शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

Neelam Gorhe: “केंद्राची नवी योजना, उद्धव ठाकरेंवर टीका करा अन् Y दर्जाची सुरक्षा घ्या”; शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:41 IST

Neelam Gorhe: कंगना रणौत, नवनीत राणा, किरीट सोमय्या हे या योजनेचे लाभार्थी असल्याचा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे.

उस्मानाबाद: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात नवनव्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यातच मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षातील वाद वाढताना दिसत आहे. यातच आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करा आणि वाय दर्जाची सुरक्षा घ्या ही योजना केंद्राने सुरू केली आहे, अशा शब्दांत केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. 

विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर टीका केल्यास केंद्र सरकारकडून तात्काळ वाय सुरक्षा मिळते हे अनेक उदाहरणावरून दिसते. टीका करणे हा सुरक्षा मिळवण्याचा मार्ग बनला आहे. राज ठाकरे यांना पुर्वीपासूनच आवश्यक ती सुरक्षा आहे. त्यामुळे ते केंद्राची सुरक्षा घेतील असे मला वाटत नाही, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे. 

कंगना रणौत, नवनीत राणा, किरीट सोमय्या हे याचेच लाभार्थी

पुढे बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कंगना रणौत, नवनीत राणा, किरीट सोमय्या हे या योजनेचे लाभार्थी आहे. ज्या व्यक्तींना संरक्षण हवे आहे ते मुख्यमंत्री यावर बोलतात. विकासाच्या प्रश्नापासून लक्ष उडविणे व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मशीदिवरील भोंगे व हनुमान चालीसा पठण हा मुद्दा समोर आणला असून हा प्रश्न प्रतिष्ठेचा करून नये, असा सल्ला नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंना दिला आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार असल्याची चर्चा असून याबद्दल प्रश्न विचारला असता, पक्षाने आदेश दिल्यास अयोध्येला जाईन, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, धाराशिव व संभाजीनगर नामकरण बाबत केंद्राची दुटप्पी भूमिका आहे. उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे संभाजीनगर हे नाव बदलण्यासाठी अनेक ठराव शिवसेनेने मांडले, मात्र केंद्र सरकारच्या दुजाभाव व दुटप्पी भूमिकेमुळे हे नामकरण होत नसल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.  

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकारShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण