शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

...म्हणून त्यांनी राजकीय बॉसला पत्र लिहिलं; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 10:39 IST

पुण्यात कडकडीत बंद असेल त्याची दखल केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्यपालांनी घ्यायला हवी असं राऊतांनी म्हटलं.

नवी दिल्ली - जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्रालयाचा संपर्क जास्त होता. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असले तरी ते गृह मंत्रालयाच्या अख्यारित येतात. त्यामुळे राज्यपालांच्या नियुक्तीबाबत गृहमंत्रालय काम करते. त्यांचे राजकीय बॉस गृहमंत्रीच असतात. त्यामुळे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपतींपेक्षा राजकीय बॉस असलेल्या गृहमंत्र्यांना राज्यपालांनी पत्र लिहिले अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, आज पुण्यात बंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, कार्य पुणे, रायगडातून पुढे गेले. पुण्यात कडकडीत बंद असेल त्याची दखल केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्यपालांनी घ्यायला हवी. तुम्ही दिलेल्या पत्राचा परिणाम झाला नाही हे पुणेकर दाखवून देतायेत. पुण्याचे लोण राज्यभर पसरत गेले तर संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल. १७ तारखेला जो मोर्चा आहे. त्यात महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सहभागी आहेत. आमच्या दैवतांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले-शाहू आंबेडकरांचा अपमान त्याविरोधात हा मोर्चा आहे. त्याची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागेल असंही त्यांनी केंद्र सरकारला म्हटलं. 

राजकारण बाजूला ठेवा, देशाच्या सीमेकडे लक्ष द्या; राऊतांनी केंद्र सरकारला सुनावलं

सीमा प्रश्न इतका गौण आहे का?महाराष्ट्र-कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट रस्त्यावर झाली. ही सीमाप्रश्न सोडवण्याची जागा आहे का? जाता जाता, एअरपोर्ट लॉबीत सहज भेटले म्हणून बोललो. हा गंभीर प्रश्न आहे. सीमाप्रश्न खालच्या दर्जाचा आहे. जाता येता चर्चा होते का? कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्रावर हल्ले करताय. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. जाता जाता सीमाप्रश्नावर बोललो. ज्या प्रश्नावर ६० वर्ष संघर्ष पेटलाय त्यावर २ मिनिटांची चर्चा होते. सरकारच्या प्रसिद्धी विभागाचं आश्चर्य वाटतं असं सांगत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीEknath Shindeएकनाथ शिंदे