काही नियम आहेत ते कोणालाही डावलता येत नाहीत. जसे मतदार यादीत सगळे लोक सांगतात की दुबार मतदार नोंदणी झालेली आहे किंवा घोटाळा झाला आहे. ते बदलण्याचे अधिकार निवडणूक आयोगाने दिले आहेत. पंचायत निवडणुका आपल्या हातातून गेल्यात अशी जेव्हा आपली कहाणी होते. त्यावेळी कुठच्याही गोष्टीचा खापर हे कोणावर तरी फोडायचे असते, म्हणून काही लोक प्रभाग रचनेवर खापर फोडत आहेत, असे प्रत्युत्तर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांच्या टीकेला दिले.

सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांंनी भाजपा नेते, मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. यानंतर उदय सामंत यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना या भेटीचे कारण तसेच अन्य राजकीय प्रश्नांवर उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दांत उत्तरे दिली. अखिल भारतीय नाट्य परिषद संस्थेमध्ये मुख्य विश्वस्त शरद पवार आहेत. त्या संदर्भात बैठक होती. या कमिटीचे कोषाध्यक्ष, विश्वस्त आणि मी आम्ही सगळे या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित होतो. ११ सप्टेंबरला शरद पवार यांनी यशवंत नाट्यमंदिर येथे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक बैठक आयोजित केलेली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून याचा मी एक भाग आहे. यामुळे मला शरद पवार यांनी या ठिकाणी बोलवले. यात कुठलीही राजकीय बाब नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.

आंदोलन करणे किंवा न करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची हाक दिली असताना राज्य सरकारने मराठा समाजाच्याप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना केली आहे. या समितीत उदय सामंत यांचाही समावेश आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारच्या समोर आहेत. परंतु एक भूमिका स्पष्ट असली पाहिजे की, मराठा आणि ओबीसी समाज दोन्ही घटक महाराष्ट्रातले प्रमुख घटक आहेत. त्यामुळे ओबीसी समाजावर कुठेही अन्याय होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे जरांगेंच्या मागण्या असतील किंवा मराठा समाजाच्या उन्नतीच्या मागण्या असतील तर त्या चांगल्या पद्धतीने सरकारला कशा पुढे नेता येतील ते बघावे लागेल. आंदोलन करणे किंवा न करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामध्ये मला पडायचे नाही. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू, असे उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, ईव्हीएमच कारण जे होते, ते बेस्ट पतपेढी निवडणुकीत नेस्तनाबूत झाले. कारण बॅलेटवर निवडणुका घेऊन त्यांना भोपळाही फोडता आला नाही. १२ हजार मराठी मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले. त्यांना २ हजार मतेही मिळवता आली नाहीत. आता स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरे जात असताना कारण कुठच शोधायचे? स्वतःचा पराभव हा समोर दिसत असल्याने कोणावर तरी खापर फोडावे लागते ते आता त्यांनी प्रभागावर फोडले आहे, या शब्दांत उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार