शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"महाराष्ट्रात काळू-बाळूचाच तमाशा; एक दाढीवाला अन् दुसरा बिन दाढीवाला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 19:12 IST

आता मोदी पर्व संपलं हे फडणवीसांनी मान्य केले. त्यांचे मनापासून कौतुक. मोदींच्या नावावर मते मिळणार नाही हे कळल्यानंतर आता भाजपा बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मते मागायला निघालेत असंही खासदार राऊत म्हणाले.

सोलापूर - महाराष्ट्रात सध्या काळू-बाळूचाच तमाशा सुरू आहे. एक दाढीवाला आणि दुसरा बिन दाढीवाला. बिन दाढीवाल्याच्या मनात आलं की खेचला माईक, मग दाढीवाला पडला उताणा. राष्ट्रगीतासाठी कसं उभं राहावं हे ज्याला कळत नाही तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. स्व. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा सुवर्ण कळश आणला. दिल्लीकरांशी भांडले. महाराष्ट्र चिरडण्याचा प्रयत्न दिल्लीश्वरांनी कायम केला. २०२२ मध्ये मिळालेला मुख्यमंत्री जन गन मन सुरू असताना सारखा शर्ट खाली खेचत असतो अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. 

विनायक राऊत म्हणाले की, आपण इतिहासात ऐकलं, वाचलंय अलिबाबा ४० चोर, परंतु वास्तव्यात अलिबाबा, ४० चोर कसे पळतात हे महाराष्ट्रानं पाहिलं. धनुष्यबाणाचा टेकू मिळाला नसता तर शहाजी पाटील आमदार दिसला असता का?. ठाकरेंच्या पायातलं तीर्थ प्यायचं सुद्धा शहाजीबापू पाटील यांची लायकी नाही. शिवसेनेच्या सभेतील गर्दी पाहून दररोजपेक्षा दोन जास्त मारतील. शहाजीबापू पाटील केवळ मिमिक्री करण्यास पुढे गेले. जनाची नाही मनाची लाज असती तर ज्या विद्यार्थ्यांना गटारातून शाळेत जावं लागतं ते दुरुस्त करून द्या असं त्यांनी म्हटलं. 

तसेच देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अभ्यासू माणूस. भाजपा मेळाव्यात फडणवीसांनी सांगून टाकलं. बाळासाहेब ठाकरेंच्या विकासाचं स्वप्न साकार करण्यासाठी निवडून यायचं आहे. त्यामुळे आता मोदी पर्व संपलं हे फडणवीसांनी मान्य केले. त्यांचे मनापासून कौतुक. मोदींच्या नावावर मते मिळणार नाही हे कळल्यानंतर आता भाजपा बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मते मागायला निघालेत असा टोला विनायक राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. 

दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अजिबात डगमगले नाहीत. या गद्दारांची किव करावीशी वाटते. शिवसेनेशी बेईमानी, गद्दारी करायची होती तर भाजपाच्या झोळीत पडा. त्यांचा आधार घ्या. आमदारकी विकली. १२ जणांनी खासदारकी विकली. परंतु त्या परिस्थिततही ओमराजे निंबाळकर, कैलाश पाटील, नितीन पाटील हे बेईमानांच्या टोळीतून सुटून मातोश्रीवर आले. याच प्रामाणिकपणाने काम करणारे शिवसैनिक आहे. ४० चोर गेल्याने शिवसेनेचा परिवार कमी झाला नाही. व्याधीमुक्त शिवसेना झाली हे बरे झाले असा घणाघात खासदार विनायक राऊतांनी शिंदे गटातील आमदारांवर केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVinayak Rautविनायक राऊत Shiv Senaशिवसेना