शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
4
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
5
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
6
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
7
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
8
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
9
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
10
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
11
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
12
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
13
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
14
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
15
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
16
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
17
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
18
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
19
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
20
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!

मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:27 IST

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: अमित ठाकरे यांनी भाजपा नेते, मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेल्याची म्हटले जात आहे.

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: तुम्ही जर प्रभाग रचनेचा सगळ्यांनी मिळून अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की, प्रभाग रचनेचे काही नियम आहेत ते कोणालाही डावलता येत नाहीत. जसे मतदार यादीत सगळे लोक सांगतात की दुबार मतदार नोंदणी झालेली आहे किंवा घोटाळा झाला आहे. ते बदलण्याचे अधिकार निवडणूक आयोगाने दिले आहेत. पंचायत निवडणुका आपल्या हातातून गेल्यात अशी जेव्हा आपली कहाणी होते. त्यावेळी कुठच्याही गोष्टीचा खापर हे कोणावर तरी फोडायचे असते, म्हणून काही लोक प्रभाग रचनेवर खापर फोडत आहेत, असे प्रत्युत्तर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांच्या टीकेला दिले.

सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांंनी भाजपा नेते, मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. यानंतर उदय सामंत यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना या भेटीचे कारण तसेच अन्य राजकीय प्रश्नांवर उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दांत उत्तरे दिली. अखिल भारतीय नाट्य परिषद संस्थेमध्ये मुख्य विश्वस्त शरद पवार आहेत. त्या संदर्भात बैठक होती. या कमिटीचे कोषाध्यक्ष, विश्वस्त आणि मी आम्ही सगळे या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित होतो. ११ सप्टेंबरला शरद पवार यांनी यशवंत नाट्यमंदिर येथे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक बैठक आयोजित केलेली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून याचा मी एक भाग आहे. यामुळे मला शरद पवार यांनी या ठिकाणी बोलवले. यात कुठलीही राजकीय बाब नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.

आंदोलन करणे किंवा न करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची हाक दिली असताना राज्य सरकारने मराठा समाजाच्याप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना केली आहे. या समितीत उदय सामंत यांचाही समावेश आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारच्या समोर आहेत. परंतु एक भूमिका स्पष्ट असली पाहिजे की, मराठा आणि ओबीसी समाज दोन्ही घटक महाराष्ट्रातले प्रमुख घटक आहेत. त्यामुळे ओबीसी समाजावर कुठेही अन्याय होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे जरांगेंच्या मागण्या असतील किंवा मराठा समाजाच्या उन्नतीच्या मागण्या असतील तर त्या चांगल्या पद्धतीने सरकारला कशा पुढे नेता येतील ते बघावे लागेल. आंदोलन करणे किंवा न करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामध्ये मला पडायचे नाही. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू, असे उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, ईव्हीएमच कारण जे होते, ते बेस्ट पतपेढी निवडणुकीत नेस्तनाबूत झाले. कारण बॅलेटवर निवडणुका घेऊन त्यांना भोपळाही फोडता आला नाही. १२ हजार मराठी मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले. त्यांना २ हजार मतेही मिळवता आली नाहीत. आता स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरे जात असताना कारण कुठच शोधायचे? स्वतःचा पराभव हा समोर दिसत असल्याने कोणावर तरी खापर फोडावे लागते ते आता त्यांनी प्रभागावर फोडले आहे, या शब्दांत उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार