शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

“काय तो सागर बंगला, काय देवाचा देव देवेंद्र, राज्याला दिलं कणखर नेतृत्व, ओके माझा महाराष्ट्र”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 19:28 IST

शहाजी बापू पाटील यांनी एकदम हटके शब्दांत एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर भाजप आणि शिंदे गटाने बहुमत सिद्ध करून नवीन सरकार स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली. यानंतर बंडखोर आमदारांमधील शहाजी बापू पाटील यांनी आपल्या गावरान हटके शब्दांत एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

माझ्या राजकीय अनुभवातून लोकशाहीच्या इतिहासात जी राज्य चाललेली आहेत, त्या देशांमध्ये असे कोणतेही उदाहरण घडलेले नाही. हे एक ऐतिहासिक उदाहरण आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणामुळे राज्याला साताऱ्याच्या दऱ्या-खोऱ्यातून आलेले आणि आनंद दिघे यांच्या छायेखाली वाढलेले कणखर नेतृत्व मिळाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून त्यांनी राजकारण केले. महाराष्ट्राला मिळालेली ही सर्वांत मोठी देणगी आहे. काय तो सागर बंगला, काय देवाचा देव देवेंद्र, राज्याला दिलेला मुख्यमंत्री, ओक्के माझा महाराष्ट्र, अशी हटके प्रतिक्रिया शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे. 

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करतील

राज्यात जे काही सुरू आहे. आम्हाला सातत्याने बंडखोर म्हटले जात आहे. पांडूरंगाची शपथ घेऊन सांगतो की, ही आमची वैचारिक लढाई आहे. या वैचारिक लढाईत संजय राऊत यांच्यासारख्या राजकारण्यांनी आम्हाला विनाकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी मरणारी माणसे आहोत. शिवसेना संपवण्याचे पाप आमच्याहातून घडणार नाही आणि आम्ही ते करणार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व केले. तो कणखरपणा दाखवला आणि ते महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करतील, असा मला १०० टक्के विश्वास आहे, असे शहाजी बापू पाटील यांनी नमूद केले. 

दरम्यान, गेल्या आठवडाभरातील सत्ता संघर्षात कुणीही आमदार तणावाखाली नव्हता. मी लबाड बोलणार नाही. उलट नितीन देशमुख यांच्या पत्नीशी संवाद साधल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून विशेष विमानाने त्यांना परत पाठवले. ते आमच्या विचारांसोबत नाही, हे तेव्हाच कळले, असे शहाजी बापू यांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ