शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिंदुत्वाचं प्रतीक हातात दिसलं नाही, तुम्ही भगवा सोडलाय का?; सुहास कांदे यांचा आदित्य ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 10:01 IST

आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे गट आणि भाजपा यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. आम्हीच शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला विधानसभेतील ५० आमदारांनी आणि लोकसभेतील १२ शिवसेना खासदारांनी समर्थन दिले आहे. दोन तृतीयांश बहुमत शिंदे यांच्याकडे असल्याने गटनेता, प्रतोद बदलून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला. दरम्यान, यानंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. आता आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

“आदित्य ठाकरे यांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे. ते सूज्ञ आहेत. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर भाष्य करण योग्य नाही. सरकार अनधिकृत आहे अधिकृत आहे हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल,” असे सुहास कांदे म्हणाले. “गद्दारी करायला आम्ही शिवसेना पक्ष सोडला नाही. आम्ही नियमांनुसार अध्यक्षांनी जो गटनेता, प्रतोद नेमला होता त्या व्हिपनुसार आम्ही शिवसेनेला मतदान केलं. आम्ही बाळासाहेबांच्याच शिवसेनेला मतदान केलं. आमच्यात भगवंच रक्त आहे,” असं कांदे म्हणाले. टीव्ही ९ शी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. आदित्य ठाकरेंच्या हातातला भगवा काल कुठे होता? शिवसेनेचं, हिंदुत्वाचं प्रतीक काल हातात दिसलं नाही. तुम्ही भगवा सोडलाय का?, असा सवालही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.

“मी आजही ठाकरे कुटुंबीयांच्या जवळ आहे. बाळासाहेबांचे वंशज म्हणून ते आजही आमच्या देवाच्या स्थानी आहेत. प्रश्न हिंदुत्वाचा आहे. आपला पक्ष कुठे चालला आहे? आपल्याला बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. आपण कुठे चाललो आहोत हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र