शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

“मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाची सहानुभूती कमी होतेय”: दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 18:36 IST

Deepak Kesarkar On Manoj Jarange Agitation: काही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो, तो मनोज जरांगेंनी दिला पाहिजे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

Deepak Kesarkar On Manoj Jarange Agitation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची नवी दिशा काय असेल हे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने शिक्षण आणि नोकरीत स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असला तरी मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. मात्र, आता मराठा आंदोलकांमध्ये फूट पडल्याचे चित्र असल्याची चर्चा आहे. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांच्या पुढील आंदोलनाबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक केसरकर यांनी सांगितले की, एक गोष्ट अशी आहे की, मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. काही तांत्रिक प्रक्रिया असते, ती पूर्ण करावीच लागते. त्यामुळे त्यांची सगेसोयरे यांच्यासंदर्भातील जी मागणी होती, त्या नोटिफिकेशन सरकार सकारात्मक आहे. ही गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितली आहे. अशामुळे लोकांची एक सहानुभूती जी मराठा समाजाला मिळत आहे, ती कमी होत आहे, याचा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर आनंदाने पुढील कारवाई करण्यासाठी वेळ लागेल, त्यासाठी त्यांनी तो वेळ दिला पाहिजे, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले आहे. 

 कोकणाचा मान-सन्मान या निवडणुकीत दाखवून देऊ

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. मात्र, खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीका करत त्यांचा १०१ टक्के पराभव करू, असा दावा केला आहे, यावर दीपक केसरकर यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर बोलताना, मूळात विनायक राऊत पुन्हा निवडून आले नसते. या जिल्ह्यात मी आणि नारायण राणे आम्ही दोघे राहतो. विनायक राऊत तर मुंबईला राहतात. त्यांना निवडून आणण्यात माझीसुद्धा मोठी भूमिका राहिली आहे. नारायण राणे यांच्या काही कार्यकर्त्यांमुळे संघर्ष झाला. तो संघर्ष नारायण राणे यांच्याशी कधीही नव्हता. ते आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दिवस-रात्र एक करू आणि सिंधुदुर्ग आणि कोकणी माणसाची ताकद काय आहे, हे त्यांना दाखवून देऊ. मुंबईला राहून सिंधुदुर्ग चालवण्याची भाषा कुणी करू नये. कोकणाला मान आहे, स्वाभिमान आहे. तो या निवडणुकीत दाखवून देऊ, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचे आरक्षण काढणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट केले होते. ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवत मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले आहे. त्यामुळे ओबीसी समाजात समाधान तर मराठा समाजात आनंद व्यक्त केला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिले आहे. त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असे आंदोलन करू नये, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण