शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

“काय तो सागर बंगला, काय देवाचा देव देवेंद्र, राज्याला दिलं कणखर नेतृत्व, ओके माझा महाराष्ट्र”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 19:28 IST

शहाजी बापू पाटील यांनी एकदम हटके शब्दांत एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर भाजप आणि शिंदे गटाने बहुमत सिद्ध करून नवीन सरकार स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली. यानंतर बंडखोर आमदारांमधील शहाजी बापू पाटील यांनी आपल्या गावरान हटके शब्दांत एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

माझ्या राजकीय अनुभवातून लोकशाहीच्या इतिहासात जी राज्य चाललेली आहेत, त्या देशांमध्ये असे कोणतेही उदाहरण घडलेले नाही. हे एक ऐतिहासिक उदाहरण आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणामुळे राज्याला साताऱ्याच्या दऱ्या-खोऱ्यातून आलेले आणि आनंद दिघे यांच्या छायेखाली वाढलेले कणखर नेतृत्व मिळाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून त्यांनी राजकारण केले. महाराष्ट्राला मिळालेली ही सर्वांत मोठी देणगी आहे. काय तो सागर बंगला, काय देवाचा देव देवेंद्र, राज्याला दिलेला मुख्यमंत्री, ओक्के माझा महाराष्ट्र, अशी हटके प्रतिक्रिया शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे. 

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करतील

राज्यात जे काही सुरू आहे. आम्हाला सातत्याने बंडखोर म्हटले जात आहे. पांडूरंगाची शपथ घेऊन सांगतो की, ही आमची वैचारिक लढाई आहे. या वैचारिक लढाईत संजय राऊत यांच्यासारख्या राजकारण्यांनी आम्हाला विनाकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी मरणारी माणसे आहोत. शिवसेना संपवण्याचे पाप आमच्याहातून घडणार नाही आणि आम्ही ते करणार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व केले. तो कणखरपणा दाखवला आणि ते महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करतील, असा मला १०० टक्के विश्वास आहे, असे शहाजी बापू पाटील यांनी नमूद केले. 

दरम्यान, गेल्या आठवडाभरातील सत्ता संघर्षात कुणीही आमदार तणावाखाली नव्हता. मी लबाड बोलणार नाही. उलट नितीन देशमुख यांच्या पत्नीशी संवाद साधल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून विशेष विमानाने त्यांना परत पाठवले. ते आमच्या विचारांसोबत नाही, हे तेव्हाच कळले, असे शहाजी बापू यांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ