शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

हिंदुत्वाचं प्रतीक हातात दिसलं नाही, तुम्ही भगवा सोडलाय का?; सुहास कांदे यांचा आदित्य ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 10:01 IST

आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे गट आणि भाजपा यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. आम्हीच शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला विधानसभेतील ५० आमदारांनी आणि लोकसभेतील १२ शिवसेना खासदारांनी समर्थन दिले आहे. दोन तृतीयांश बहुमत शिंदे यांच्याकडे असल्याने गटनेता, प्रतोद बदलून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला. दरम्यान, यानंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. आता आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

“आदित्य ठाकरे यांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे. ते सूज्ञ आहेत. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर भाष्य करण योग्य नाही. सरकार अनधिकृत आहे अधिकृत आहे हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल,” असे सुहास कांदे म्हणाले. “गद्दारी करायला आम्ही शिवसेना पक्ष सोडला नाही. आम्ही नियमांनुसार अध्यक्षांनी जो गटनेता, प्रतोद नेमला होता त्या व्हिपनुसार आम्ही शिवसेनेला मतदान केलं. आम्ही बाळासाहेबांच्याच शिवसेनेला मतदान केलं. आमच्यात भगवंच रक्त आहे,” असं कांदे म्हणाले. टीव्ही ९ शी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. आदित्य ठाकरेंच्या हातातला भगवा काल कुठे होता? शिवसेनेचं, हिंदुत्वाचं प्रतीक काल हातात दिसलं नाही. तुम्ही भगवा सोडलाय का?, असा सवालही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.

“मी आजही ठाकरे कुटुंबीयांच्या जवळ आहे. बाळासाहेबांचे वंशज म्हणून ते आजही आमच्या देवाच्या स्थानी आहेत. प्रश्न हिंदुत्वाचा आहे. आपला पक्ष कुठे चालला आहे? आपल्याला बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. आपण कुठे चाललो आहोत हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र