शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

"जर आम्ही उठाव केला नसता तर..."; आमदार संजय शिरसाट यांचं भाजपा नेत्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 18:32 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. सुरक्षेची काळजी नसते. रात्री २ वाजताही लोकांची कामे करतात. त्यामुळे लोकांना ते पसंत पडत आहेत असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.

मुंबई - जर आम्ही उठाव केला नसता, सर्वस्व पणाला लावून पाऊल उचललं नसतं तर हे सरकार आले नसते हे निर्वावाद सत्य आहे. जर कुणाला वाटत असेल हे वरचढ होतायेत तो हा गैरसमज आहे. वाजपेयी सरकार एका मताने पडलेले पाहिलेले आहे. त्यामुळे नाराज कुणाला करू नका. हातात हात घेऊन काम करा असं आवाहन आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना-भाजपा वादाच्या पार्श्वभूमीवर  केले आहे. 

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ठाण्याचे नाही महाराष्ट्राचे आहे. अनिल बोंडे यांचे विधान युतीसाठी ठीक नाही. सगळे निर्णय घेण्याचे अधिकार वरिष्ठांना आहेत. जेवढे बोलायचे तेवढे कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून बोलावं. वाद होतात पण त्याचा फायदा विरोधकांना होतो. शिवसेना-भाजपा यांच्यात वाद आहे का या चर्चेला आपणच उधाण देतोय ते बरोबर नाही. वाद करू नये हे माझे स्पष्ट मत आहे. जागा कोणाला द्यायची हे ठरवणारे आपण नाही. वरिष्ठांना निर्णय घेऊद्या. तुमच्या अशा विधानांनी जर शिवसेना नेत्यांनी रागात चुकीचे विधान केले तर वाईट वाटून घेऊ नका. त्यामुळे अशी विधाने टाळली पाहिजेत असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत उत्साहाच्या भरात कुणी काही विधान केले तर युती तुटेल असं होत नाही. आपल्याला निवडणुकीत शिवसेना-भाजपा म्हणून लढायचंय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट बैठकीत सांगितले आहे. आपापाल्या भांडणामुळे युतीला तडा बसतो. आमच्या आलबेल नाही. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस हातात हात घालून काम करतात. त्यात बाधा होईल अशी विधाने करू नका असंही आमदार शिरसाट यांनी खासदार अनिल बोंडे यांना सल्ला दिला. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. सुरक्षेची काळजी नसते. रात्री २ वाजताही लोकांची कामे करतात. त्यामुळे लोकांना ते पसंत पडत आहेत. त्यामुळे पक्षाला फायदा होतो. त्याचसोबत युतीलाही त्याचा फायदा होतो. मुख्यमंत्री लोकांना भेटतात. कामे करतात हा युतीला फायदा आहे. सकारात्मक वातावरण युतीच्या बाजूने फिरतेय. स्वार्थासाठी काही विधाने करून युतीत बिघाड कशाला आणताय? असा सवाल त्यांनी शिंदेंवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना विचारला. 

जागावाटपाबाबत वरिष्ठ ठरवतीलजागावाटपाबाबत चर्चा करून निर्णय वरिष्ठ घेतील. दर लोकसभेला, विधानसभेला जागावाटपात असे होते. कार्यकर्त्यांची मागणी असते ही जागा आपल्याला पाहिजे. ताकद वाढली पाहिजे. अखेर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात त्यानंतर सगळे कामाला लागतात. भाजपा-शिवसेनेचा कार्यकर्ता फिल्डवर काम करतात. आदेश आल्यानंतर कामाला लागतात असंही आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.  

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा