शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

Maharashtra Politics: “हे चांगले लक्षण नाही, हिंदुस्थानच्या राज्यकर्त्यांनी परराष्ट्र धोरण एकदा तपासून पाहिले पाहिजे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 07:57 IST

Maharashtra News: टीचभर नेपाळने हिंदुस्थानविरोधात असे शड्डू ठोकावेत ही वाटते तितकी सामान्य गोष्ट नक्कीच नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Maharashtra Politics: चीनचे लाडके पात्र आणि नेपाळचे कम्युनिस्ट नेते पुष्प कमल दहल प्रचंड यांची तिसऱ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यापासून जी भीती व्यक्त केली जात होती ती खरी ठरताना दिसत आहे. चीनच्या कडेवर बसून नेपाळचा गाडा हाकणारे प्रचंड महाशय पूर्वांपार हिंदुस्थानविरोधीच आहेत आणि पंतप्रधान झाल्यावर चीनच्या सांगण्यावरून त्यांच्या हिंदुस्थानविरोधी कुरापती सुरू होतील, असे मत आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार मांडत होतेच. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारला सल्ला दिला आहे. 

नेपाळसारख्या टीचभर देशाने हिंदुस्थानच्या काही भूभागांवर हक्क सांगावा हे नक्कीच चांगले लक्षण नाही. एकेक करून आशियाई देश हिंदुस्थानविरोधी यादीत जाऊन बसत असतील तर हिंदुस्थानच्या राज्यकर्त्यांनीही आपले परराष्ट्र धोरण एकदा तपासून पाहिले पाहिजे. चीनच्या ओंजळीने पाणी पिऊन नेपाळ आज वाकडे पाऊल टाकत असला तरी तो आपला पारंपरिक मित्र आहे. चीनच्या डावपेचांना काटशह देऊन हा मित्र जपायलाच हवा. भौगोलिक व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही ते आवश्यकच आहे, असे शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हटले आहे. 

नेपाळने हिंदुस्थानविरोधात असे शड्डू ठोकावेत ही सामान्य गोष्ट नक्कीच नाही 

हिंदुस्थानच्या हद्दीत असलेल्या काही भागांवर नेपाळ सरकारने दावा ठोकला असून, चीनप्रमाणेच हिंदुस्थानसोबत सीमेवरून तंटा-बखेडा उभा करण्याचे धोरण नेपाळनेही स्वीकारल्याचे दिसते. हिंदुस्थानच्या भूभागावर नेपाळने केवळ दावाच केला असे नाही; तर उत्तराखंड राज्यातील नेपाळ सीमेलगतचे कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा ही तीन क्षेत्रे हिंदुस्थानकडून परत घेऊ, अशी एकतर्फी घोषणा करून नेपाळ सरकार मोकळे झाले आहे. पुष्प कमल प्रचंड यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर जेमतेम पंधरवडाही होत नाही, तोच नेपाळने हिंदुस्थानविरोधात असे शड्डू ठोकावेत ही वाटते तितकी सामान्य गोष्ट नक्कीच नाही, असेही शिवसेनेने म्हटले आहे. 

नेपाळचा जीव तो किती? 

प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उत्तराखंडमधील लिम्पियाधुरा, कालापानी आणि लिपुलेख हा प्रदेश हिंदुस्थानच्या ताब्यातून परत घेण्याचे आश्वासन नेपाळच्या जनतेला दिले आहे. नेपाळ सरकारने केल्यामुळे सीमेच्या वादावरून हिंदुस्थानशी संघर्ष करण्याची मानसिकता नेपाळने बनवली आहे असे दिसते. नेपाळचा जीव तो किती? आर्थिक क्षमतेपासून लष्करी सामर्थ्यापर्यंत कुठल्याच बाबतीत हिंदुस्थानच्या पासंगालाही न पुरणारा नेपाळ अशी आगळिक का करत असावा? चीनचे कावेबाज डावपेच हेच याचे उत्तर आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

दरम्यान, नेपाळात सत्तेवर आलेली लाल माकडे चिनी झाडांवर उड्या मारण्यासाठी कितीही आतुर असली तरी नेपाळच्या सर्वसामान्य जनतेला मनात मात्र चीनच्या तुलनेत हिंदुस्थानच आपला आणि जवळचा वाटतो, ही आपल्यासाठी मोठीच जमेची बाजू आहे, असे नमूद करत, चीनच्या ओंजळीने पाणी पिऊन नेपाळ आज वाकडे पाऊल टाकत असला तरी तो आपला पारंपरिक मित्र आहे. चीनच्या डावपेचांना काटशह देऊन हा मित्र जपायलाच हवा, असा सल्ला शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारत