शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

शिवसेना, राष्ट्रवादीची यादी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 05:02 IST

मंत्रिमंडळ विस्तारासाठी थोरात सोमवारी दिल्लीत : मल्लिकार्जुन खरगेंनी घेतली नागपुरात बैठक

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर दोन दिवसात होईल असे सांगण्यात येत असले तरी विस्ताराच्या तारखेवरुन तिन्ही पक्षात संभ्रम आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपली यादी तयार असल्याचे काँग्रेसला कळवले आहे. काँग्रेसने त्यांची यादी द्यावी म्हणजे एकत्रित विस्तार करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि खरगे यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत बैठक होणार अशी बातमी होती. मात्र खरगे दुपारपर्यंत विधानभवनातच थांबले. नंतर ते यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या बैठकीसाठी गेले. तोपर्यंत शरद पवार, उध्दव ठाकरे यांची कर्जमाफीची बैठक सुरू झाली. दुपारी शरद पवार औरंगाबादला गेले. त्यामुळे आम्हाला शरद पवार यांना भेटता आले नाही, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.दरम्यान, काँग्रेसची यादी येण्यास विलंब लागत असेल तर काँग्रेसने जेवढी नावे निश्चित केली आहेत ती द्यावीत, त्या नावांसह शिवसेना, राष्टÑवादी यांची नावे एकत्र करुन अधिवेशनानंतर लगेच शपथ घ्यावी, असा प्रस्ताव पुढे आला आहे. बाळासाहेब थोरात यांनी यादी निश्चित करण्यासाठी आपल्याला सोमवारी दिल्लीला जावे लागेल असे सांगितले आहे. त्यामुळे सोमवारी शपथविधी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. शपथविधी झाला तर मंगळवारी २४ तारखेला होऊ शकतो. २५ तारखेला नाताळाची सुटी असली तरी त्यादिवशी अमावस्या आहे. त्यामुळे त्यादिवशी शपथविधी होऊ नये असे काही नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे हा विस्तार दोन टप्प्यात होईल असे चित्र आज समोर आले आहे.काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आज नागपूर येथे आले होते. त्यांनी विधान भवनात काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. लोकमतशी बोलताना ते म्हणाले, आमच्या दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. नावे अंतिम करण्यासाठी फार अडचण येणार नाही असेही ते म्हणाले. बैठकीत आमदारांशी बोलताना खरगे यांनी कोणत्याही परिस्थितीत हे सरकार पडू द्यायचे नाही, आपल्याला एकत्रितपणे काम करायचे आहे. कोण काय बोलते याकडे लक्ष न देता सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावे असेही सांगितले.ती वेळ येऊ नये म्हणून...सरकार पडू द्यायचे नाही अशी भूमिका खरगे यांनी मांडली असली तरी त्याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. या सरकार विषयी राहुल गांधी अद्याप साशंक आहेत असे सांगितले जाते. जर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची भूमिका वेगळी आली तर काँग्रेसचे ३० ते ३५ आमदार स्वतंत्र गट करतील. तो गट सरकारमध्ये सहभागी होईल, परिणामी त्याचा फटका काँग्रेसला बसेल, शिवाय ज्येष्ठ नेत्यांचे राजकारणही अडचणीत येईल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. तसे झाले तर काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, त्यामुळे ती वेळ येऊ नये यासाठी खरगे यांनी अशी भूमिका मांडल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस