शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi Letter To Sanjay Raut: “अजिबात घाबरु नका, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी”; राहुल गांधींचे संजय राऊतांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 11:55 IST

Rahul Gandhi Letter To Sanjay Raut: केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात संजय राऊतांच्या भूमिकेला राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील नेते आणि मंत्र्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या सुरू असलेल्या कारवाईवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत भाजपवर निशाणा साधताना दिसत आहेत. मंगळवारी पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडी ही भाजपची एटीएम असल्याची टीका करत जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संजय राऊत यांना एक पत्र लिहिले असून, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी उभा असल्याचे म्हटले आहे. 

संजय राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिले होते. या पत्राच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना पत्र लिहिले आहे. राहुल गांधी यांनी संजय राऊतांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना ८ फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्राची दखल घेतली आहे. राहुल गांधी यांनी संजय राऊतांना काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. 

राहुल गांधी नेमके काय म्हणालेत पत्रात?

तपास यंत्रणांकडून तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याचा मी निषेध करत आहे. तुमच्या पत्रातून मोदी सरकार विरोधकांना शांत करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा खुलासा झाला आहे. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असून कोणतीही भीती आणि अनुकूलता न दर्शवता तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवत आहोत, असे राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर हे पत्र शेअर केले असून, यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

आपल्याला एकत्र लढावे लागेल

संजय राऊत यांनी पत्राबाबत राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या या आमच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला एकत्र लढावे लागेल. केंद्रीय तपास यंत्रणा एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत हे केवळ दुर्दैवी नाही तर धोकादायकही आहे. पण मला खात्री आहे, ही वेळ सुद्धा निघून जाईल, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, ‘ईडी’ ही भाजपची एटीएम मशीन झाली आहे, असा आरोप करत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील लवकरच तुरुंगात जातील. ईडी अधिकारी खंडणीतून वसूल होणारी रक्कम जितेंद्र नवलानीच्या सात कंपन्यांच्या खात्यांमध्ये जमा करत होते. या खंडणीच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वसुली ईडी अधिकाऱ्यांनी मुंबईत केली आहे. यासंदर्भात ईडी अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली आहे. ईडी अधिकारी नक्कीच तुरुंगात जातील, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी