शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Neelam Gorhe: “केंद्राची नवी योजना, उद्धव ठाकरेंवर टीका करा अन् Y दर्जाची सुरक्षा घ्या”; शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:41 IST

Neelam Gorhe: कंगना रणौत, नवनीत राणा, किरीट सोमय्या हे या योजनेचे लाभार्थी असल्याचा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे.

उस्मानाबाद: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात नवनव्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यातच मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षातील वाद वाढताना दिसत आहे. यातच आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करा आणि वाय दर्जाची सुरक्षा घ्या ही योजना केंद्राने सुरू केली आहे, अशा शब्दांत केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. 

विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर टीका केल्यास केंद्र सरकारकडून तात्काळ वाय सुरक्षा मिळते हे अनेक उदाहरणावरून दिसते. टीका करणे हा सुरक्षा मिळवण्याचा मार्ग बनला आहे. राज ठाकरे यांना पुर्वीपासूनच आवश्यक ती सुरक्षा आहे. त्यामुळे ते केंद्राची सुरक्षा घेतील असे मला वाटत नाही, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे. 

कंगना रणौत, नवनीत राणा, किरीट सोमय्या हे याचेच लाभार्थी

पुढे बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कंगना रणौत, नवनीत राणा, किरीट सोमय्या हे या योजनेचे लाभार्थी आहे. ज्या व्यक्तींना संरक्षण हवे आहे ते मुख्यमंत्री यावर बोलतात. विकासाच्या प्रश्नापासून लक्ष उडविणे व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मशीदिवरील भोंगे व हनुमान चालीसा पठण हा मुद्दा समोर आणला असून हा प्रश्न प्रतिष्ठेचा करून नये, असा सल्ला नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंना दिला आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार असल्याची चर्चा असून याबद्दल प्रश्न विचारला असता, पक्षाने आदेश दिल्यास अयोध्येला जाईन, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, धाराशिव व संभाजीनगर नामकरण बाबत केंद्राची दुटप्पी भूमिका आहे. उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे संभाजीनगर हे नाव बदलण्यासाठी अनेक ठराव शिवसेनेने मांडले, मात्र केंद्र सरकारच्या दुजाभाव व दुटप्पी भूमिकेमुळे हे नामकरण होत नसल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.  

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकारShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण