शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

“रश्मी वहिनी या उद्धव ठाकरेंना पूरक, त्या राजकारणात येऊ शकतात”: नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 15:33 IST

Shiv Sena Shinde Group Neelam Gorhe News: जेवढी लोकांची अपेक्षा आहे, तेवढा वेळ उद्धव ठाकरे यांनी दिला नाही, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.

Shiv Sena Shinde Group Neelam Gorhe News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक धक्के बसताना पाहायला मिळत आहे. मनिषा कायंदे आणि शिशिर शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अलीकडेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता नीलम गोऱ्हे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे राजकारणात येऊ शकतात, असा दावा नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. 

शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना नीलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. यानंतर आता एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर थेट शब्दांत भाष्य केले आहे. मी राजीनामा दिल्यानंतरचे ते पत्रक उद्धव ठाकरेंना पाठवले होते. त्यावर त्यांनी नमस्कार आणि स्मायली पाठवून प्रतिक्रिया दिली. मी सोडून जाणार आहे याची त्यांना आधीच कुणकुण लागली होती असे मला वाटते, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच जेवढी लोकांची अपेक्षा आहे, तेवढा वेळ उद्धव ठाकरे यांनी दिला नाही, अशी तक्रारही नीलम गोऱ्हे यांनी केली. 

रश्मी वहिनी राजकारणात येऊ शकतात

रश्मी ठाकरे यांच्याबद्दल बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, रश्मी वहिनी गृहिणी आहेत. त्यांची भूमिका ही उद्धव ठाकरेंना पूरक असते. त्या उत्साही आणि क्रियाशील आहेत. त्या राजकारणात आल्या तर येऊ शकतात. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच मी कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आजारी पडल्यानंतर आमची चर्चेची दार बंद झाली. आता त्यांना जास्त त्रास द्यायला नको म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, संजय राऊतांनी मला खूप मदत केली आहे. माझ्या आमदारकीच्या वेळेस अनेकदा मदत केली. पण सध्याच्या राजकारणामुळे त्यांचा बळी गेला. खूप त्रास सहन करावा लागला. संजय राऊत यांनी टोकाचे बोलू नये, वैचारिक मांडणी करावी असे मला वाटते. पण काही लोक आक्रमक बोलू आणि लिहू शकत नाहीत, ते संजय राऊतांना हे करायला सांगतात पण त्यामुळे संजय राऊतांना त्रास सहन करावा लागतो, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे