शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

Rahul Gandhi Letter To Sanjay Raut: “अजिबात घाबरु नका, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी”; राहुल गांधींचे संजय राऊतांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 11:55 IST

Rahul Gandhi Letter To Sanjay Raut: केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात संजय राऊतांच्या भूमिकेला राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील नेते आणि मंत्र्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या सुरू असलेल्या कारवाईवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत भाजपवर निशाणा साधताना दिसत आहेत. मंगळवारी पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडी ही भाजपची एटीएम असल्याची टीका करत जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संजय राऊत यांना एक पत्र लिहिले असून, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी उभा असल्याचे म्हटले आहे. 

संजय राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिले होते. या पत्राच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना पत्र लिहिले आहे. राहुल गांधी यांनी संजय राऊतांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना ८ फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्राची दखल घेतली आहे. राहुल गांधी यांनी संजय राऊतांना काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. 

राहुल गांधी नेमके काय म्हणालेत पत्रात?

तपास यंत्रणांकडून तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याचा मी निषेध करत आहे. तुमच्या पत्रातून मोदी सरकार विरोधकांना शांत करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा खुलासा झाला आहे. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असून कोणतीही भीती आणि अनुकूलता न दर्शवता तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवत आहोत, असे राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर हे पत्र शेअर केले असून, यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

आपल्याला एकत्र लढावे लागेल

संजय राऊत यांनी पत्राबाबत राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या या आमच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला एकत्र लढावे लागेल. केंद्रीय तपास यंत्रणा एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत हे केवळ दुर्दैवी नाही तर धोकादायकही आहे. पण मला खात्री आहे, ही वेळ सुद्धा निघून जाईल, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, ‘ईडी’ ही भाजपची एटीएम मशीन झाली आहे, असा आरोप करत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील लवकरच तुरुंगात जातील. ईडी अधिकारी खंडणीतून वसूल होणारी रक्कम जितेंद्र नवलानीच्या सात कंपन्यांच्या खात्यांमध्ये जमा करत होते. या खंडणीच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वसुली ईडी अधिकाऱ्यांनी मुंबईत केली आहे. यासंदर्भात ईडी अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली आहे. ईडी अधिकारी नक्कीच तुरुंगात जातील, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी