शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

शिवसेना, राष्ट्रवादीची यादी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 05:02 IST

मंत्रिमंडळ विस्तारासाठी थोरात सोमवारी दिल्लीत : मल्लिकार्जुन खरगेंनी घेतली नागपुरात बैठक

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर दोन दिवसात होईल असे सांगण्यात येत असले तरी विस्ताराच्या तारखेवरुन तिन्ही पक्षात संभ्रम आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपली यादी तयार असल्याचे काँग्रेसला कळवले आहे. काँग्रेसने त्यांची यादी द्यावी म्हणजे एकत्रित विस्तार करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि खरगे यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत बैठक होणार अशी बातमी होती. मात्र खरगे दुपारपर्यंत विधानभवनातच थांबले. नंतर ते यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या बैठकीसाठी गेले. तोपर्यंत शरद पवार, उध्दव ठाकरे यांची कर्जमाफीची बैठक सुरू झाली. दुपारी शरद पवार औरंगाबादला गेले. त्यामुळे आम्हाला शरद पवार यांना भेटता आले नाही, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.दरम्यान, काँग्रेसची यादी येण्यास विलंब लागत असेल तर काँग्रेसने जेवढी नावे निश्चित केली आहेत ती द्यावीत, त्या नावांसह शिवसेना, राष्टÑवादी यांची नावे एकत्र करुन अधिवेशनानंतर लगेच शपथ घ्यावी, असा प्रस्ताव पुढे आला आहे. बाळासाहेब थोरात यांनी यादी निश्चित करण्यासाठी आपल्याला सोमवारी दिल्लीला जावे लागेल असे सांगितले आहे. त्यामुळे सोमवारी शपथविधी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. शपथविधी झाला तर मंगळवारी २४ तारखेला होऊ शकतो. २५ तारखेला नाताळाची सुटी असली तरी त्यादिवशी अमावस्या आहे. त्यामुळे त्यादिवशी शपथविधी होऊ नये असे काही नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे हा विस्तार दोन टप्प्यात होईल असे चित्र आज समोर आले आहे.काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आज नागपूर येथे आले होते. त्यांनी विधान भवनात काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. लोकमतशी बोलताना ते म्हणाले, आमच्या दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. नावे अंतिम करण्यासाठी फार अडचण येणार नाही असेही ते म्हणाले. बैठकीत आमदारांशी बोलताना खरगे यांनी कोणत्याही परिस्थितीत हे सरकार पडू द्यायचे नाही, आपल्याला एकत्रितपणे काम करायचे आहे. कोण काय बोलते याकडे लक्ष न देता सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावे असेही सांगितले.ती वेळ येऊ नये म्हणून...सरकार पडू द्यायचे नाही अशी भूमिका खरगे यांनी मांडली असली तरी त्याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. या सरकार विषयी राहुल गांधी अद्याप साशंक आहेत असे सांगितले जाते. जर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची भूमिका वेगळी आली तर काँग्रेसचे ३० ते ३५ आमदार स्वतंत्र गट करतील. तो गट सरकारमध्ये सहभागी होईल, परिणामी त्याचा फटका काँग्रेसला बसेल, शिवाय ज्येष्ठ नेत्यांचे राजकारणही अडचणीत येईल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. तसे झाले तर काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, त्यामुळे ती वेळ येऊ नये यासाठी खरगे यांनी अशी भूमिका मांडल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस